शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

पाच महिन्यांपासून पाणी पुरवठा खंडित

By admin | Updated: September 7, 2015 01:50 IST

पावसाळ्यातही खेड्यातील (पुराडा) पाणी पुरवठा योजना मागील पाच महिन्यांपासून खंडित असल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला आहे.

नागरिकांचा रोष : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निद्रावस्थेतलोहारा : पावसाळ्यातही खेड्यातील (पुराडा) पाणी पुरवठा योजना मागील पाच महिन्यांपासून खंडित असल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी निद्रावस्थेत असल्यामुळेच पाणी पुरवठा खंडित असल्याचे बोलले जात आहे. ढिसाळ कामामुळे मागील महिन्यात पाईप लाईन अनेक ठिकाणी फुटल्या आहेत. त्यामुळे जनतेला नळ योजनेचा लाभ मिळत नसून ते पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित झाले आहेत.ग्रामीण भागातील नागरिकांना दिवसातून एकदा तरी पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. ग्रामस्थांना उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी टंचाईचा सामना दरवर्षीच करावा लागतो. मात्र आता पावसाळा सुरू असूनही पाणी पुरवठा योजना खंडित असल्याने नागरिकांना आश्चर्य वाटत आहे. अनेक ग्रामस्थ विविध चौकात असलेल्या बोअरवेल्सकडे धाव घेत आहेत. शासनाने नळ योजना राबवूनही ती अपयशी ठरल्याचेच दिसून येत आहे. वार्ड-३ मधील बोअरवेल क्रमांक २ मागील दोन महिन्यांपासून बंद पडून आहे आणि नळाला तर पाणीच नाही. त्यामुळे नागरिकांनी काय करावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. दोन गुंड पिण्याचे पाणी मिळेत म्हणून ग्रामस्थ तासनतास बोअरवेलजवळ थांबतात व पिण्याच्या पाण्याची सोय करतात.सर्व नागरिक पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाणी पुरवठा योजनांवर अवलंबून असतात. मात्र त्यांना पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नळ योजना बंद करून बोअरवेल्स उपलब्ध करून द्यावे. पाईप लाईन फुटल्यामुळे पावसाळ्यात स्वच्छ पाणी न मिळाल्याने अनेक आजार उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी पुरवठा विभागाच्या मनमर्जी कारभाराने ग्रामस्थ त्रासून गेले आहेत. कधी पाणी मिळते तर कधी आठवड्यातून एकदाच मिळते, अशी अवस्था आहे. त्यामुळे अनेक नळ ग्राहकांनी नळ बंद करून ठेवले आहेत. (वार्ताहर)