शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

जिल्ह्यातील ८८०० शेतकरी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:33 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. असे असतानाही अद्याप जिल्ह्यातील ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. शासनाने १३ ग्रीन लिस्ट जाहीर करून दिल्या असून कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकºयांच्या नजरा १४ व्या ग्रीन लिस्टकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्दे१४ व्या ग्रीनलिस्टकडे नजरा : कर्जमाफीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. असे असतानाही अद्याप जिल्ह्यातील ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. शासनाने १३ ग्रीन लिस्ट जाहीर करून दिल्या असून कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा १४ व्या ग्रीन लिस्टकडे लागल्या आहेत.आजघडीला शेती करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. निसर्गाच्या मर्जीवर शेतीचा कारभार चालत असून मागील दोन-तीन वर्षांत निसर्गाने साथ न दिल्याने लोकांच्या पोटाची व्यवस्था करणारी शेती शेतकऱ्यांसाठीच मृत्यूचा मार्ग बनली. कर्ज काढून शेती करणारे शेतकरी यात चांगलेच फरफटल्याने शासनाने आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून कर्जमाफीची योजना सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणून ही योजना राबविली जात आहे.या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ८२ हजार ४७४ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर शासनाकडून टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची प्रक्रीया सुरू केली. यात कर्जमाफी करण्यात आलेल्या शेतकºयांची ग्रीन लिस्ट काढली जात असून आतापर्यंत अशा १३ ग्रीन काढण्यात आल्या आहेत. त्यातील १२ व्या ग्रीन लिस्टपर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकºयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. म्हणजेच आता ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. परिणामी त्यांना धाकधूक होत आहे.मागील वर्षभरापासून शासनाकडून एक-एक करून आतापर्यंत १३ ग्रीन लिस्ट आल्या. मात्र त्यात आपले नाव नसल्याने उरलेल्या या ८ हजार ७४२ शेतकऱ्यांचे टेंशन वाढले आहे. कधी यादी येते व त्यात आपले नाव दिसते याचीच या उर्वरीत शेतकºयांना प्रतीक्षा लागली आहे. त्यामुळे आता या सर्वांच्या नजरा १४ व्या ग्रीन लिस्टकडे लागल्या आहेत.१३ व्या ग्रीनलिस्टची जुळवणी सुरूशासनाकडून आलेल्या १३ व्या ग्रीन लिस्टमध्ये जिल्ह्यातील १५६ शेतकऱ्यांचा समावेश होता. मात्र शासनाकडून आलेल्या ग्रीनलिस्टची जिल्हास्तरावर जुळवणी केली जाते व त्यात काही त्रुटी असल्यास किंवा नावे पुन्हा आल्यास त्याबाबत कळविले जाते. ही प्रक्रीया झाल्यावर तसे कळवून निधी मागविला जाते. यामुळे सध्यातरी १२ व्या यादीपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आकडा धरला जात आहे. या यादीची जुळवणी झाल्यानंतर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे.