शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जिल्ह्यात ७९१ ठिकाणी मतदार जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:21 IST

येत्या लोकसभा निवडणुकीपासून वापरात येणाऱ्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहे. २८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेला हा जनजागृती कार्यक्रम तालुकास्तरावर ६ तारखेला संपला असून यांतर्गत जिल्ह्यात ७९१ ठिकाणी नागरिकांत (मतदार) जनजागृती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती : प्रात्यक्षिक व नागरिकांच्या शंकांचे निरसन

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येत्या लोकसभा निवडणुकीपासून वापरात येणाऱ्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहे. २८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेला हा जनजागृती कार्यक्रम तालुकास्तरावर ६ तारखेला संपला असून यांतर्गत जिल्ह्यात ७९१ ठिकाणी नागरिकांत (मतदार) जनजागृती करण्यात आली आहे.ईव्हीएम मशीन हॅक करून एका विशिष्ट पक्षालाच सर्व मते पडत असल्याचे चांगलेच आरोप करण्यात आले आहेत. यातूनच राजकीय पक्षांत ईव्हीएम मशीनला घेऊन चांगलीत जुंपलीही आहे. ईव्हीएम मशीनला घेऊन नागरिकांच्या मनात असलेली ही शंका दूर व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या जोडीला व्हीव्हीपॅट मशीन आणले आहे. ईव्हीएम मशीनचे बटन दाबून मतदान केल्यानंतर आपण बटन दाबलेल्या पक्षालाच आपले मत गेले की नाही याची पावती व्हीव्हीपॅट मशीनमधून निघणार आहे. मात्र ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा हा प्रयोग नागरिकांसाठी सध्या नवखाच आहे.यामुळे ईव्हीएम-व्हीव्हीपॅटला घेऊनही नागरिकांत विविध प्रकारच्या शंकाकुशंका आहेत. या शंकांचे निरसन न झाल्यास नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यास टाळतील याचाही नेम नाही. अशात नागरिकांच्या मनात असलेली ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबतची शंका दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृती कार्यक्रम राबविला. येत्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम-व्हीव्हीपॅटनेच निवडणुका होणार असल्याने २८ डिसेंबर पासून जिल्ह्यात हा जनजागती कार्यक्रम सुरू करण्यात आला. यांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर पथक गठीत करण्यात आले होते.या जिल्हा व तालुकास्तरावरील पथकांनी ६ तारखेपर्यंत जनजागृती कार्यक्रम राबवून जिल्ह्यात ७९१ ठिकाणी जनजागृती केली.यात पथकाने नागरिकांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनची कार्यपद्धती समजावून सांगत मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. एवढेच नव्हे तर नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचेही निरसन करण्यात आले.निवडणुकीत जास्तीतजास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा या उद्देशातून जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम घेतला.८ तालुका तर १ जिल्हास्तरीय पथकजनजागृतीसाठी तालुकास्तरावर ८ तर जिल्हास्तरावर १ पथक गठीत करण्यात आले आहे. ६ जणांच्या या पथकांत मंडळ अधिकारी, तलाठी व पोलीस कर्मचाºयांचा समावेश होता. तालुकास्तरावरील पथकांनी मतदान केंद्र, बाजार, चौक यासारख्या गर्दीच्या ठिकाणांवर जनजागृती कार्यक्रम घेतले. तर जिल्हा पथकाने शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालय, मेळावे व मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या कार्यक्रमांत जनजागृती कार्यक्रम घेवून जनजागृतीचे कार्य केले. विशेष म्हणजे, तालुकास्तरावरील पथकांचे कार्यक्रम झाले आहेत. मात्र जिल्हास्तरीय पथक कार्यरत असून मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन बघून ते जनजागृती करीत आहेत.