शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणच वाचवू शकते पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:42 IST

जिल्ह्यातील ९० टक्के क्षेत्र हे जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या मोसमी पावसावर अवलंबून असते. पाऊस हल्ली बेभरवशाचा झाला आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचे प्रत्येक थेंब उपयोगात आणणे महत्त्वाचे ठरते. निसर्गाच्या लहरीपणावर बंधन घालणे शेतकऱ्यांना शक्य नाही.

ठळक मुद्देकोरडवाहू शेतीसाठी आवश्यक : पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ९० टक्के क्षेत्र हे जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या मोसमी पावसावर अवलंबून असते. पाऊस हल्ली बेभरवशाचा झाला आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचे प्रत्येक थेंब उपयोगात आणणे महत्त्वाचे ठरते. निसर्गाच्या लहरीपणावर बंधन घालणे शेतकऱ्यांना शक्य नाही. परंतु आवश्यकता नसताना आलेले आगाऊ पावसाचे पाणी शेतातच साठवणे व गरजेच्या वेळी उपयोगात आणणे शक्य होऊ शकते. अतिवृष्टीमुळे होणारी मातीची धूप थांबविण्यासाठी व एका पाण्याअभावी वाया जाणारे पीक वाचविण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण अगदी महत्त्वाचे ठरते.गत दोन, तीन वर्षांपासून पाऊस अनियमित व लहरीपणामुळे पिकांची उत्पादकता बेभरवशाची झाली आहे. साधारणपणे बहुतेक पिकाला त्यांच्या पूर्ण वाढीकरिता ४०० ते ५०० मिमी पाणी लागते. जिल्ह्याची पावसाची सरासरी ८५० मिमी आहे. तरीही पिकाची उत्पादन क्षमता अधिक राहत नाही. एका पावसामुळे पिके हातचे गेल्याचे दरवर्षी निदर्शनात येते.मोसमी वाऱ्याबरोबर येणारे पाऊस हे अनियमित व लहरी आहे. आवश्यकता नसताना पाऊस खूप येतो व गरज असते तेव्हा पडत नाही. जिल्ह्यात पारंपरिक शेती पद्धतीत अवेळी आलेला व जास्त झालेला पाऊस साठवून ठेवून गरज पडेल तेव्हा वापरायची काहीही पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे निसर्गाच्या पावसावरच शेती व्यवसाय अवलंबून राहत होता. आवश्यकता नसताना आलेला पाऊस साठवून ठेवणे शेतकऱ्याच्या हाती आहे व हाच कोरडवाहू शेतीची उत्पादकता वाढविण्याचा एकमेव तोडगा आहे.काय आहे मूलस्थानी जलसंधारण ?पावसाच्या पाण्यामुळे होणारी मातीची धूप थांबविणे, अधिकाधिक पाणी शेतातच जिरावे यासाठी शेताच्या उताराला आडवी पेरणी, पट्टापीक पद्धतीने पेरणी, पावसाळ्यात उघाडीच्या दिवसांत पिकांची आंतरमशागत व उताराला आडव्या खोल सरी आदी प्रकारात पावसाचे पाणी शेतातच अधिक प्रमाणात जिरावे यासाठी केलेले उपाय, यामधून पिकाची उत्पादकता वाढते याला मूलस्थानी जलसंधारण म्हणतात.पिकांच्या ओळीमध्ये खोलसरीपेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी दोन ओळीनंतर डवऱ्याच्या सहाय्याने सरी काढल्या जातात. अशा सरीत पावसाचे पाणी अडवून शेतातच मुरते व जास्तीचे पाणी शेतातून बाहेर काढता येते.समपातळीत शेतीपिकाची पेरणी किंवा लागवड शेताच्या उताराला आडव्या दिशेने समपातळीत केल्यास पावसाचे पाणी सरीच्या किंवा पिकांच्या सर्व भागावर सारख्या प्रमाणात रुजण्यास मदत होते. वाहून जाणाऱ्या मातीचे संवर्धन होऊन पोत टिकून राहतो. कुंटूर पद्धतीने शेती करण्यासाठी शेतातील उताराच्या मधोमध गवत किंवा मातीचा एखादा बांध काढणे महत्त्वाचे ठरते.उतारास आडवी खोल सरीपिकाच्या आंतर मशागतीच्या वेळी कोळपणीला फासेच्या वरच्या बाजूला दोरी बांधून शेतात एक किंवा दोन ओळीनंतर खोल सरी पाडल्या जातात. पावसाचे पाणी खोल सरीत अडवून त्यात जिरविण्यात येते. त्यामुळे आर्द्रता कायम राहते.पट्टा पीक पद्धतज्यावेळेस आडवी पीक पद्धती जमिनीवरून वाहणारे पाण्याचे लोट अडविण्यास अपुरे पडतात. अशा वेळेस सलग एक पीक पद्धत न वापरता पट्टा पद्धतीने शेतात दोन प्रकारची पिके उतारास आडवी पेरावी.मातीची बांध बंदिस्तीशेत जमिनीचा उतार ९० ते १०० मीटरपेक्षा अधिक असल्यास शेतात मातीचे बांध टाकून उताराची लांबी कमी करावी. ज्यामुळे पावसाच्या पाण्याचे लोट कमी प्रमाणात निघून त्याद्वारे मातीची धूपही कमी करता येते. जोराचा पाऊस आल्यास बांध फुटू नये म्हणून अडविण्यात आलेले जास्तीचे पाणी नियंत्रित पद्धतीने बाहेर काढावे.रसायनांमुळे मातीचे सुपीक गुणधर्म नष्टशेत जमिनीत अधिक प्रमाणात रासायनिक खतांचा उपयोग केल्याने मातीत नैसर्गिकरीत्या असलेल्या पिकांसाठी पोषक तत्व नष्ट होतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला की त्या पाठोपाठ त्याचे दुष्परिणामसुद्धा येतात. सेंद्रिय व नैसर्गिक पालापाचोळ्यापासून तयार तसेच शेणखत यांचा वापर केल्यास चांगले परिणाम येवू शकतात.