शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

जल, जंगल, जमिनीसाठी लढा

By admin | Updated: April 8, 2015 01:31 IST

अनेक वर्षांपासून आदिवासी वन परिसरात वास्तव्यास असताना त्यांना जल, जंगल व जमिनीचा हक्क नाही.

विजय मानकर सालेकसाअनेक वर्षांपासून आदिवासी वन परिसरात वास्तव्यास असताना त्यांना जल, जंगल व जमिनीचा हक्क नाही. त्यामुळे आदिवासीना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सालेकसा तालुक्यात मांझी सेना गठित करण्यात आली आहे. जिल्ह्यात इतरही क्षेत्रात नैसर्गिक संपदेला सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा पातळीवरसुध्दा मांझी सेना गठित करण्यात आली आहे. सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडून पुढाकार घेतला जात आहे. जिल्हा संगटनेचे मुख्यालय देवरी तालुक्यात तर सालेकसा तालुका मुख्य परगना स्थळ बेवारटोलाच्या नवीन वसाहतीत स्थापित करण्यात आले आहे. या मांझी सेनेच्या नवनिर्मितीने आदिवासी समाजात नवचैतन्य संचारलेले आहे. शासनाच्या विभागामार्फत नैसर्गिक संपतीची समृध्दी होण्याऐवजी घटच मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा परिस्थितीत मांझी सेनेसारख्या आदिवासीचे संगठनच या देशातील जल, जंगल, जमीन, पहाड, नद्या इत्यादी नैसर्गिक संपत्तीचे सरंक्षण करू शकतात, अशा विश्वास आदिवासी समाजात वाढत चालला आहे. गणवेश सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेचा, परंतु विचारधारा महात्मा गांधी यांची अंगिकार करून नैसर्गिक साधन-संपत्ती व यात निवास करण्याऱ्या भारतीय मूळनिवासी यांचे सरंक्षण करणे, हा उद्देश समोर ठेवून कंगला मांझी या क्रांतिवीराने या सेनेची कल्पना मांडली होती. त्या दिशेने काम करीत स्वातंत्र्याच्या पूर्वी व स्वातंत्र्यानंतरही आपले अभियान अविरत सुरू ठेवले. त्यांनी गणित केलेल्या मांझी सैनिकांच्या मदतीने आदिवासींच्या संपत्ती व अधिकाराचे रक्षण करण्याचे प्रयत्न केले. भारतात स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून एका स्वतंत्र गोंडवाना राज्याच्या निर्मितीची कल्पना मांडणारे कंगणा मांझी यांचे मूळ कार्यक्षेत्र छत्तीसगड व त्या आसपासचे प्रांत राहिले असून त्यांचे मूळ नाव हिरासिंहदेव मांझी असे होते. वन-वन भटकणारे वनातील उत्पादनावर आपले जीवन जगणारे आदिवासी मूल्यवान धन संपदेच्या सान्निध्यात राहूनसुध्दा दारिद्र्याचे जीवन जगत आहेत. हे बघून त्यांनी स्वत:ला कंगला मांझी असे नाव दिले आणि शेवटपर्यंत आदिवासींच्या उत्कर्षासाठी स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या या प्रेरणादायी जीवन कार्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही मांझी सैनिक यांचे संगठन आता देश पातळीवर काम करीत आहे. भारताच्या गोंडवाना परिसरातील लोक प्राचीन काळापासून आतापर्यंत शक्तीशाली व बलाढ्य असूनसुध्दा गाव खेड्यात रानावनात माकडांसारखे चुपचाप बसून आहेत. ही पृथ्वी, जंगल, जलाशय आपली आहे. आम्ही या भूमिवरचे गण असूनसुध्दा चुपचाप हातात हात ठेवून बसून आहोत. आदिवासींनी कधीही दुसऱ्यांच्या हक्कावर नजर टाकली नाही. परंतु आदिवासींवर चतुर-चालाक लोकांनी नेहमी आक्रमण करून लुटण्याचा प्रयत्न केला. अनेकवेळा आदिवासींनी या गोष्टींचा विरोध केला. परंतु त्यांना योग्य दिशा देणारे नेतृत्व लाभले नाही. त्यांच्यावरील अत्याचार सुरूच राहिले. आदिवासी समाज भोळाभाबडा साधा-सरळ स्वभावाचा असल्याने याचा गैरफायदा घेत विदेशी व आक्रमणकारी लोकांनी त्यांची मौल्यवान संपत्ती लुटण्याचे काम केले. याचा परिणाम म्हणजे आदिवासी नेहमी शोषित-पीडित राहिले. त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्तीचा बेलगाम दुरूपयोग झाल्याने प्रकृतीचे संतुलन बिघडत चालले आहे. या सर्व बाबींवर विचार करीत आता मांझी सैनिक संगठीत होऊन कामाला लागत आहेत. मांझी सेनेचे कार्य आणि कर्तव्य जल, जंगल, जमीन व त्यावरील मानवी जीवनासह सर्व प्राणी-पक्ष्यांचे सरंक्षण करणे, आपल्या धर्माचे पालन करणे, सर्व धर्मांचा आदर करणे, सुख, शांती व समृध्दी वाढविण्यात सदैव तत्पर राहणे, दीन-दुबळ्यांच्या मदतीसाठी धावणे, पूज्य जनांचे आदेश मानने, देश राज्यासाठी समर्पित असणे, स्वत:चे चारित्र्य पवित्र ठेवणे आणि सर्वांच्या विकासासह आपला विकास करणे.