शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

आठ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 22:22 IST

बिरसी विमानतळामुळे विस्थापीत झालेल्या नागरिकांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे त्यांना आजही जीर्ण घरांमध्ये दिवस काढावे लागत असून यापासून कधीही धोका होण्याची शक्यता आहे. शासनाचे याकडे दुलक्ष असल्याने येथील नागरिकांत भीती शिवाय रोषही व्याप्त आहे.

ठळक मुद्देबिरसी विमानतळ : नागरिकात भीती व रोष

लोकमत न्यूज नेटवर्कखातीया : बिरसी विमानतळामुळे विस्थापीत झालेल्या नागरिकांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे त्यांना आजही जीर्ण घरांमध्ये दिवस काढावे लागत असून यापासून कधीही धोका होण्याची शक्यता आहे. शासनाचे याकडे दुलक्ष असल्याने येथील नागरिकांत भीती शिवाय रोषही व्याप्त आहे.गेल्या आठ वर्षापासून बिरसी विमानतळामध्ये गावातील काही लोकांचे घर अधिग्रहीत झाले असता त्यांना शासनाच्यावतीने पुर्नवसन पॅकेज जाहीर करून याची यादी गेल्या सहा महिन्यांपुर्वीच बिरसी येथील ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली होती. पण अद्याप जागा व रक्कम त्यांच्या खात्यांमध्ये जमा झाली नाही. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. बिरसी विमानतळाने नवीन बांधकामावर बंदी लावल्याने येथील नागरिक गेल्या आठ वर्षापासून जीर्ण झालेल्या घरांतच दिवस काढत आहेत.जुने घर पाडू शकत नाही व नवे घर बांधू शकत नाही अशी त्यांची फसगत झाली आहे. त्यामुळे त्यांना जीर्ण झालेल्या घरांमध्येच राहावे लागत आहेत. गावकऱ्याच्यांवतीने वेळोवेळी प्रशासनाला या संदर्भात कळविले असता शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे आम्ही मृत्यूशय्येवर पडणार तेव्हा प्रशासन जागे होणार काय? अशी ओरड आहे.सन २०१६ मध्ये मे महिन्यात आलेल्या चक्रीवादळात अनेक लोकांच्या घरावरील कवेलू व टिनाचे छत उडून गेले. एवढेच नव्हे तर गेल्या ४ जून रोजी आलेल्या वादळीवारा व पावसामुळे बिरसी येथील १० ते १५ घरांचे पुन्हा छत उडून गेले. अशा परिस्थितीत त्यांना पक्क्या घरांची आवश्यकता असूनही गेल्या आठ वर्षांपासून जीर्ण घरांमध्येच रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात असून त्वरित जागा देऊन पुनर्वसनाची मागणी केली आहे. यादरम्यान जिवीत हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही येथील नागरिक करीत आहेत.