शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

इमारतीच्या छतावरचे पाणी जमिनीत मुरविणार

By admin | Updated: May 24, 2016 01:51 IST

आज पाणी वाया जाईल तर उद्या तहानेने व्याकुळ होऊन जीव जाईल.

हॉटेल मालकाचा संकल्प : लोकमतच्या जलमित्र अभियानाला वाढता प्रतिसादगोंदिया : आज पाणी वाया जाईल तर उद्या तहानेने व्याकुळ होऊन जीव जाईल. यासाठी पाणी वाचविण्याचा संदेश देणाऱ्या लोकमतच्या मोहिमेला गोंदियात सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच एक परिणाम म्हणून गोंदियातील हॉटेल पॅसिफिकच्या संचालकांनी पावसाचे हॉटेल परिसरात पडणारे पाणी जमिनीत मुरविण्याचा (रेन वॉटर हार्वेस्टींग) संकल्प केला आहे. हॉटेलच्या छतावर पडणारे पाणी सरळ विहीरीत सोडण्याची व्यवस्था ते करीत आहेत.सतत होणाऱ्या वृक्षतोडीमुळे अवर्षण होत आहे. त्यातच पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी शासनाकडूनही पुढाकार घेतला जात आहे. मात्र लोकांमध्ये पाणी बचतीसाठी अजूनही पाहीजे त्या प्रमाणात जनजागृती नसल्यामुळे पावसाळ्यात धो-धो करीत बरसणारे पाणी नदी नाल्याच्यांच्या माध्यमातून वाहून जाते. त्या पाण्याला जमिनीत मुरवल्या जात नसल्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी आपली छोटीशी मदत भविष्यात मोलाची ठरणार, जे जाणून पॅसिफीक हॉटेलचे संचालक झवेर चावडा व राजेश चावडा यावर्षी पावसाचे पाणी जमीनीत मुरविण्यासाठी व्यवस्था करीत आहेत. त्यांच्या हॉटेलचे ५००० स्केअर फूट छत आहे. त्यावर पडणारे पाणी पाईपच्या माध्यमातून मागच्या भागात असलेल्या विहीरीत सोडले जाईल, अशी व्यवस्था केली आहे. यावर्षी पाण्याचा अपव्यय होणार नाही अशी काळजी त्यांनी घेतली आहे. या पद्धतीने वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी फारसा खर्च नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. छताच्या मागच्या भागात विहीर असल्याने छताच्या पाईपला एक पाईप जोडून छताचे ते पाणी सरळ विहीरीत टाकले जाणार आहे. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार पाहून परिसरातील लोक व मित्रमंडळींचा तसाच प्रयोग करण्याचा विचार आहे. (तालुका प्रतिनिधी)२०० रोपट्यांचेही संवर्धनपाण्याबरोबर वृक्ष बचाव ही संकल्पना राजेश चावडा यांनी समोर आणून मित्र मंडळींच्या माध्यमातून त्यांनी रेलटोली परिसरात २०० कडुनिंबाची झाडे रस्त्यालगत पाच सहा वर्षापूर्वी लावली होती. ती झाडे आता मोठी झाली असून आता मोठ्या प्रमाणात सावली देत आहेत.खर्चाबरोबर बचतीचा मार्गपॅसिफीक हॉटेलमध्ये दररोज हजारो लीटर पाणी वापरले जाते. वर्षभरात वापरण्यात येणारे पाणी पावसाळ्याच्या दोन महिन्यात बचत करता यावे याच उद्देशातून त्यांनी पाणी वाचविण्याची सुरूवात केली आहे. आपल्याबरोबर इतरांनीही हा प्रयोग करावा यासाठी त्यांनी जल बचावचा संदेश देणारे पत्रक छापण्यास दिले आहेत. ते पत्रक आल्यावर शहरात वाटप करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पाण्याची वाढती टंचाई पाहून प्रत्येक नागरिकांनी पाणी बचतीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ज्यांच्या घराच्या छताचे पाणी सहजरित्या विहीरीत टाकण्यात येते त्यांनी ते पाणी विहीरीत सोडण्याची व्यवस्था करावी, अन्यथा आपल्या घराचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी पाच फुटाचा चौरस व खोल खड्डा खोदावा, ज्यामुळे पाण्याला जमिनीत मुरवता येईल.- झवेर चावडा संचालक, पॅसिफीक हॉटेल गोंदिया