शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

जिल्हा परिषदेला संच मान्यतेची प्रतीक्षा

By admin | Updated: November 22, 2015 02:03 IST

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील आंतरजिल्हा बदल्यांचे प्रकरण ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर ...

शिक्षकांच्या आशा पल्लवित : संवर्गनिहाय रिक्त होणारी पदे भरणारगोंदिया : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील आंतरजिल्हा बदल्यांचे प्रकरण ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर यातील गांभिर्य सर्वांच्या लक्षात येत आहे. खुद्द शिक्षणाधिकारी यु.आर. नरड यांनी यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्यांना आता प्रथम प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेला यावर्षी संच मान्यता अजून आलेली नाही. ती येताच हा प्रश्न शक्य होईल तेवढा निकाली काढला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिक्षणाधिकारी नरड यांनी जाहीर केलेली ही भूमिका तमाम बदलीग्रस्त शिक्षकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. आपल्या विविध समस्यांमुळे ग्रस्त असलेले हे शिक्षक गृहजिल्ह्यात बदली होण्याच्या आशेने कित्येक दिवसांपासून प्रयत्नशिल असताना आतापर्यंत त्यांच्या वाटेला केवळ उपेक्षाच आली. पण आता त्यांच्या समस्यांना वाचा फुटल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेसोबत पदाधिकाऱ्यांच्याही हृदयाला पाझर फुटत आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी नरड यांनी सांगितले की, सध्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांवर प्राथमिक (डी.एड्.) शिक्षक अतिरिक्त आहेत. मात्र पदवीधर शिक्षकांची कमतरता आहे. प्राथमिकच्या शिक्षकांमधून पदवीधर शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा आधी समायोजित केल्या जातील. त्यामुळे अतिरिक्त ठरणारे शिक्षक कमी होऊन जवळपास ३५ जागा रिक्त होतील. त्यामुळे तेवढ्या जागा आंतरजिल्हा बदलीतून भरणे शक्य होईल. पण त्यापूर्वी संच मान्यता एकदा मिळाली म्हणजे ही प्रक्रिया करण्यास वेग येईल, असे त्यांनी सांगितले.शिक्षकांच्या व्यथांना अंतच नाही...गृहजिल्ह्यापासून शेकडो किलोमीटर अंतरावर नोकरी करणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांना स्वत:च्या कुटुंबियांपासून, नातेवाईकांपासून, मित्र-मैत्रिणींपासून दूर राहताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातूनच अनेकांमध्ये नैराश्य येऊन त्यांची प्रकृती खालावली. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ‘लोकमत’ने ही समस्या उचलून धरल्यानंतर आपल्या समस्या सांगणाऱ्या शिक्षकांचे अनेक फोन लोकमतकडे आले. काहींनी प्रत्यक्ष भेटून लोकमतचे आभार व्यक्त केले.पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावाशिक्षकांच्या या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सर्वप्रथम शिक्षक आंतरजिल्हा बदली सहकार कृती समिती गोंदियाने पुढाकार घेतला. आपल्या समस्या, व्यथा प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि वैफल्यग्रस्त झालेल्या शिक्षकांना दिलासा देण्यासाठी या कृती समितीचे अध्यक्ष रविंद्रकुमार अंबुले व इतर पदाधिकारी सतत प्रयत्न करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीही हा विषय मनावर घ्यावा आणि शिक्षकांना त्यांच्या कुटुंबियात राहण्याची संधी द्यावी अशी अपेक्षा कृती समितीने व्यक्त केली आहे.बदल्यांवरील निर्बंध उठविलेआंतरजिल्हा बदल्यांवर काही वर्षापूर्वी असलेले निर्बंध नुकतेच हटविण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी नरड यांनी सांगितले. सध्या एकाच प्रवर्गात मोडणाऱ्या दोन शिक्षकांच्या आपसी आंतजिल्हा बदल्या सुरूच आहेत. पण संच मान्यता आल्यानंतर ज्या प्रवर्गाच्या जागा रिक्त होतील त्या प्रवर्गातील शिक्षकाला गृहजिल्ह्यात येण्याची संधी मिळणार आहे.