शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

तलाठ्यावर ग्रामस्थांचा रोष

By admin | Updated: April 9, 2016 02:03 IST

तिरोडा तहसील अंतर्गत येणाऱ्या साजा-१ अर्जुनी येथील तलाठी भिवगडे यांच्या अरेरावी धोरणामुळे येथील शेतकरी व ग्रामस्थ त्रासले आहेत.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : बदली होऊनही नवीन तलाठ्याला पदभार दिलाच नाहीइंदोरा (बु.) : तिरोडा तहसील अंतर्गत येणाऱ्या साजा-१ अर्जुनी येथील तलाठी भिवगडे यांच्या अरेरावी धोरणामुळे येथील शेतकरी व ग्रामस्थ त्रासले आहेत. सदर तलाठ्याची शेतकऱ्याप्रति वागणूक समाधानकारक नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष असून त्यांचे तात्काळ स्थानांतरण करून नवीन तलाठी देण्यात यावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तलाठी भिवगडे हे अर्जुनी गावात मागील एक वर्षापासून कार्यरत आहेत. ते जेव्हापासून या गावात आले तेव्हापासून त्यांची शेतकऱ्यांप्रति वागणूक चांगली नसून कुठल्याही कामाकरिता त्रास देणे सुरू आहे. शेतकऱ्यांचे सातबारा उतारे तसेच शेतीसंबंधी कुठल्याही दाखल्यासाठी पैसे मोजल्याशिवाय दाखले मिळत नाही. सदर तलाठी मुख्यालयात राहत नसून ८० किमी लांब असलेल्या स्वगावावरून ये-जा करतात. तलाठ्याबाबत १५ आॅगस्ट २०१५ च्या ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला व ग्रामपंचायतने या ठरावाच्या प्रति तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, आमदार यांना पाठवून स्थानांतर करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने तलाठी भिवगडे यांचे स्थानांतर करण्यात आले, असे गावात सांगण्यात आले. फेब्रुवारी २०१६ मध्ये स्थानांतराचे आदेश आल्याचे अधिकारी सांगातात. मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटून गेला, परंतु या तलाठ्याने आपला चार्ज दुसऱ्या तलाठ्यांना दिले नाही. याचे नेमके कारण काय? हेच जनतेला कळेनासे झाले. ेहे तलाठी जेव्हापासून अर्जुनी गावात आले तेव्हापासून शेतकऱ्यांना खूप त्रास आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ते वेळेवर कार्यालयात राहत नाही. शेतकऱ्यांशी अरेरावी करतात. कुठल्याही दाखल्यासाठी १०० रूपये घेतल्याशिवाय देत नाही. रेती व मुरूम तस्कराकडून अवैध वसुली करणे, हा त्यांचा नित्याचा काम आहे. या संदर्भात आमदार विजय रहांगडाले यांनासुद्धा येथील नागरिकांनी तक्रार दिली आहे. त्याचे स्थानांतरण करून देतो, असे आश्वासन आ. रहांगडाले यांनी ग्रामस्थांना दिले.आता स्थानांतरण झाले, पण हे तलाठी दोन महिन्यांपासून आपला चार्ज देत नाही. यामागील हेतू काय असावा, हे कळण्यास मार्ग नाही. करटी बु. येथील तलाठी गेडाम यांना येथील चार्ज देण्यात यावे, असे आदेश आल्याचे कळते. परंतु त्यांना चार्ज देण्यास तयार नाही. यामागे कोणत्या अधिकाऱ्याचे त्याच्या डोक्यावर हात आहे, हा संशोधनाचा विषय आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीवर लक्ष केंद्रीत करून या तलाठ्याचे स्थानांतर करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)