शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

एक लाख लोकांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: May 21, 2015 01:05 IST

सालेकसा तालुक्यात एकूण ८६ गावे आणि सात रिठी गावं मिळून जवळपास एक लाखाच्या वर लोकसंख्या आहे.

विजय मानकर सालेकसासालेकसा तालुक्यात एकूण ८६ गावे आणि सात रिठी गावं मिळून जवळपास एक लाखाच्या वर लोकसंख्या आहे. परंतु या लोकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे म्हणून तालुकास्तरावर किंवा ग्राम पंचायत स्तरावर कोणतीच पाणी पुरवठा सुरू नसल्याने नागरिकांना शुध्द पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी दरवर्षी तालुक्यात उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अनेक प्रकारचे आजार बळावून जीवघेणे संकट ओढवते, मात्र प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी अजूनही गांभीर्याने विचार करून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तत्पर नसल्याचे दिसून येते.अनेक वर्षापासून सालेकसा तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी काही सुज्ञ लोकांनी नळ योजना स्थापित करून नागरिकांना शुध्द पाणी मिळावे म्हणून धावपळ करीत राहिले. काही गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर नळ योजना उभारण्यात करण्यात आल्या, परंतु ग्राम पंचायतीच्या पैसेखाऊ वृत्तीच्या पदाधिकाऱ्यांमुळे पाणी पट्टीची वसुली तर करण्यात आली, परंतु विजेचे बिल भरण्यात आले नाही. त्यातून काही ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात ग्राम पंचायती अपयशी ठरल्या. परिणामी आज काही ग्राम पंचायतींचा अपवाद वगळल्यास कोणत्याही ग्राम पंचायतीची ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू नसून थंडबस्त्यात पडून आहेत.सालेकसा तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात पाण्यातील जीवाणूमुळे पिलीया, मलेरिया, टायफाईड, कॉलरासारखे जीवघेणे आजार वेगाने पसरतात. या आजारांचे थैमान वाढल्यास आरोग्य विभाग सुध्दा गुडघे टेकतो व अनेक रुग्ण दगावतात. हा क्रम सालेकसासारख्या मागासलेल्या तालुक्यात दरवर्षी चालतो. हे या तालुक्याचे मोठे दुर्दैव ठरत आहे. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून दीर्घकालीन व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांच्या मर्जीनुसार विंधन विहिरीआमदार-खासदार निधीतून किंवा इतर योजनेतून विंधन विहीर मंजूर करताना राजकारणी लोक योग्य जागेचा विचार न करता कार्यकर्त्यांच्या मर्जीनुसार नको तिथे बोअरवेल्स देतात. परिणामी अनेक बोअरवेल्स पाण्याच्या बाबतीत यशस्वी ठरत नाही. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नसल्याने अशा बोअरव्ोल्समधून शुद्ध पाण्याऐवजी गढूळ पाणी निघते. ग्रामीण भागातील लोक नाईलाजाने तेच पाणी वापरतात आणि अनेक आजार उद्भवतात.