शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

तलाठ्यावर ग्रामस्थांचा रोष

By admin | Updated: April 9, 2016 02:03 IST

तिरोडा तहसील अंतर्गत येणाऱ्या साजा-१ अर्जुनी येथील तलाठी भिवगडे यांच्या अरेरावी धोरणामुळे येथील शेतकरी व ग्रामस्थ त्रासले आहेत.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : बदली होऊनही नवीन तलाठ्याला पदभार दिलाच नाहीइंदोरा (बु.) : तिरोडा तहसील अंतर्गत येणाऱ्या साजा-१ अर्जुनी येथील तलाठी भिवगडे यांच्या अरेरावी धोरणामुळे येथील शेतकरी व ग्रामस्थ त्रासले आहेत. सदर तलाठ्याची शेतकऱ्याप्रति वागणूक समाधानकारक नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष असून त्यांचे तात्काळ स्थानांतरण करून नवीन तलाठी देण्यात यावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तलाठी भिवगडे हे अर्जुनी गावात मागील एक वर्षापासून कार्यरत आहेत. ते जेव्हापासून या गावात आले तेव्हापासून त्यांची शेतकऱ्यांप्रति वागणूक चांगली नसून कुठल्याही कामाकरिता त्रास देणे सुरू आहे. शेतकऱ्यांचे सातबारा उतारे तसेच शेतीसंबंधी कुठल्याही दाखल्यासाठी पैसे मोजल्याशिवाय दाखले मिळत नाही. सदर तलाठी मुख्यालयात राहत नसून ८० किमी लांब असलेल्या स्वगावावरून ये-जा करतात. तलाठ्याबाबत १५ आॅगस्ट २०१५ च्या ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला व ग्रामपंचायतने या ठरावाच्या प्रति तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, आमदार यांना पाठवून स्थानांतर करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने तलाठी भिवगडे यांचे स्थानांतर करण्यात आले, असे गावात सांगण्यात आले. फेब्रुवारी २०१६ मध्ये स्थानांतराचे आदेश आल्याचे अधिकारी सांगातात. मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटून गेला, परंतु या तलाठ्याने आपला चार्ज दुसऱ्या तलाठ्यांना दिले नाही. याचे नेमके कारण काय? हेच जनतेला कळेनासे झाले. ेहे तलाठी जेव्हापासून अर्जुनी गावात आले तेव्हापासून शेतकऱ्यांना खूप त्रास आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ते वेळेवर कार्यालयात राहत नाही. शेतकऱ्यांशी अरेरावी करतात. कुठल्याही दाखल्यासाठी १०० रूपये घेतल्याशिवाय देत नाही. रेती व मुरूम तस्कराकडून अवैध वसुली करणे, हा त्यांचा नित्याचा काम आहे. या संदर्भात आमदार विजय रहांगडाले यांनासुद्धा येथील नागरिकांनी तक्रार दिली आहे. त्याचे स्थानांतरण करून देतो, असे आश्वासन आ. रहांगडाले यांनी ग्रामस्थांना दिले.आता स्थानांतरण झाले, पण हे तलाठी दोन महिन्यांपासून आपला चार्ज देत नाही. यामागील हेतू काय असावा, हे कळण्यास मार्ग नाही. करटी बु. येथील तलाठी गेडाम यांना येथील चार्ज देण्यात यावे, असे आदेश आल्याचे कळते. परंतु त्यांना चार्ज देण्यास तयार नाही. यामागे कोणत्या अधिकाऱ्याचे त्याच्या डोक्यावर हात आहे, हा संशोधनाचा विषय आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीवर लक्ष केंद्रीत करून या तलाठ्याचे स्थानांतर करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)