शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८८०० शेतकरी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:33 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. असे असतानाही अद्याप जिल्ह्यातील ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. शासनाने १३ ग्रीन लिस्ट जाहीर करून दिल्या असून कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकºयांच्या नजरा १४ व्या ग्रीन लिस्टकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्दे१४ व्या ग्रीनलिस्टकडे नजरा : कर्जमाफीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. असे असतानाही अद्याप जिल्ह्यातील ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. शासनाने १३ ग्रीन लिस्ट जाहीर करून दिल्या असून कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा १४ व्या ग्रीन लिस्टकडे लागल्या आहेत.आजघडीला शेती करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. निसर्गाच्या मर्जीवर शेतीचा कारभार चालत असून मागील दोन-तीन वर्षांत निसर्गाने साथ न दिल्याने लोकांच्या पोटाची व्यवस्था करणारी शेती शेतकऱ्यांसाठीच मृत्यूचा मार्ग बनली. कर्ज काढून शेती करणारे शेतकरी यात चांगलेच फरफटल्याने शासनाने आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून कर्जमाफीची योजना सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणून ही योजना राबविली जात आहे.या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ८२ हजार ४७४ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर शासनाकडून टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची प्रक्रीया सुरू केली. यात कर्जमाफी करण्यात आलेल्या शेतकºयांची ग्रीन लिस्ट काढली जात असून आतापर्यंत अशा १३ ग्रीन काढण्यात आल्या आहेत. त्यातील १२ व्या ग्रीन लिस्टपर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकºयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. म्हणजेच आता ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. परिणामी त्यांना धाकधूक होत आहे.मागील वर्षभरापासून शासनाकडून एक-एक करून आतापर्यंत १३ ग्रीन लिस्ट आल्या. मात्र त्यात आपले नाव नसल्याने उरलेल्या या ८ हजार ७४२ शेतकऱ्यांचे टेंशन वाढले आहे. कधी यादी येते व त्यात आपले नाव दिसते याचीच या उर्वरीत शेतकºयांना प्रतीक्षा लागली आहे. त्यामुळे आता या सर्वांच्या नजरा १४ व्या ग्रीन लिस्टकडे लागल्या आहेत.१३ व्या ग्रीनलिस्टची जुळवणी सुरूशासनाकडून आलेल्या १३ व्या ग्रीन लिस्टमध्ये जिल्ह्यातील १५६ शेतकऱ्यांचा समावेश होता. मात्र शासनाकडून आलेल्या ग्रीनलिस्टची जिल्हास्तरावर जुळवणी केली जाते व त्यात काही त्रुटी असल्यास किंवा नावे पुन्हा आल्यास त्याबाबत कळविले जाते. ही प्रक्रीया झाल्यावर तसे कळवून निधी मागविला जाते. यामुळे सध्यातरी १२ व्या यादीपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आकडा धरला जात आहे. या यादीची जुळवणी झाल्यानंतर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे.