शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

सहा महिन्यांपासून पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:31 IST

तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाºया अत्री येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मागील सहा महिन्यांपासून पाण्यासाठी विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. याची अद्यापही शिक्षण विभागाने दखल घेतली नाही.

ठळक मुद्देविहीर झाली जीर्ण : शिक्षण विभागाला वेळ मिळेना

हुपराज जमईवार।लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाºया अत्री येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मागील सहा महिन्यांपासून पाण्यासाठी विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. याची अद्यापही शिक्षण विभागाने दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत पिण्याचे शुध्द पाणी व स्वच्छतागृहासह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आहे. मात्र या निर्देशांचे जि.प. शाळांमध्ये सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अत्री येथील शाळेला आधी विहिरीच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. मात्र या विहिरीजवळ नाली असल्याने सहा महिन्यांपूर्वी ही विहीर खचली. परिणामी पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरीवर लावलेला मोटारपंपसुध्दा विहिरीत पडला. विहीर खचल्यामुळे पाणी दूषित झाले व पुरवठा बंद करण्यात आला.आॅगस्ट २०१७ पासून या विहिरीचा पाणी पुरवठा बंद झाल्याने तेव्हापासून बाहेरुन पाणी आणावे लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांना शाळेपासून काही अंतरावर असलेल्या बोअरवेलचा आधार घ्यावा लागत आहे. विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेवून शालेय व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे शाळेत बोअरवेल खोदून देण्याच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला. पंचायत समिती शिक्षण विभागालासुध्दा याची माहिती व ठरावीची प्रत दिली.मात्र या घटनेला सहा महिन्यांचा कालावधी लोटूनदेखील याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांना दूरवरुन पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. विद्यार्थी बाहेरच्या स्त्रोतांचे पीत असलेले पाणी शुध्द आहे किंवा नाही, याची सुध्दा खात्री केली नसल्याची माहिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शिक्षण विभाग उपक्रमात व्यस्तजि.प.शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहे. मात्र अत्री शाळेतील विद्यार्थ्यांची पाण्याची समस्या मागील सहा महिन्यांपासून कायम आहे. शिक्षकांनी यासाठी वांरवार पाठपुरावा करुन देखील ही समस्या मार्गी लागली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा उपक्रमात अधिक रस असल्याचे दिसून येते.विद्यार्थ्यांना घरून पाणी आणण्याचा सल्लायेथील जि.प.शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावापासून शाळेचे अंतर जवळपास १ किमीचे आहे. त्यामुळे आधीच विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे असताना शिक्षकांनी घरुन पाणी आणण्याचा सल्ला दिल्याने या ओझ्यात आणखी भर पडल्याचे चित्र दिसत आहे.