शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

पाण्याचा व्यवसाय पोहोचला खेड्यांपर्यंत

By admin | Updated: May 10, 2017 01:10 IST

येथून काही वर्षापूर्वी पाण्याचाही व्यवसाय होऊ शकतो या गोष्टीवर कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते.

नवा रोजगार : प्रत्येक कार्यक्र मात शुद्ध पाण्याच्या कॅनची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : येथून काही वर्षापूर्वी पाण्याचाही व्यवसाय होऊ शकतो या गोष्टीवर कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. परंतु पाणीटंचाई आणि शुद्ध पाण्याची मागणी यामुळे या काही वर्षात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय जिल्ह्यात सर्वत्र फोफावला आहे. तसेच केवळ श्रीमंतांच्या हातात दिसणाऱ्या शुद्ध पाण्याच्या कॅन आता गावखेड्यापर्यंत पोहचल्या आहेत. शहरातील विविध समारंभात दिसणारे थंड पाण्याचे कुल क्रेज आता ग्रामीण भागातील समारंभारातही दिसत आहेत. वाढत्या उन्हासोबतच हा व्यवसाय आता तेजीत आला असून कुठे प्रतिष्ठा तर कुठे आरोग्य असे कारण पुढे करीत बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे. केवळ लग्न सोहळ््यासाठीच नव्हे तर लहानमोठ्या कार्यक्रमांतही, एवढेच नाही तर महाप्रसादाच्या कार्यक्रमातही शुद्ध व थंड पाण्याला वाढती मागणी आहे. केवळ उन्हाळ््यामध्ये चालणारा व्यवसाय आता बारा महिने सुरू आहे. शुद्ध पाण्याचा वापर ही बाब आता गरजेची झाली आहे. लग्नात हौसेच्या खर्चाला फाटा देऊन प्रत्येकजण शुद्ध पाण्याचा आग्रह धरताना दिसत आहे. साधारणत: ५०० लोकांमागे ३० पाण्याचे जार लागतात. प्रत्यक जारमध्ये २० लिटर पाणी असते. एक हजार लोकांसाठी ६० जार लागतात. सुमारे ५० रूपये प्रत्येक जारमागे आकारले जाते. प्रत्येक बाबतीत सोहळ््यात टापटीपपणा दिसून यावा तसेच पाहुण्यांची उत्तम व्यवस्था व्हावी असा सर्वांचा आग्रह असतो. लग्न कार्यात काम करणारे मनुष्यबळ दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे पंगतीऐवजी बुफेसारखे जेवणाचे प्रकार वाढले आहेत. लग्नप्रसंगासोबतच महाप्रसादालाही बुफेची व्यवस्था केली जात आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. ग्रामीण भागातही आरोग्यविषयक जागरूकता वाढली आहे. विविध समारंभासाठी शहरातून पाणी आणले जाते. दोन पाण्याच्या बाटल्यांच्या किमतीत २० लिटरचा एक जार मिळतो. त्यामुळे शहरातील व्यापारी प्रतिष्ठानने माठाच्या जागी आता पाण्याचे जार ठेवत आहेत. त्यातही उन्हाळ््यात तर पाणी व्यवसायिकांना श्वास घ्यायला वेळ राहत नसतो, एवढी त्यांच्या पाण्याची डिमांड असते. त्यामुळे स्पेशल गाड्यांतूनच डिलीव्हरी केली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. कॉल करून आपली डिमांड त्यांना कळविली की लगेच गाडी येऊन तुम्हाला डिलीवरी देऊन जाते. घरबसल्या व्यवस्था होत असल्याने शिवाय प्रतिष्ठेला साजेशे दिसत ्असल्याने नागरिकांचा कल याकडे वाढत चालला आहे. सध्या लग्नसराईची धूम सुरू आहे. प्रत्येक लग्नात पाण्याचे कॅन व प्लॉस्टिकचे ग्लॉस मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचे चित्र प्रत्येक ठिकाणी नजरेस पडते. पूर्वीच्या काळात पंगत बसायची व त्यात भोजन वाढणाऱ्यांसह पाणी वाढणारी मुले सुद्धा असायची. परंतु ही प्रथा आता कालबाह्य ठरत आहे. प्रत्येक समारंभात पाण्याचे कॅन व प्लास्टिकचे ग्लॉस ठेवले जातात. प्रत्येक व्यक्ती सेल्फ सर्व्हिसप्रमाणे कॅनजवळ जावून स्वहस्ते पाणी काढून प्राशन करतो. एका फोनवर मिळते पाणी लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे पाहुण्यांची लगबग असते. अशावेळी सर्वांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करणे सहज शक्य होत नाही. या कारणाने कूल क्रेजची मागणी वाढली आहे. एका फोनवर लागेल तेवढे शुद्ध व थंड पाणी मिळत असल्याने नागरिकांनाही ते परवडते. शुद्ध पाणी एका फोनवर जरी मिळत असले तरी ते किती शुद्ध आहे हा प्रश्न निर्माण होतो. याकडेही लक्ष देणे गरजेचे झाले आहे.