शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जिल्ह्यातील ८८०० शेतकरी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:33 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. असे असतानाही अद्याप जिल्ह्यातील ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. शासनाने १३ ग्रीन लिस्ट जाहीर करून दिल्या असून कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकºयांच्या नजरा १४ व्या ग्रीन लिस्टकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्दे१४ व्या ग्रीनलिस्टकडे नजरा : कर्जमाफीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात असून आतापर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. असे असतानाही अद्याप जिल्ह्यातील ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. शासनाने १३ ग्रीन लिस्ट जाहीर करून दिल्या असून कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा १४ व्या ग्रीन लिस्टकडे लागल्या आहेत.आजघडीला शेती करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. निसर्गाच्या मर्जीवर शेतीचा कारभार चालत असून मागील दोन-तीन वर्षांत निसर्गाने साथ न दिल्याने लोकांच्या पोटाची व्यवस्था करणारी शेती शेतकऱ्यांसाठीच मृत्यूचा मार्ग बनली. कर्ज काढून शेती करणारे शेतकरी यात चांगलेच फरफटल्याने शासनाने आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून कर्जमाफीची योजना सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणून ही योजना राबविली जात आहे.या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ८२ हजार ४७४ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर शासनाकडून टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची प्रक्रीया सुरू केली. यात कर्जमाफी करण्यात आलेल्या शेतकºयांची ग्रीन लिस्ट काढली जात असून आतापर्यंत अशा १३ ग्रीन काढण्यात आल्या आहेत. त्यातील १२ व्या ग्रीन लिस्टपर्यंत जिल्ह्यातील ७३ हजार ७३२ शेतकºयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. म्हणजेच आता ८ हजार ७४२ शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. परिणामी त्यांना धाकधूक होत आहे.मागील वर्षभरापासून शासनाकडून एक-एक करून आतापर्यंत १३ ग्रीन लिस्ट आल्या. मात्र त्यात आपले नाव नसल्याने उरलेल्या या ८ हजार ७४२ शेतकऱ्यांचे टेंशन वाढले आहे. कधी यादी येते व त्यात आपले नाव दिसते याचीच या उर्वरीत शेतकºयांना प्रतीक्षा लागली आहे. त्यामुळे आता या सर्वांच्या नजरा १४ व्या ग्रीन लिस्टकडे लागल्या आहेत.१३ व्या ग्रीनलिस्टची जुळवणी सुरूशासनाकडून आलेल्या १३ व्या ग्रीन लिस्टमध्ये जिल्ह्यातील १५६ शेतकऱ्यांचा समावेश होता. मात्र शासनाकडून आलेल्या ग्रीनलिस्टची जिल्हास्तरावर जुळवणी केली जाते व त्यात काही त्रुटी असल्यास किंवा नावे पुन्हा आल्यास त्याबाबत कळविले जाते. ही प्रक्रीया झाल्यावर तसे कळवून निधी मागविला जाते. यामुळे सध्यातरी १२ व्या यादीपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आकडा धरला जात आहे. या यादीची जुळवणी झाल्यानंतर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे.