शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

रोजंदारी कर्मचाऱ्यांचे नशीब फळफळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 21:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थायी होण्याची अपेक्षा बाळगत नगर परिषदेत कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाºयांचे नशिब अखेर फळफळलेच. येत्या १५ दिवसांत या रोजंदारी कर्मचाऱ्यांची पालिकेतील रिक्त पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.मागील २०-२५ वर्षांपासून नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जेथे ३०० कर्मचारी काम करीत होते त्यातील काहीजण सेवानिवृत्त ...

ठळक मुद्दे १५ दिवसांत करणार स्थायी : पालिकेतील रिक्त पदांवर होणार नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थायी होण्याची अपेक्षा बाळगत नगर परिषदेत कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाºयांचे नशिब अखेर फळफळलेच. येत्या १५ दिवसांत या रोजंदारी कर्मचाऱ्यांची पालिकेतील रिक्त पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.मागील २०-२५ वर्षांपासून नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जेथे ३०० कर्मचारी काम करीत होते त्यातील काहीजण सेवानिवृत्त झाले तर काहींचा मृत्यूही झाला आहे. आता उर्वरीत १८७ कर्मचारी स्थायी होण्याची अपेक्षा बाळगून काम करीत आहेत. मात्र त्यांना आत्तापर्यंत केवळ आश्वासनेच मिळाली. अखेर त्यांनी काही दिवसांपूर्वी आमदार गोपालदास अग्रवाल यांना निवेदन देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. सुरूवातीपासून रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रयत्नरत असलेल्या आमदार अग्रवाल यांनी यापूर्वी सप्टेंबर महिन्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तेव्हाही रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यावर चर्चा झाली होती. मात्र तोडगा काहीच न निघाल्याने आमदार अग्रवाल यांनी प्रकरणावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी बुधवारी (दि.३) मुंबई येथे नगर विकास सचिव मनिषा म्हैसकर, मुख्याधिकारी चंदन पाटील, नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्यासह संबंधीत अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत आमदार अग्रवाल यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांचा विषय जिथे आहे तिथेच असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. स्थायी होण्याची अपेक्षा बाळगून आपले जीवन या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी घालविले. काही रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यावरही जर त्यांच्या प्रश्नावर तोडगा निघत नसल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबिण्याचा इशाराही आमदार अग्रवाल यांनी दिला. यावर नगर विकास सचिव मनिषा म्हैसकर यांनी, सर्व विषयांची माहिती घेत येत्या १५ दिवसांत रोजंदारी कर्मचाºयांना गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील नगर परिषदांतील रिक्त पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.२००६ पासून केला पाठपुरावानगर परिषद रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात यावे. या मागणीसाठी आमदार अग्रवाल यांचे सन २००६ पासून प्रयत्न सुरू आहेत. या काळात त्यांनी कित्येकदा मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत मागणी रेटून धरली. मात्र रोजंदारी कर्मचाऱ्यांचा विषय काही सुटला नाही. मध्यंतरी सप्टेंबर महिन्यातही नगर विकास सचिव म्हैसकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. दरम्यान रोजंदारी कर्मचाऱ्यांची मध्यंतरी आमदार अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर नगर विकास मंत्रालयाने १५ दिवसांत रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, ६० रूपये रोजी मिळत असलेल्या रोजंदारी कर्मचाºयांना किमान वेतन नुसार ४५० रूपये रोजी मिळत आहे.