शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १०३ गावांना बसणार पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:29 IST

गोंदिया : जिल्ह्यातील मागील दोन- तीन वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या तीव्र स्वरूपात जाणवत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखडा ...

गोंदिया : जिल्ह्यातील मागील दोन- तीन वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या तीव्र स्वरूपात जाणवत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखडा यंदा मे ते जून या कालावधीत ५८३ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार आहे. १०३ गाव आणि ७० वाड्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल असून बाघ इटियाडोह विभागांतर्गत मोठ्या प्रकल्पांसह ९ मध्यम, लघु व मोठे तलाव आहेत. यासोबतच जिल्हा परिषदेचे दीड हजार तलाव आहेत. त्यामुळे पाणी सिंचनाची क्षमता जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, मागील काही वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होत असल्याने, तसेच पाणी साठवणुकीसाठी विशेष प्रयत्न झालेले नाहीत. परिणामी जिल्हावासीयांना उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जिल्हा प्रशासनाद्वारे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठा निधी खर्च केला जात असला तरी अनेक गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन-दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. यंदाही जिल्ह्यातील ५८३ गावांवर जलसंकट आले आहे.

....

या तालुक्यांमध्ये निर्माण होणार समस्या

गोंदिया तालुक्यातील १०३ गावे व ७० वाड्यांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. तर गोरेगाव तालुक्यातील ४२ गावे व ३० वाड्या, सडक अर्जुनी ६३ गावे, अर्जुनी मोरगाव ८० गावे व १४ वाड्या, तिरोडा ६२ गावे, सालेकसा ४१ गावे, देवरी २४ गावे व ८ वाड्या व आमगाव तालुक्यातील ३७ गावे व ९ वाड्यातील नागरिकांवर जलसंकट ओढावले आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५ कोटी ८९ लाख रुपयांच्या पाणीटंचाई आराखड्याला मंजुरी दिली आहे.

....

कोरोना संकटामध्ये पाणीटंचाई

कोरोना संसर्ग जिल्ह्यातही सातत्याने वाढत चालला आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रासला आहे. त्यात आता पाणीटंचाईची भर पडल्याने आगामी दोन महिने कसे काढावे, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी होत आहे.