शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

जिल्ह्यातील जलाशये झाली ड्राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:39 IST

मे महिन्यातच जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठे प्रकल्प ड्राय झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. तर तलाव व बोड्यासुध्दा कोरड्या पडल्या असल्याने पशुपालकांसमोर जनावरांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईच्या समस्येत वाढ : पशुपालक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मे महिन्यातच जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठे प्रकल्प ड्राय झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. तर तलाव व बोड्यासुध्दा कोरड्या पडल्या असल्याने पशुपालकांसमोर जनावरांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर पाणी टंचाईची समस्या बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. मात्र मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. तर २५ प्रकल्पांमध्ये थेंब भरही पाणी शिल्लक नाही. मध्यम प्रकल्पातील कलपाथरी, लघू प्रकल्पातील ज्या तलावांमध्ये ही स्थिती आहे त्यात मध्यम प्रकल्पाच्या कलपाथरी, लघू प्रकल्पाच्या डोंगरगाव, रिसाला, ओवारा, जुन्या मालगुजारी तलावांमध्ये भानपूर, बोपाबोडी, चान्ना बाक्टी, चिरचाळबांध, चिरचाडी, फुलचूर, गिरोली, कोहलगाव, कोसबी बाकी, ककोडी, काटी, कोकणा, खोडशिवनी, खाडीपार, माहुली, मालीजुंगा, मेंढा, नांदलपार, पळसगाव (सौंदड), पळसगाव, तेढा यांचा समावेश आहे. या गावांमध्ये काही प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील काही मोठ्या तलाव व जलशयांमध्ये पुरेसा जलसाठा नाही. तिरोडा तालुक्याच्या चोरखमारा येथे १.९१, गोंदिया तालुक्याच्या खळबंदामध्ये ५.३३, गोरेगाव तालुक्याच्या कटंगी येथे ६.९९ टक्के पाणी बाकी आहे. लघू प्रकल्पाच्या भदभद्या येथे ४.७१, गुमडोह २.८१, कालीमाटी ५.२६, पिपरिया २.९८, पांगडी ३.५३, सोनेगाव ६.७१, बेवारटोला ७.५९, जुन्या मालगुजारी तलावांमधून भिवखिडकी ७.९८, खैरी येथे ६.५७, कोसमतोंडी ३.३०, लेंडेझरी ४.२१, सौंदड ३.३६ व ताडगावमध्ये ३.४६ टक्के पाणी उरले आहे. या तलावांपैकी बहुतेक तलाव कोरडे पडले आहे.केवळ ९ टक्केच पाणीसाठागोंदिया जिल्ह्याच्या मध्यम, लघू व जुन्या मालगुजारी तलावांची संख्या ६५ आहे. या सर्व तलावांमध्ये ९.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी जिल्ह्याच्या तलावांमध्ये आजच्या स्थितीत १७.८० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मध्यम प्रकल्पाच्या ९ तलावांमध्ये ७.०७, लघू प्रकल्पाच्या २२ तलावांमध्ये ११.६३ व जुन्या मालगुजारी ३८ तलावांमध्ये ९.८९ टक्के पाणी शिल्लक आहे. मागील वर्षी केवळ ६० टक्के पाऊस झाल्यामुळे लवकरच पाणी आटले आहे. पुढील १५ दिवसांनंतर जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार होवू शकते. आतापासूनच प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई