शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शालेय शिष्यवृत्तीच्या कागदांसाठी भटकंती

By admin | Updated: December 1, 2014 22:57 IST

देवरी येथील एसडीओ कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक विद्यार्थी आपल्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे अनेकांना याचा फटका बसला आहे.

आमगाव : देवरी येथील एसडीओ कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक विद्यार्थी आपल्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे अनेकांना याचा फटका बसला आहे. अनेक पालकांनी एसडीओवर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.देवरी येथील उपविभागीय महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत. सदर कार्यालय राम भरोसे झाले आहे. विद्यार्थी व पालकांचा कोणी वाली नाही. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटची तारीख शिष्यवृत्ती फार्म भरण्याची होती. आॅगस्ट महिन्यापासून जात प्रमाणपत्र व शिष्यवृत्तीला लागणारे सर्व कागदपत्र सेतुमधून तयार करून एसडीओ कार्यालयाला पाठविण्यात आले. अनेक विद्यार्थी व पालकांकडे सेतुकेंद्रात पैसे भरल्याची पावती आहे. माहे आॅगस्ट पासून कागदाकरिता अनेकांची भटकंती सुरु आहे. तीन ते चार वेळा आमगाव ते देवरी येथे विद्यार्थी व पालकांनी जाऊन पायपीट केली मात्र हातात काही आले नाही. कार्यालयात मोठ्या प्रमाणात कागदाचे गठ्ठे पडले आहेत. ज्याला आवश्यकता आहे त्यांनी देवरी कार्यालयात जाऊन कागद गठ्यातुन शोधावे व अधिकारी एसडीओ सोनवाने यांची सही घेऊन यावे हीच दिनचर्या या कार्यालयात सुरु आहे. काही विद्यार्थ्यांचे कागद या शोधाशोधीमुळे देवरी कार्यालयातून गायब झाले आहे. शोधून अनेक थकले मात्र कागद मिळत नाही. त्यामुळे वर्ग १० ते ११ चे विद्यार्थी त्यांना मिळणाऱ्या हक्काच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार हे निश्चित. यामुळे विद्यार्थी व पालकांतून रोष व्यक्त होत असून एसडीओ सोनवाने व संबंधित लिपिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)