शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
3
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
4
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
5
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
6
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
7
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
8
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
9
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
10
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
11
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
12
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
13
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
14
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
15
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
16
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
17
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
18
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
19
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
20
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...

एक लाख लोकांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: May 21, 2015 01:05 IST

सालेकसा तालुक्यात एकूण ८६ गावे आणि सात रिठी गावं मिळून जवळपास एक लाखाच्या वर लोकसंख्या आहे.

विजय मानकर सालेकसासालेकसा तालुक्यात एकूण ८६ गावे आणि सात रिठी गावं मिळून जवळपास एक लाखाच्या वर लोकसंख्या आहे. परंतु या लोकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे म्हणून तालुकास्तरावर किंवा ग्राम पंचायत स्तरावर कोणतीच पाणी पुरवठा सुरू नसल्याने नागरिकांना शुध्द पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी दरवर्षी तालुक्यात उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अनेक प्रकारचे आजार बळावून जीवघेणे संकट ओढवते, मात्र प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी अजूनही गांभीर्याने विचार करून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तत्पर नसल्याचे दिसून येते.अनेक वर्षापासून सालेकसा तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी काही सुज्ञ लोकांनी नळ योजना स्थापित करून नागरिकांना शुध्द पाणी मिळावे म्हणून धावपळ करीत राहिले. काही गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर नळ योजना उभारण्यात करण्यात आल्या, परंतु ग्राम पंचायतीच्या पैसेखाऊ वृत्तीच्या पदाधिकाऱ्यांमुळे पाणी पट्टीची वसुली तर करण्यात आली, परंतु विजेचे बिल भरण्यात आले नाही. त्यातून काही ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात ग्राम पंचायती अपयशी ठरल्या. परिणामी आज काही ग्राम पंचायतींचा अपवाद वगळल्यास कोणत्याही ग्राम पंचायतीची ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू नसून थंडबस्त्यात पडून आहेत.सालेकसा तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात पाण्यातील जीवाणूमुळे पिलीया, मलेरिया, टायफाईड, कॉलरासारखे जीवघेणे आजार वेगाने पसरतात. या आजारांचे थैमान वाढल्यास आरोग्य विभाग सुध्दा गुडघे टेकतो व अनेक रुग्ण दगावतात. हा क्रम सालेकसासारख्या मागासलेल्या तालुक्यात दरवर्षी चालतो. हे या तालुक्याचे मोठे दुर्दैव ठरत आहे. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून दीर्घकालीन व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांच्या मर्जीनुसार विंधन विहिरीआमदार-खासदार निधीतून किंवा इतर योजनेतून विंधन विहीर मंजूर करताना राजकारणी लोक योग्य जागेचा विचार न करता कार्यकर्त्यांच्या मर्जीनुसार नको तिथे बोअरवेल्स देतात. परिणामी अनेक बोअरवेल्स पाण्याच्या बाबतीत यशस्वी ठरत नाही. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नसल्याने अशा बोअरव्ोल्समधून शुद्ध पाण्याऐवजी गढूळ पाणी निघते. ग्रामीण भागातील लोक नाईलाजाने तेच पाणी वापरतात आणि अनेक आजार उद्भवतात.