शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणी टंचाई: उपाय योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:00 IST

मार्च महिन्याला सुरूवात झाली असून जिल्ह्यातील नागरिक पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देत आहे. जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईवर तोडगा काढणे अपेक्षीत असताना ते मात्र अद्यापही कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त आहे.

ठळक मुद्दे७२ लाखांच्या निधीची प्रतीक्षा : बोअरवेल पाईप खरेदी रखडली, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतगोंदिया : मार्च महिन्याला सुरूवात झाली असून जिल्ह्यातील नागरिक पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देत आहे. जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईवर तोडगा काढणे अपेक्षीत असताना ते मात्र अद्यापही कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त आहे. परिणामी ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासूनच भटकंती करण्याची पाळी आली आहे.जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या केवळ ५३ टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. जिल्ह्याची भूजल पातळी सुध्दा २ मीटरने खालावली असून बोअरवेल व विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे मागील महिन्यापासून गोरेगाव, तिरोडा, सडक-अर्जुनी तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने सुध्दा यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता वर्तविली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने यावर त्वरीत उपाय योजना करण्याची गजर होती. मात्र प्रशासनाने पाणी टंचाईचा मुद्दा अद्यापही गांर्भियाने घेतला नसल्याने गावकºयांचे मात्र हाल होत आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मागील सहा महिन्यापासून बोअरवेलचे पाईप आणि इतर सुट्या सामनाची टंचाई आहे. या सामानाची खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे या विभागाचे अधिकारीच सांगतात. जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी हा मुद्दा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सातत्याने लावून धरला होता. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीतून यासाठी निधी देण्यात आला. मात्र यानंतर स्थायी समितीची प्रोसीडींग कॉपी तयार न झाल्याने लेखा विभागाने हा निधी देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. सभा होवून पंधरा दिवसांचा कालावधी लोटूनही सभेची अवतरण प्रत तयार केली जात नाही.ही जिल्हा परिषदेसाठी चिंतेची बाब आहे. त्यानंतर अहवाल तयार झाला तर जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा.दयानिधी यांनी सर्व खंडविकास अधिकाऱ्यांना त्यांना किती बोअरवेलचे पाईप आणि साहित्याची गरज आहे याचा अहवाल मागविला. हा अहवाल आल्यानंतरच पाणी टंचाई निवारणार्थ निधी देण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. अद्यापही काही खंडविकास अधिकाºयांनी अहवाल पाठविला नसल्याची माहिती आहे.त्यामुळे निधी उपलब्ध असून देखील त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्यापासून पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना केवळ कागदावरच सुरू असल्याचे चित्र आहे.पालकमंत्र्यांचे निर्देश धाब्यावरमहिनाभरापूर्वीच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना त्वरीत राबविण्याचे निर्देश दिले. तसेच यासाठी निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे सांगितले होते. मात्र पालकमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतरही जिल्हा परिषदेकडून उपाय योजना करण्यास दिंरगाई केली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी पालकमंत्र्यांचे निर्देश सुध्दा जुमानत नसल्याचे चित्र आहे.बैठकीत चर्चा कशावरजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दर तीन चार दिवसांनी खंडविकास अधिकाऱ्यांसह इतर अधिकाºयांची बैठक बोलवितात. मात्र त्यात पाणी टंचाई सारख्या गंभीर विषयावर चर्चा होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. जर बैठकीत पाणी टंचाईवर चर्चा झाली असती तर सीईओंना यासंबंधीचा अहवाल परत मागविण्याची वेळ आली नसती असे बोलले जाते.