शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जिल्ह्यातील जलाशये झाली ड्राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:39 IST

मे महिन्यातच जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठे प्रकल्प ड्राय झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. तर तलाव व बोड्यासुध्दा कोरड्या पडल्या असल्याने पशुपालकांसमोर जनावरांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईच्या समस्येत वाढ : पशुपालक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मे महिन्यातच जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठे प्रकल्प ड्राय झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. तर तलाव व बोड्यासुध्दा कोरड्या पडल्या असल्याने पशुपालकांसमोर जनावरांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर पाणी टंचाईची समस्या बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. मात्र मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. तर २५ प्रकल्पांमध्ये थेंब भरही पाणी शिल्लक नाही. मध्यम प्रकल्पातील कलपाथरी, लघू प्रकल्पातील ज्या तलावांमध्ये ही स्थिती आहे त्यात मध्यम प्रकल्पाच्या कलपाथरी, लघू प्रकल्पाच्या डोंगरगाव, रिसाला, ओवारा, जुन्या मालगुजारी तलावांमध्ये भानपूर, बोपाबोडी, चान्ना बाक्टी, चिरचाळबांध, चिरचाडी, फुलचूर, गिरोली, कोहलगाव, कोसबी बाकी, ककोडी, काटी, कोकणा, खोडशिवनी, खाडीपार, माहुली, मालीजुंगा, मेंढा, नांदलपार, पळसगाव (सौंदड), पळसगाव, तेढा यांचा समावेश आहे. या गावांमध्ये काही प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील काही मोठ्या तलाव व जलशयांमध्ये पुरेसा जलसाठा नाही. तिरोडा तालुक्याच्या चोरखमारा येथे १.९१, गोंदिया तालुक्याच्या खळबंदामध्ये ५.३३, गोरेगाव तालुक्याच्या कटंगी येथे ६.९९ टक्के पाणी बाकी आहे. लघू प्रकल्पाच्या भदभद्या येथे ४.७१, गुमडोह २.८१, कालीमाटी ५.२६, पिपरिया २.९८, पांगडी ३.५३, सोनेगाव ६.७१, बेवारटोला ७.५९, जुन्या मालगुजारी तलावांमधून भिवखिडकी ७.९८, खैरी येथे ६.५७, कोसमतोंडी ३.३०, लेंडेझरी ४.२१, सौंदड ३.३६ व ताडगावमध्ये ३.४६ टक्के पाणी उरले आहे. या तलावांपैकी बहुतेक तलाव कोरडे पडले आहे.केवळ ९ टक्केच पाणीसाठागोंदिया जिल्ह्याच्या मध्यम, लघू व जुन्या मालगुजारी तलावांची संख्या ६५ आहे. या सर्व तलावांमध्ये ९.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी जिल्ह्याच्या तलावांमध्ये आजच्या स्थितीत १७.८० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मध्यम प्रकल्पाच्या ९ तलावांमध्ये ७.०७, लघू प्रकल्पाच्या २२ तलावांमध्ये ११.६३ व जुन्या मालगुजारी ३८ तलावांमध्ये ९.८९ टक्के पाणी शिल्लक आहे. मागील वर्षी केवळ ६० टक्के पाऊस झाल्यामुळे लवकरच पाणी आटले आहे. पुढील १५ दिवसांनंतर जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार होवू शकते. आतापासूनच प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई