शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

भर पावसाळ्यात पाणीटंचाईची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:04 IST

मागील तीन चार दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन सुरू झाले.

ठळक मुद्देतिरोडा, गोरेगावला भारनियमनाचा फटका : पाणीपुरवठ्याच्या समस्येत होणार वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन सुरू झाले. याचा सर्वाधिक फटका पाणी पुरवठा योजनांना बसला. परिणामी भर पावसाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात आहे.गोंदिया, तिरोडा, गोरेगाव येथे महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागातंर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. प्राधिकरणाचे गोंदिया शहरात १३ हजार ५०० तर तिरोडा येथे २ हजार ५०० आणि गोरेगाव, मुंडीपार, भंडगा येथे ११५० ग्राहक आहेत. प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत प्रतीव्यक्ती १३५ लिटर याप्रमाणे दिवसांतून दोनदा पाणी पुरवठा केला जातो. याच पाणी पुरवठ्यावर तिन्ही ठिकाणच्या नागरिकांची पाण्याची गरज भागविली जाते.उन्हाळ्यात देखील या भागात नियमित पाणी पुरवठा केला जातो. मात्र सध्या पावसाळा सुरू असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. राज्यातील वीज निर्मिती केंद्रांना केला जाणार कोळश्याचा पुरवठा ठप्प झाल्याने त्याचा वीज निर्मितीवर परिणाम झाला.एकूण मागणीच्या तुलनेत वीज निर्मिती कमी असल्याने महावितरणने ९ सप्टेबरपासून राज्यात भारनियमन सुरू केले. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. या भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन केले जात असल्याने पाणीटाक्या भरणे शक्य होत नाही. गोरेगाव येथे गेल्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठाच झाला नाही. तर तिरोडा येथे दिवसांतून केवळ एकदाच पाणी पुरवठा होत आहे.भारनियमनात वाढ झाल्यास गोंदिया शहराला सुध्दा त्याचा फटका बसू शकतो. भारनियमनामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.दिवाळीनंतर पाणीकपातीचे संकटयंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहे. जलाशयांमध्ये देखील मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. वैनगंगा नदीचे पात्र देखील कोरडे असून दिवाळीनंतर शहराला केल्या जाणाºया पाणी पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाºयांनी वर्तविली आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यातसध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून अनेक भागात साथरोगांनी थैमान घातले आहे. दूषित पाण्यामुळेच सर्वाधिक साथरोगांची लागण होते. आता भारनियमनामुळे नागरिकांना विहिरी, बोअरवेल आणि अन्य स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागते आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मागील तीन चार दिवसांपासून सुरू झालेल्या भारनियमनामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. भारनियमनामुळे गोरेगाव येथे दोन दिवसांपासून पाणी पुरवठा करता आला नाही.- राजेंद्र मडके,उपविभागीय अभियंता,महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभाग.