शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कुलर मशीन ठेवली भर उन्हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:18 IST

मागील आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून पाऱ्याने चाळीस पार केली आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालयाचा प्रताप : रूग्णांवर गरम पाणी पिण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून पाऱ्याने चाळीस पार केली आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. मात्र अशा स्थितीत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची मशिन रुग्णालयाच्या आवारात भर उन्हात ठेवल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना उन्हाचे चटके सहन करीत गरम पाणी प्यावे लागत आहे.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरुन चर्चेत असते. आता हे वैद्यकीय महाविद्यालय उन्हात ठेवलेल्या वॉटर कुलर मशिनवरुन चर्चेत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वॉटर कुलर मशिन लावण्यात आली आहे.मात्र ही मशिन रुग्णालयाच्या इमारतीत लावण्याऐवजी ती बाहेर उघड्यावर लावण्यात आली आहे. त्यामुळे या मशिनचे पाणी थंड होण्याऐवजी गरम होत आहे. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना भर उन्हात उभे राहून पाणी प्यावे लागत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात वॉटर कुलर मशिन लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. पण, रुग्णालय प्रशासनाने कोणता विचार करुन ही मशिन रुग्णालयाच्या आवारात भर उन्हात ठेवली हे मात्र समजण्या पलिकडे आहे.विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातानी प्रसिध्दी पत्रक काढून वाढत्या तापमानामुळे उष्माघाताची शक्यता असून काळजी घेण्यासाठी दिवसातून सात ते आठ लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनीच काढलेल्या प्रसिध्दी पत्रकाचा त्यानाच विसर पडल्याचे चित्र आहे.यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता यांना विचारणा केली असता रुग्णांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ही वॉटर कुलर मशिन बाहेर लावल्याचे सांगितले. रात्रीच्या वेळेस वैद्यकीय महाविद्यालयाच्या दरवाज्याला कुलूप लावले जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस त्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ही मशिन आवारात लावल्याचे सांगितले.टँकरने पाणी पुरवठायेथील शासकीय महाविद्यालयात पाण्याची तीव्र समस्या आहे. बरेचदा येथील रुग्णांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तर मागील काही दिवसांपासून वैद्यकीय महाविद्यालयाला नगर परिषदेच्या टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे.विशेष म्हणजे या महाविद्यालयातील विहिरीत दररोज दोन तीन टँकर पाणी सोडले जात आहे. मात्र अद्यापही या समस्येवर कायम स्वरुपी उपाययोजना करण्यात आली नाही.पाण्याचा अपव्ययवैद्यकीय महाविद्यालयातील पाणी पुरवठ्याची व्यवस्था सुधारण्यासाठी पाईप टाकण्यात आली. मात्र पाईप लाईनचे पाईप योग्य तºहेने न जोडल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. एकीकडे वैद्यकीय महाविद्यालयातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र दुसरीकडे लिकेज पाईप लाईनमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे.