शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पाऊचचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

राज्यात प्लास्टीक बंदी करण्यात आली आहे.त्यांतर्गत प्लास्टिकपासून तयार विविध वस्तूंचा समावेश असून पाणी पाऊचही त्यात येतात. मात्र तरिही त्यांचा पुरवठा व वापर सर्रास सुरूच आहे. येत्या १ मे पर्यंत राज्य सिंगल यूज प्लास्टीक मुक्त करण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. असे असताना मात्र प्लास्टिकचा वापर सुरूच असून त्यातच पाणी पाऊचचाही वापर दिसून येत आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेची कारवाई : १०४ बॅग्स जप्त व पाच हजार रूपयांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बंदी असलेल्या पाणी पाऊचचा साठा येथील नगर परिषदेच्या पथकाने मंगळवारी (दि.१७) धाड घालून जप्त केला. रामनगर परिसरातील पाणी पाऊच वितरकाच्या घरातून हा माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये पाणी पाऊचच्या १०४ बॅग्स जप्त करून संबंधिताला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.राज्यात प्लास्टीक बंदी करण्यात आली आहे.त्यांतर्गत प्लास्टिकपासून तयार विविध वस्तूंचा समावेश असून पाणी पाऊचही त्यात येतात. मात्र तरिही त्यांचा पुरवठा व वापर सर्रास सुरूच आहे. येत्या १ मे पर्यंत राज्य सिंगल यूज प्लास्टीक मुक्त करण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. असे असताना मात्र प्लास्टिकचा वापर सुरूच असून त्यातच पाणी पाऊचचाही वापर दिसून येत आहे. हा प्रकार बघता नगर परिषदेच्या पथकाने रामनगर परिसरातील पाणी पाऊच वितरक श्याम ट्रेडर्स संचालक किशोर चौरसीया यांच्या घरावर मंगळवारी (दि.१७) धाड घातली. या धाडीत पथकाने घरातून पाणी पाऊचच्या १०४ बॅग्स जप्त केल्या. तसेच त्यांना पाच हजार रूपयांचा दंड करून वसुली केली.ही कारवाई, आरोग्य निरीक्षक गणेश हतकय्या, मुकेश शेंद्रे, मनिष बैरिसाल, प्रफुल पानतवने, सुमित शेंद्रे, प्रतीक मानकर, परेश शेंडे, जसवंत महावत यांनी केली.विशेष म्हणजे, पथकाने ही कारवाई केल्यानंतर काही जणांचे फोनही पथकातील सदस्यांना आल्याची माहिती आहे. शासनाकडून एकीकडे प्लास्टिक बंदीसाठी निर्देश दिले जात आहेत. तर दुसरीकडे मात्र स्थानिकांकडूनच त्यामध्ये आडकाठी आणली जात असल्याचेही बोलले जात आहे.शहरात प्लास्टिकचा सर्रास वापरराज्यात प्लास्टिक बंदी असली तरीही आजघडीला प्लास्टिक वस्तूंचा सर्रास वापर सुरूच असल्याचेही दिसून येत आहे. सर्वात जास्त वापर बाजारात होत असून आजही प्लास्टिक पिशव्यांतून सामान दिले जात आहे.मात्र नगर परिषदेने अद्याप कारवाई केली नसल्याचे दिसते.बाजारातील प्लास्टिक व्यवसायीकांकडे धडक दिल्यास नक्कीच प्लास्टिक वापर नियंत्रणात येणार. शिवाय, यामध्ये कुणीही राजकारण न केल्यास येत्या १ मे पर्यंत शहर सिंगल यूज प्लास्टिक मुक्त होऊ शकणार.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMuncipal Corporationनगर पालिका