शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बिरसी फाटा : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून, रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. यावर प्रतिबंधात्मक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बिरसी फाटा : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून, रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने व आस्थापने या काळात बंद राहणार आहेत.

परंतु, बिरसी फाटा परिसरातील नागरिकांमध्ये कोरोनाची भीती नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक बिनधास्तपणे फिरुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे सर्रासपणे उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून, रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. अनेक रुग्णांचा मृत्यूदेखील झाला असून, ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १४ एप्रिलच्या रात्रीपासून १ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले असून, कलम १४४ लावले आहे. परंतु, नागरिक कोरोनाची भीती मनात न ठेवता विनामास्क अनावश्यक फिरत आहेत. अनेक नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन, सॅनिटायझरचा वापर करताना दिसून येत नाहीत. या विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यापासून इतरांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्याकरिता ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष सरपंच असून, यात पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व गावातील काही लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु, या समितीचे पदाधिकारी या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेच आता काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे. संचारबंदी काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व अनावश्यक फिरणाऱ्यांवर ग्रामपंचायत प्रशासनाने कडक कारवाई करून दंड ठोठावावा, अशी मागणी केली जात आहे.