शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:09 IST

भविष्यात निर्माण होणारी पाण्याची टंचाई व दुष्काळ दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे .....

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : गावपातळीवरील प्रतिनिधींचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भविष्यात निर्माण होणारी पाण्याची टंचाई व दुष्काळ दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.इंडियन सोशल वेलफेयर सोसायटी व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्राम हिवरा येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित जलयुक्त शिवार अभियानांंतर्गत तीन दिवसीय गावपातळीवरील प्रतिनिधींचे प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रशिक्षणाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, प्रशिक्षक म्हणून इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर, जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, कृषी सहायक डी.के.ठाकूर, कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. सविता पवार, महेंद्र मेश्राम, तालुका कृषी अधिकारी निरज जागरे, नाबार्डचे सहायक व्यवस्थापक मनोहर वाकडे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी काळे यांनी, जलयुक्त शिवार अभियानाची माहिती गावातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी जलयुक्त शिवार अभियानाची गरज आणि वैशिष्ट्ये, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत विविध समित्यांची रचना व कार्यपध्दती, क्षेत्रीय उपचाराची माहिती, पाण्याचे अंदाजपत्रक, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत गावाचा आराखडा तयार करणे, जल व्यवस्थापन व तयार मतांची देखभाल दुरुस्ती व हस्तांतरण अश्या विविध विषयावर मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणाला गोंदिया तालुक्यांतर्गत १० गावातील जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवड झालेल्या गावातील सरपंच, महिला प्रतिनिधी, उपसरपंच, ग्राम कार्यकर्ता, प्रगतीशील शेतकरी, ग्रामसेवक, कृषी सहायक, कृषी मित्र व ग्रामसेवक उपस्थित होते. या तीन दिवसीय प्रशिक्षणादरम्यान क्षेत्रभेट दाखविण्यात आली. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी मार्गदर्शक पुस्तीका व प्रमाणपत्र देण्यात आले.संचालन ज्ञानेश्वर पटले यांनी केले. आभार गजेंद्र मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी संजा पटले, पूर्णप्रकाश कुथेकर, विशाल मेश्राम, गौतम बोरकर व कर्मचाºयांनी सहकार्य केले.