शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

आमगावात जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:25 IST

शहराला मागील आठवडाभरापासून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. परिणामी शहरात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून पहाटेपासून पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशहरवासीयांची पाण्यासाठी भटकंती : उपाय योजनेकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शहराला मागील आठवडाभरापासून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. परिणामी शहरात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून पहाटेपासून पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र यावर उपाय योजना करण्याकडे प्रशासनाने पाठ फिरविल्याने आमगाव येथे जलसंकट निर्माण झाले आहे.आमगाव शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे. यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना स्थापन करण्यात आली. २.५० लक्ष पाणी टाकीचे व जलवाहिनीचे नविनीकरण करण्यात आले. यात माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनी या योजनेला गती दिली. या योजनेत वाढीव पाणी पुरवठा व पाणी टाकीची क्षमतेप्रमाणे वाढ करणे अपेक्षित होते.मात्र त्यासाठी प्रशासनाने कमी प्रमाणात निधी दिल्याने पाणी टाकीच्या क्षमतेत वाढ करणे शक्य झाले नाही.शहराच्या वाढत्या लोकसंख्येला या योजनेव्दारा पाणी पुरवठा शक्य होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाले कोरडे पडले आहे. त्याचाच परिणाम पाणी पुरवठा योजनेवर झाला आहे. या पाणी टाकीची क्षमता अडीच लाख लिटर क्षमतेची असली तरी प्रत्यक्षात त्यात केवळ १ लाख ५० हजार लिटर पाणी साठविले जात आहे. तर मागील बऱ्याच कालावधीपासून पाणी टाकीची साफसफाई न केल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचले आहे. पाणी पुरवठ्यासाठी केवळ दोन मोटारपंप लावले असून ते देखील अपूरे पडत आहे.यासर्व गोष्टींमुळे आमगाववासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आमगावला पाणी पुरवठा होणाऱ्या बाघ नदीचे पात्र देखील कोरडे पडल्याने मागील आठवडाभरापासून पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. शहरवासीय पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देत असताना स्थानिक प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका बजावित असल्याने नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे.भविष्यकालीन उपाय योजनांचा अभावशहरातील वाढती लोकसंख्या लक्षात पाणी पुरवठ्यासह इतर उपाययोजनात वाढ करणे आवश्यक आहे. दरवर्षी आमगाव शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. त्यावरुन नागरिकांची ओरड होते. मात्र यावर उपाय योजना करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष झाले आहे. दरवर्षी तहान लागल्यावर विहीर खोदण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे नागरिक पाण्यासाठी पायपीट करतात. लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे समाजसेविका ज्योती खोटेले यांनी सांगितले.