शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे मदतीसाठी वेट अ‍ॅन्ड वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:26 IST

जिल्ह्यात १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीट आणि वादळी पावसामुळे २ हजार ८७१ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते.कृषी मंत्री पाडूंरंग फुंडकर यांनी नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन अहवाल पाठविण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले होते.

ठळक मुद्देतीन हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान : अहवालावर प्रश्नचिन्ह

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीट आणि वादळी पावसामुळे २ हजार ८७१ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते.कृषी मंत्री पाडूंरंग फुंडकर यांनी नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन अहवाल पाठविण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले होते. मात्र याला महिनाभराचा कालावधी लोटूनही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकºयांचे वेट अ‍ॅन्ड वॉच सुरू आहे.१२ व १३ फेब्रुवारीला विदर्भात झालेल्या गारपीट व वादळी पावसाचा फटका रब्बी पिकांसह संत्रा व मोसंबीच्या बागांना बसला. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने करुन त्याचा अहवाल शासनाला पाठविला. त्यानंतर शासनाने अमरावती विभागातील गारपीटग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत जाहीर करुन निधी उपलब्ध करुन दिला. गारपीट व वादळी पावसाचा फटका गोंदिया जिल्ह्यातील रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात बसला. यंदा जवळपास ३४ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यापैकी २ हजार ८७१ हेक्टरमधील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा अहवाल तयार करुन कृषी विभागाने तो शासनाकडे पाठविला. पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ३ कोटी ५१ लाख ३८० रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना केव्हापर्यंत मदत मिळेल याचे उत्तर कृषी विभागाकडे नाही. तर अमरावती विभागात गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाईचा निधी नुकताच उपलब्ध करुन देण्यात आला. शासनाचे धोरण सर्वच विभागासाठी सारखेच आहे. मात्र गोंदिया जिल्ह्याला अद्यापही नुकसान भरपाई नुकसान भरपाईचा निधी प्राप्त झाला नसल्याने कृषी विभागाने नुकसानीचा अहवाल पाठविण्यास विलंब केल्याचे बोलल्या जाते.भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय?तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयाच्या क्षेत्रातील जमीन सिंचन विभागाकडून निविदा काढून भाडेतत्त्वावर शेती करण्यासाठी दिली जाते. यंदा दीडशे एकर शेती भाडेतत्वावर शेतकऱ्यांना देण्यात आली. मात्र महसूल व कृषी विभागाने या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यास नकार देत नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शासन आता या शेतकऱ्यांबाबत काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.