शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

सहा महिन्यांपासून पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:31 IST

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाºया अत्री येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मागील सहा महिन्यांपासून पाण्यासाठी विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. याची अद्यापही शिक्षण विभागाने दखल घेतली नाही.

ठळक मुद्देविहीर झाली जीर्ण : शिक्षण विभागाला वेळ मिळेना

हुपराज जमईवार।लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाºया अत्री येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मागील सहा महिन्यांपासून पाण्यासाठी विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. याची अद्यापही शिक्षण विभागाने दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत पिण्याचे शुध्द पाणी व स्वच्छतागृहासह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आहे. मात्र या निर्देशांचे जि.प. शाळांमध्ये सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अत्री येथील शाळेला आधी विहिरीच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. मात्र या विहिरीजवळ नाली असल्याने सहा महिन्यांपूर्वी ही विहीर खचली. परिणामी पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीवर लावलेला मोटारपंपसुध्दा विहिरीत पडला. विहीर खचल्यामुळे पाणी दूषित झाले व पुरवठा बंद करण्यात आला.आॅगस्ट २०१७ पासून या विहिरीचा पाणी पुरवठा बंद झाल्याने तेव्हापासून बाहेरुन पाणी आणावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांना शाळेपासून काही अंतरावर असलेल्या बोअरवेलचा आधार घ्यावा लागत आहे. विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेवून शालेय व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे शाळेत बोअरवेल खोदून देण्याच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला. पंचायत समिती शिक्षण विभागालासुध्दा याची माहिती व ठरावीची प्रत दिली.मात्र या घटनेला सहा महिन्यांचा कालावधी लोटूनदेखील याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांना दूरवरुन पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. विद्यार्थी बाहेरच्या स्त्रोतांचे पीत असलेले पाणी शुध्द आहे किंवा नाही, याची सुध्दा खात्री केली नसल्याची माहिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शिक्षण विभाग उपक्रमात व्यस्तजि.प.शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहे. मात्र अत्री शाळेतील विद्यार्थ्यांची पाण्याची समस्या मागील सहा महिन्यांपासून कायम आहे. शिक्षकांनी यासाठी वांरवार पाठपुरावा करुन देखील ही समस्या मार्गी लागली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा उपक्रमात अधिक रस असल्याचे दिसून येते.विद्यार्थ्यांना घरून पाणी आणण्याचा सल्लायेथील जि.प.शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावापासून शाळेचे अंतर जवळपास १ किमीचे आहे. त्यामुळे आधीच विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे असताना शिक्षकांनी घरुन पाणी आणण्याचा सल्ला दिल्याने या ओझ्यात आणखी भर पडल्याचे चित्र दिसत आहे.