शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

जिल्ह्यातील ६२ गावे जलयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:01 IST

राज्याला २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी व पाणीे टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये निवड झालेले ६२ गाव शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत. मागील तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत वाढ

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याला २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी व पाणीे टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये निवड झालेले ६२ गाव शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत. मागील तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी या गावांत आता जलयुक्त शिवारच्या कामाची गरज नाही.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २१५-१६ वर्षात ९४ गावे, २०१६-१७ मध्ये ७७ गावे, व २०१७-१८ या वर्षात ६३ गावांची निवड करण्यात आली होती.या अभियानाच्या पहिल्या टप्यात ९४ गावे, दुसऱ्या टप्यात ७७ गावे वॉटर न्यूट्रल झाल्यानंतर तिसºया टप्यात ६३ गावांपैकी ६२ गावे शंभर टक्के तर एक गाव ८० टक्के वॉटर न्यूट्रल झाले आहे.सन २०१७-१८ निवड झालेल्या गावांत गोरेगाव, गोंदिया, तिरोडा या तालुक्यातील प्रत्येकी १० गावे, आमगाव व सडक अर्जुनी प्रत्येकी ६ गावे, देवरी, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा तालुक्यातील प्रत्येकी सात गावांची निवड करण्यात आली होती. ही सर्व गावे शंभरटक्के वॉटर न्यूट्रल झाली आहेत.केवळ सालेकसा तालुक्यातील एक गाव ८० टक्के वॉटर न्यूट्रल झाला आहे. सन २०१७-१८ मध्ये अभियानांतर्गत १९९१ कामांना मंजूरी देण्यात आली होती. यात कृषी विभाग १४३८, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग १८३, पंचायत समिती १३६, जलसंधारण २०, वन विभाग १३४ तर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ८० कामांचा समावेश आहे. मंजूर कामांपैकी १७५५ कामांना कार्यारंभ करण्याचे आदेश देण्यात आले. १३५९ कामे सुरू करण्यात आले. निवड झालेली सर्व गावांत जलयुक्त शिवार कामांमुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे.यावर्षीची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार