शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

जिल्ह्यातील १०३ गावांना बसणार पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:29 IST

गोंदिया : जिल्ह्यातील मागील दोन- तीन वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या तीव्र स्वरूपात जाणवत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखडा ...

गोंदिया : जिल्ह्यातील मागील दोन- तीन वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या तीव्र स्वरूपात जाणवत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखडा यंदा मे ते जून या कालावधीत ५८३ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार आहे. १०३ गाव आणि ७० वाड्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल असून बाघ इटियाडोह विभागांतर्गत मोठ्या प्रकल्पांसह ९ मध्यम, लघु व मोठे तलाव आहेत. यासोबतच जिल्हा परिषदेचे दीड हजार तलाव आहेत. त्यामुळे पाणी सिंचनाची क्षमता जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, मागील काही वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होत असल्याने, तसेच पाणी साठवणुकीसाठी विशेष प्रयत्न झालेले नाहीत. परिणामी जिल्हावासीयांना उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जिल्हा प्रशासनाद्वारे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठा निधी खर्च केला जात असला तरी अनेक गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन-दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. यंदाही जिल्ह्यातील ५८३ गावांवर जलसंकट आले आहे.

....

या तालुक्यांमध्ये निर्माण होणार समस्या

गोंदिया तालुक्यातील १०३ गावे व ७० वाड्यांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. तर गोरेगाव तालुक्यातील ४२ गावे व ३० वाड्या, सडक अर्जुनी ६३ गावे, अर्जुनी मोरगाव ८० गावे व १४ वाड्या, तिरोडा ६२ गावे, सालेकसा ४१ गावे, देवरी २४ गावे व ८ वाड्या व आमगाव तालुक्यातील ३७ गावे व ९ वाड्यातील नागरिकांवर जलसंकट ओढावले आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५ कोटी ८९ लाख रुपयांच्या पाणीटंचाई आराखड्याला मंजुरी दिली आहे.

....

कोरोना संकटामध्ये पाणीटंचाई

कोरोना संसर्ग जिल्ह्यातही सातत्याने वाढत चालला आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रासला आहे. त्यात आता पाणीटंचाईची भर पडल्याने आगामी दोन महिने कसे काढावे, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी होत आहे.