शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

जिल्ह्यात ७९१ ठिकाणी मतदार जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:21 IST

येत्या लोकसभा निवडणुकीपासून वापरात येणाऱ्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहे. २८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेला हा जनजागृती कार्यक्रम तालुकास्तरावर ६ तारखेला संपला असून यांतर्गत जिल्ह्यात ७९१ ठिकाणी नागरिकांत (मतदार) जनजागृती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती : प्रात्यक्षिक व नागरिकांच्या शंकांचे निरसन

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येत्या लोकसभा निवडणुकीपासून वापरात येणाऱ्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहे. २८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेला हा जनजागृती कार्यक्रम तालुकास्तरावर ६ तारखेला संपला असून यांतर्गत जिल्ह्यात ७९१ ठिकाणी नागरिकांत (मतदार) जनजागृती करण्यात आली आहे.ईव्हीएम मशीन हॅक करून एका विशिष्ट पक्षालाच सर्व मते पडत असल्याचे चांगलेच आरोप करण्यात आले आहेत. यातूनच राजकीय पक्षांत ईव्हीएम मशीनला घेऊन चांगलीत जुंपलीही आहे. ईव्हीएम मशीनला घेऊन नागरिकांच्या मनात असलेली ही शंका दूर व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या जोडीला व्हीव्हीपॅट मशीन आणले आहे. ईव्हीएम मशीनचे बटन दाबून मतदान केल्यानंतर आपण बटन दाबलेल्या पक्षालाच आपले मत गेले की नाही याची पावती व्हीव्हीपॅट मशीनमधून निघणार आहे. मात्र ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा हा प्रयोग नागरिकांसाठी सध्या नवखाच आहे.यामुळे ईव्हीएम-व्हीव्हीपॅटला घेऊनही नागरिकांत विविध प्रकारच्या शंकाकुशंका आहेत. या शंकांचे निरसन न झाल्यास नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यास टाळतील याचाही नेम नाही. अशात नागरिकांच्या मनात असलेली ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबतची शंका दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृती कार्यक्रम राबविला. येत्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम-व्हीव्हीपॅटनेच निवडणुका होणार असल्याने २८ डिसेंबर पासून जिल्ह्यात हा जनजागती कार्यक्रम सुरू करण्यात आला. यांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर पथक गठीत करण्यात आले होते.या जिल्हा व तालुकास्तरावरील पथकांनी ६ तारखेपर्यंत जनजागृती कार्यक्रम राबवून जिल्ह्यात ७९१ ठिकाणी जनजागृती केली.यात पथकाने नागरिकांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनची कार्यपद्धती समजावून सांगत मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. एवढेच नव्हे तर नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचेही निरसन करण्यात आले.निवडणुकीत जास्तीतजास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा या उद्देशातून जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम घेतला.८ तालुका तर १ जिल्हास्तरीय पथकजनजागृतीसाठी तालुकास्तरावर ८ तर जिल्हास्तरावर १ पथक गठीत करण्यात आले आहे. ६ जणांच्या या पथकांत मंडळ अधिकारी, तलाठी व पोलीस कर्मचाºयांचा समावेश होता. तालुकास्तरावरील पथकांनी मतदान केंद्र, बाजार, चौक यासारख्या गर्दीच्या ठिकाणांवर जनजागृती कार्यक्रम घेतले. तर जिल्हा पथकाने शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालय, मेळावे व मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या कार्यक्रमांत जनजागृती कार्यक्रम घेवून जनजागृतीचे कार्य केले. विशेष म्हणजे, तालुकास्तरावरील पथकांचे कार्यक्रम झाले आहेत. मात्र जिल्हास्तरीय पथक कार्यरत असून मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन बघून ते जनजागृती करीत आहेत.