शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

भर पावसाळ्यात पाणीटंचाईची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:04 IST

मागील तीन चार दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन सुरू झाले.

ठळक मुद्देतिरोडा, गोरेगावला भारनियमनाचा फटका : पाणीपुरवठ्याच्या समस्येत होणार वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन सुरू झाले. याचा सर्वाधिक फटका पाणी पुरवठा योजनांना बसला. परिणामी भर पावसाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात आहे.गोंदिया, तिरोडा, गोरेगाव येथे महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागातंर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. प्राधिकरणाचे गोंदिया शहरात १३ हजार ५०० तर तिरोडा येथे २ हजार ५०० आणि गोरेगाव, मुंडीपार, भंडगा येथे ११५० ग्राहक आहेत. प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत प्रतीव्यक्ती १३५ लिटर याप्रमाणे दिवसांतून दोनदा पाणी पुरवठा केला जातो. याच पाणी पुरवठ्यावर तिन्ही ठिकाणच्या नागरिकांची पाण्याची गरज भागविली जाते.उन्हाळ्यात देखील या भागात नियमित पाणी पुरवठा केला जातो. मात्र सध्या पावसाळा सुरू असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. राज्यातील वीज निर्मिती केंद्रांना केला जाणार कोळश्याचा पुरवठा ठप्प झाल्याने त्याचा वीज निर्मितीवर परिणाम झाला.एकूण मागणीच्या तुलनेत वीज निर्मिती कमी असल्याने महावितरणने ९ सप्टेबरपासून राज्यात भारनियमन सुरू केले. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. या भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन केले जात असल्याने पाणीटाक्या भरणे शक्य होत नाही. गोरेगाव येथे गेल्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठाच झाला नाही. तर तिरोडा येथे दिवसांतून केवळ एकदाच पाणी पुरवठा होत आहे.भारनियमनात वाढ झाल्यास गोंदिया शहराला सुध्दा त्याचा फटका बसू शकतो. भारनियमनामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.दिवाळीनंतर पाणीकपातीचे संकटयंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहे. जलाशयांमध्ये देखील मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. वैनगंगा नदीचे पात्र देखील कोरडे असून दिवाळीनंतर शहराला केल्या जाणाºया पाणी पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाºयांनी वर्तविली आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यातसध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून अनेक भागात साथरोगांनी थैमान घातले आहे. दूषित पाण्यामुळेच सर्वाधिक साथरोगांची लागण होते. आता भारनियमनामुळे नागरिकांना विहिरी, बोअरवेल आणि अन्य स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागते आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मागील तीन चार दिवसांपासून सुरू झालेल्या भारनियमनामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. भारनियमनामुळे गोरेगाव येथे दोन दिवसांपासून पाणी पुरवठा करता आला नाही.- राजेंद्र मडके,उपविभागीय अभियंता,महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभाग.