शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

आठ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 22:22 IST

बिरसी विमानतळामुळे विस्थापीत झालेल्या नागरिकांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे त्यांना आजही जीर्ण घरांमध्ये दिवस काढावे लागत असून यापासून कधीही धोका होण्याची शक्यता आहे. शासनाचे याकडे दुलक्ष असल्याने येथील नागरिकांत भीती शिवाय रोषही व्याप्त आहे.

ठळक मुद्देबिरसी विमानतळ : नागरिकात भीती व रोष

लोकमत न्यूज नेटवर्कखातीया : बिरसी विमानतळामुळे विस्थापीत झालेल्या नागरिकांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे त्यांना आजही जीर्ण घरांमध्ये दिवस काढावे लागत असून यापासून कधीही धोका होण्याची शक्यता आहे. शासनाचे याकडे दुलक्ष असल्याने येथील नागरिकांत भीती शिवाय रोषही व्याप्त आहे.गेल्या आठ वर्षापासून बिरसी विमानतळामध्ये गावातील काही लोकांचे घर अधिग्रहीत झाले असता त्यांना शासनाच्यावतीने पुर्नवसन पॅकेज जाहीर करून याची यादी गेल्या सहा महिन्यांपुर्वीच बिरसी येथील ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली होती. पण अद्याप जागा व रक्कम त्यांच्या खात्यांमध्ये जमा झाली नाही. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. बिरसी विमानतळाने नवीन बांधकामावर बंदी लावल्याने येथील नागरिक गेल्या आठ वर्षापासून जीर्ण झालेल्या घरांतच दिवस काढत आहेत.जुने घर पाडू शकत नाही व नवे घर बांधू शकत नाही अशी त्यांची फसगत झाली आहे. त्यामुळे त्यांना जीर्ण झालेल्या घरांमध्येच राहावे लागत आहेत. गावकऱ्याच्यांवतीने वेळोवेळी प्रशासनाला या संदर्भात कळविले असता शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे आम्ही मृत्यूशय्येवर पडणार तेव्हा प्रशासन जागे होणार काय? अशी ओरड आहे.सन २०१६ मध्ये मे महिन्यात आलेल्या चक्रीवादळात अनेक लोकांच्या घरावरील कवेलू व टिनाचे छत उडून गेले. एवढेच नव्हे तर गेल्या ४ जून रोजी आलेल्या वादळीवारा व पावसामुळे बिरसी येथील १० ते १५ घरांचे पुन्हा छत उडून गेले. अशा परिस्थितीत त्यांना पक्क्या घरांची आवश्यकता असूनही गेल्या आठ वर्षांपासून जीर्ण घरांमध्येच रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात असून त्वरित जागा देऊन पुनर्वसनाची मागणी केली आहे. यादरम्यान जिवीत हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही येथील नागरिक करीत आहेत.