शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:09 IST

भविष्यात निर्माण होणारी पाण्याची टंचाई व दुष्काळ दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे .....

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : गावपातळीवरील प्रतिनिधींचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भविष्यात निर्माण होणारी पाण्याची टंचाई व दुष्काळ दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.इंडियन सोशल वेलफेयर सोसायटी व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्राम हिवरा येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित जलयुक्त शिवार अभियानांंतर्गत तीन दिवसीय गावपातळीवरील प्रतिनिधींचे प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रशिक्षणाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, प्रशिक्षक म्हणून इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर, जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, कृषी सहायक डी.के.ठाकूर, कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. सविता पवार, महेंद्र मेश्राम, तालुका कृषी अधिकारी निरज जागरे, नाबार्डचे सहायक व्यवस्थापक मनोहर वाकडे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी काळे यांनी, जलयुक्त शिवार अभियानाची माहिती गावातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी जलयुक्त शिवार अभियानाची गरज आणि वैशिष्ट्ये, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत विविध समित्यांची रचना व कार्यपध्दती, क्षेत्रीय उपचाराची माहिती, पाण्याचे अंदाजपत्रक, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत गावाचा आराखडा तयार करणे, जल व्यवस्थापन व तयार मतांची देखभाल दुरुस्ती व हस्तांतरण अश्या विविध विषयावर मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणाला गोंदिया तालुक्यांतर्गत १० गावातील जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवड झालेल्या गावातील सरपंच, महिला प्रतिनिधी, उपसरपंच, ग्राम कार्यकर्ता, प्रगतीशील शेतकरी, ग्रामसेवक, कृषी सहायक, कृषी मित्र व ग्रामसेवक उपस्थित होते. या तीन दिवसीय प्रशिक्षणादरम्यान क्षेत्रभेट दाखविण्यात आली. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी मार्गदर्शक पुस्तीका व प्रमाणपत्र देण्यात आले.संचालन ज्ञानेश्वर पटले यांनी केले. आभार गजेंद्र मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी संजा पटले, पूर्णप्रकाश कुथेकर, विशाल मेश्राम, गौतम बोरकर व कर्मचाºयांनी सहकार्य केले.