शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

१३८ कर्मचाऱ्यांच्या वेतनाअभावी बुडेल ४० हजार मजुरांची मजुरी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST

गोंदिया : मागील तीन महिन्यांचे मानधन न मिळाल्यामुळे मनरेगाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कालावधीही संपलेला ...

गोंदिया : मागील तीन महिन्यांचे मानधन न मिळाल्यामुळे मनरेगाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कालावधीही संपलेला आहे. त्यांना वाढीव मुदतीचे कंत्राटही देण्यात आले नाही. त्यामुळे मंगळवारपासून (दि. २३) ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या १३८ कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे मनरेगाच्या कामावर असलेल्या ४० हजार मजुरांची मजुरी बुडण्याची शक्यता आहे.

गोंदिया जिल्ह्यातील ४३७ ग्रामपंचायतींतर्गत आजघडीला ६ हजार ६२ कामे सुरू असून या कामांवर ४० हजार ३९२ मजूर कार्यरत आहेत. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर, डिसेंबर २०२० व जानेवारी २०२१ या तीन महिन्यांचे मानधन देण्यात आलेले नाही. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन देण्याची गरज असताना शासनाने त्यांना वाढीव मानधन दिले नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुदत संपली असून त्यांना मुदतवाढही देण्यात आली नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील १३८ कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. परिणामी, जिल्ह्यातील मनरेगाच्या कामावरील मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. या कामबंद आंदोलनामुळे मजुरांची मजुरी बुडेल, त्यांना नवीन काम मिळणार नाही, मजुरांच्या कामाचे मूल्यांकन होणार नाही, नवीन कामाची मागणी उपलब्ध होणार नाही, केलेल्या कामाची मजुरी मिळणार नाही. ही सर्व कामे ऑनलाइन करावी लागत असल्यामुळे या १३८ कर्मचाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे. जीव तोडून काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना तीन महिन्यांचे मानधन न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनात आर. के. धुळे, आर. एल. मेश्राम, एस. पी. कस्पटे, पी. के. कापगते, एम. एस. मेश्राम, साखरे, एस. टी. चौधरी, आर. एस. भवर, जी. बी. साखरे, एम. एस. बिसेन, एम. एस. भगत, एच. डी. बघेले, रहांगडाले, के. एम. हरिणखेडे, पी. सी. बोरीकर, आशिष घाटे यांचा समावेश आहे.