शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

आमगावात जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:25 IST

शहराला मागील आठवडाभरापासून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. परिणामी शहरात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून पहाटेपासून पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशहरवासीयांची पाण्यासाठी भटकंती : उपाय योजनेकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शहराला मागील आठवडाभरापासून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. परिणामी शहरात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून पहाटेपासून पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र यावर उपाय योजना करण्याकडे प्रशासनाने पाठ फिरविल्याने आमगाव येथे जलसंकट निर्माण झाले आहे.आमगाव शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे. यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना स्थापन करण्यात आली. २.५० लक्ष पाणी टाकीचे व जलवाहिनीचे नविनीकरण करण्यात आले. यात माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनी या योजनेला गती दिली. या योजनेत वाढीव पाणी पुरवठा व पाणी टाकीची क्षमतेप्रमाणे वाढ करणे अपेक्षित होते.मात्र त्यासाठी प्रशासनाने कमी प्रमाणात निधी दिल्याने पाणी टाकीच्या क्षमतेत वाढ करणे शक्य झाले नाही.शहराच्या वाढत्या लोकसंख्येला या योजनेव्दारा पाणी पुरवठा शक्य होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाले कोरडे पडले आहे. त्याचाच परिणाम पाणी पुरवठा योजनेवर झाला आहे. या पाणी टाकीची क्षमता अडीच लाख लिटर क्षमतेची असली तरी प्रत्यक्षात त्यात केवळ १ लाख ५० हजार लिटर पाणी साठविले जात आहे. तर मागील बऱ्याच कालावधीपासून पाणी टाकीची साफसफाई न केल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचले आहे. पाणी पुरवठ्यासाठी केवळ दोन मोटारपंप लावले असून ते देखील अपूरे पडत आहे.यासर्व गोष्टींमुळे आमगाववासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आमगावला पाणी पुरवठा होणाऱ्या बाघ नदीचे पात्र देखील कोरडे पडल्याने मागील आठवडाभरापासून पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. शहरवासीय पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देत असताना स्थानिक प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका बजावित असल्याने नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे.भविष्यकालीन उपाय योजनांचा अभावशहरातील वाढती लोकसंख्या लक्षात पाणी पुरवठ्यासह इतर उपाययोजनात वाढ करणे आवश्यक आहे. दरवर्षी आमगाव शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. त्यावरुन नागरिकांची ओरड होते. मात्र यावर उपाय योजना करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष झाले आहे. दरवर्षी तहान लागल्यावर विहीर खोदण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे नागरिक पाण्यासाठी पायपीट करतात. लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे समाजसेविका ज्योती खोटेले यांनी सांगितले.