शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जिल्ह्यातील जलाशये झाली ड्राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:39 IST

मे महिन्यातच जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठे प्रकल्प ड्राय झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. तर तलाव व बोड्यासुध्दा कोरड्या पडल्या असल्याने पशुपालकांसमोर जनावरांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईच्या समस्येत वाढ : पशुपालक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मे महिन्यातच जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठे प्रकल्प ड्राय झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. तर तलाव व बोड्यासुध्दा कोरड्या पडल्या असल्याने पशुपालकांसमोर जनावरांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर पाणी टंचाईची समस्या बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. मात्र मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. तर २५ प्रकल्पांमध्ये थेंब भरही पाणी शिल्लक नाही. मध्यम प्रकल्पातील कलपाथरी, लघू प्रकल्पातील ज्या तलावांमध्ये ही स्थिती आहे त्यात मध्यम प्रकल्पाच्या कलपाथरी, लघू प्रकल्पाच्या डोंगरगाव, रिसाला, ओवारा, जुन्या मालगुजारी तलावांमध्ये भानपूर, बोपाबोडी, चान्ना बाक्टी, चिरचाळबांध, चिरचाडी, फुलचूर, गिरोली, कोहलगाव, कोसबी बाकी, ककोडी, काटी, कोकणा, खोडशिवनी, खाडीपार, माहुली, मालीजुंगा, मेंढा, नांदलपार, पळसगाव (सौंदड), पळसगाव, तेढा यांचा समावेश आहे. या गावांमध्ये काही प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील काही मोठ्या तलाव व जलशयांमध्ये पुरेसा जलसाठा नाही. तिरोडा तालुक्याच्या चोरखमारा येथे १.९१, गोंदिया तालुक्याच्या खळबंदामध्ये ५.३३, गोरेगाव तालुक्याच्या कटंगी येथे ६.९९ टक्के पाणी बाकी आहे. लघू प्रकल्पाच्या भदभद्या येथे ४.७१, गुमडोह २.८१, कालीमाटी ५.२६, पिपरिया २.९८, पांगडी ३.५३, सोनेगाव ६.७१, बेवारटोला ७.५९, जुन्या मालगुजारी तलावांमधून भिवखिडकी ७.९८, खैरी येथे ६.५७, कोसमतोंडी ३.३०, लेंडेझरी ४.२१, सौंदड ३.३६ व ताडगावमध्ये ३.४६ टक्के पाणी उरले आहे. या तलावांपैकी बहुतेक तलाव कोरडे पडले आहे.केवळ ९ टक्केच पाणीसाठागोंदिया जिल्ह्याच्या मध्यम, लघू व जुन्या मालगुजारी तलावांची संख्या ६५ आहे. या सर्व तलावांमध्ये ९.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी जिल्ह्याच्या तलावांमध्ये आजच्या स्थितीत १७.८० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मध्यम प्रकल्पाच्या ९ तलावांमध्ये ७.०७, लघू प्रकल्पाच्या २२ तलावांमध्ये ११.६३ व जुन्या मालगुजारी ३८ तलावांमध्ये ९.८९ टक्के पाणी शिल्लक आहे. मागील वर्षी केवळ ६० टक्के पाऊस झाल्यामुळे लवकरच पाणी आटले आहे. पुढील १५ दिवसांनंतर जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार होवू शकते. आतापासूनच प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई