शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

भर पावसाळ्यात पाणीटंचाईची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:04 IST

मागील तीन चार दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन सुरू झाले.

ठळक मुद्देतिरोडा, गोरेगावला भारनियमनाचा फटका : पाणीपुरवठ्याच्या समस्येत होणार वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन सुरू झाले. याचा सर्वाधिक फटका पाणी पुरवठा योजनांना बसला. परिणामी भर पावसाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात आहे.गोंदिया, तिरोडा, गोरेगाव येथे महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागातंर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. प्राधिकरणाचे गोंदिया शहरात १३ हजार ५०० तर तिरोडा येथे २ हजार ५०० आणि गोरेगाव, मुंडीपार, भंडगा येथे ११५० ग्राहक आहेत. प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत प्रतीव्यक्ती १३५ लिटर याप्रमाणे दिवसांतून दोनदा पाणी पुरवठा केला जातो. याच पाणी पुरवठ्यावर तिन्ही ठिकाणच्या नागरिकांची पाण्याची गरज भागविली जाते.उन्हाळ्यात देखील या भागात नियमित पाणी पुरवठा केला जातो. मात्र सध्या पावसाळा सुरू असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. राज्यातील वीज निर्मिती केंद्रांना केला जाणार कोळश्याचा पुरवठा ठप्प झाल्याने त्याचा वीज निर्मितीवर परिणाम झाला.एकूण मागणीच्या तुलनेत वीज निर्मिती कमी असल्याने महावितरणने ९ सप्टेबरपासून राज्यात भारनियमन सुरू केले. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. या भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन केले जात असल्याने पाणीटाक्या भरणे शक्य होत नाही. गोरेगाव येथे गेल्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठाच झाला नाही. तर तिरोडा येथे दिवसांतून केवळ एकदाच पाणी पुरवठा होत आहे.भारनियमनात वाढ झाल्यास गोंदिया शहराला सुध्दा त्याचा फटका बसू शकतो. भारनियमनामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.दिवाळीनंतर पाणीकपातीचे संकटयंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहे. जलाशयांमध्ये देखील मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. वैनगंगा नदीचे पात्र देखील कोरडे असून दिवाळीनंतर शहराला केल्या जाणाºया पाणी पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाºयांनी वर्तविली आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यातसध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून अनेक भागात साथरोगांनी थैमान घातले आहे. दूषित पाण्यामुळेच सर्वाधिक साथरोगांची लागण होते. आता भारनियमनामुळे नागरिकांना विहिरी, बोअरवेल आणि अन्य स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागते आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मागील तीन चार दिवसांपासून सुरू झालेल्या भारनियमनामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. भारनियमनामुळे गोरेगाव येथे दोन दिवसांपासून पाणी पुरवठा करता आला नाही.- राजेंद्र मडके,उपविभागीय अभियंता,महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभाग.