शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजना आराखडा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 21:53 IST

जलयुक्त शिवार योजना २०१८-१९ साठी निवड झालेल्या तालुक्यातील गावात करावयाच्या जलसंधारण कामांचे नियोजन करण्यासंबंधाने तालुकास्तरीय जलयुक्त शिवार योजना समितीची बैठक नुकतीच पंचायत समिती बचत भवनात घेण्यात आली.

ठळक मुद्देकामांचा आराखडा तयार केला : १६ गावांसाठी २७७ कामे प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जलयुक्त शिवार योजना २०१८-१९ साठी निवड झालेल्या तालुक्यातील गावात करावयाच्या जलसंधारण कामांचे नियोजन करण्यासंबंधाने तालुकास्तरीय जलयुक्त शिवार योजना समितीची बैठक नुकतीच पंचायत समिती बचत भवनात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती अरविंद शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती करुणा नांदगावे, पंचायत समिती सदस्य रामलाल मुंगणकर, तालुका जलयुक्त शिवार समिती सचिव तथा तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, सहायक खंड विकास अधिकारी मयुर आंदेलवाड, लपाजिपचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी सुभाष घरतकर, वनपरिक्षेत्राधिकारी छगन रहांगडाले उपस्थित होते.जलयुक्त शिवार योजनेत यावर्षी अरततोंडी, इंजोरी, निलज, धाबेटेकडी (आदर्श), चापटी, तिडका (करड), देऊळगाव (बोदरा), पांढरवानी (रैय्यत), सिरेगावबांध, भुरसीटोला, संजयनगर, सुकळी, सोमलपूर, चान्ना, चुटिया, कोहलगाव या १६ गावांचा समावेश करण्यात आला आहे.सदर गावामध्ये शासनाच्या विविध यंत्रणामार्फत जलसं:धारणाची कामे मोठ्या प्रमाणात करुन गावातील तळे, बोड्या, बंधाऱ्यामधील पाण्याची सिंचन क्षमता वाढविण्यात प्रयत्न केला जाणार आहे. निवड झालेल्या गावांमध्ये कोणती कामे करायची, आराखडा बनवून प्रस्तावित कामे करण्यासाठी स्थानिक गावचे सरपंच, पदाधिकारी यांना या बैठकीत खास निमंत्रित करण्यात आले होते. तसेच ग्रामसेवक, विविध शासकीय यंत्रणाचे अधिकारी, कर्मचारी, मग्रारोहयो पं.स.चे सहायक कार्यक्रम अधिकारी, अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध, गोठणगावचे वनपरिक्षेत्राधिकारी, लपाजिपचे शाखा व कनिष्ठ अभियंता, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, जलसंधारण विभाग देवरीचे कनिष्ठ अभियंता खोकले तसेच पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. सभेत निवड झालेल्या गावातील पदाधिकाºयांनी विविध कामे सुचविली. बैठकीत सर्वांच्या समन्वयातून गावाच्या परिस्थितीनुरुप कामाचा आराखडा तयार करण्यात आला. १६ गावांसाठी २७७ कामे प्रस्तावित करण्यात आली. याप्रसंगी शिवणकर यांनी, जलयुक्त शिवार योजना गावातील शेतकºयांसाठी एक वरदान आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे एका पाण्यासाठी धान पिकाच्या उत्पादनापासून वंचित रहावे लागले. जलयुक्त शिवाराच्या जलसंधारणाच्या विविध कामामुळे जलसिंचन साठ्यात वाढ होवून संरक्षित पाण्यात वाढ होते. जलसाठा वाढल्याने पिकांच्या उत्पादनासोबत गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार