शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रस्ता दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 22:47 IST

चिरेखनी गावात जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे. मात्र सततच्या वर्दळीमुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन ये-जा करणे गावकऱ्यांना कठीण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रस्त्यावरील खड्डयांमध्ये पाणी साचले असल्याने अनेकांचे अपघात होऊन दुखापत सुध्दा झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यात पाणी साचून गटारे तयार झाली आहेत. मात्र अद्यापही या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथील संतप्त गावकऱ्यांनी गुरूवारी रास्ता रोको आंदोलन करुन शासन आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.चिरेखनी गावात जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे. मात्र सततच्या वर्दळीमुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन ये-जा करणे गावकऱ्यांना कठीण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रस्त्यावरील खड्डयांमध्ये पाणी साचले असल्याने अनेकांचे अपघात होऊन दुखापत सुध्दा झाली आहे. रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, यासाठी येथील गावकºयांनी अनेकदा पंचायत समिती,जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. जि.प.व पं.स.सदस्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली.मात्र त्यांनी सुध्दा याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी रस्त्याचा व्हिडिओ तयार करुन सोशल माध्यमावर टाकला.पण यानंतरही प्रशासनाला जाग न आल्याने चिरेखनी येथील गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.जोपर्यंत हा रस्ता दुरूस्ती करणार नाही, तोपर्यंत हा रस्ता रहदारीसाठी सुरु करु देणार नाही अशी भूमिका गावकºयांनी घेतली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा