शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे मदतीसाठी वेट अ‍ॅन्ड वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:26 IST

जिल्ह्यात १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीट आणि वादळी पावसामुळे २ हजार ८७१ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते.कृषी मंत्री पाडूंरंग फुंडकर यांनी नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन अहवाल पाठविण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले होते.

ठळक मुद्देतीन हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान : अहवालावर प्रश्नचिन्ह

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीट आणि वादळी पावसामुळे २ हजार ८७१ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते.कृषी मंत्री पाडूंरंग फुंडकर यांनी नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन अहवाल पाठविण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले होते. मात्र याला महिनाभराचा कालावधी लोटूनही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकºयांचे वेट अ‍ॅन्ड वॉच सुरू आहे.१२ व १३ फेब्रुवारीला विदर्भात झालेल्या गारपीट व वादळी पावसाचा फटका रब्बी पिकांसह संत्रा व मोसंबीच्या बागांना बसला. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने करुन त्याचा अहवाल शासनाला पाठविला. त्यानंतर शासनाने अमरावती विभागातील गारपीटग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत जाहीर करुन निधी उपलब्ध करुन दिला. गारपीट व वादळी पावसाचा फटका गोंदिया जिल्ह्यातील रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात बसला. यंदा जवळपास ३४ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यापैकी २ हजार ८७१ हेक्टरमधील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा अहवाल तयार करुन कृषी विभागाने तो शासनाकडे पाठविला. पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ३ कोटी ५१ लाख ३८० रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना केव्हापर्यंत मदत मिळेल याचे उत्तर कृषी विभागाकडे नाही. तर अमरावती विभागात गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाईचा निधी नुकताच उपलब्ध करुन देण्यात आला. शासनाचे धोरण सर्वच विभागासाठी सारखेच आहे. मात्र गोंदिया जिल्ह्याला अद्यापही नुकसान भरपाई नुकसान भरपाईचा निधी प्राप्त झाला नसल्याने कृषी विभागाने नुकसानीचा अहवाल पाठविण्यास विलंब केल्याचे बोलल्या जाते.भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय?तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयाच्या क्षेत्रातील जमीन सिंचन विभागाकडून निविदा काढून भाडेतत्त्वावर शेती करण्यासाठी दिली जाते. यंदा दीडशे एकर शेती भाडेतत्वावर शेतकऱ्यांना देण्यात आली. मात्र महसूल व कृषी विभागाने या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यास नकार देत नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शासन आता या शेतकऱ्यांबाबत काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.