शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

अबब! एका पुलासाठी गावकऱ्यांचा 17 वर्षांपासून लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 12:39 IST

गावकरी आणि संघटनेचा पुलासाठी संघर्ष कायम आहे.

गोंदिया : तालुक्यातील डांगोर्ली येथील वैनगंगा नदीवर पूल तयार करण्यात यावा. यासाठी मागील 17 वर्षापासून येथील गावकऱ्यांचा लढा सुरू आहे. मात्र आजवर लोकप्रतिनिधी आणि शासनाने केवळ येथील गावक-यांना पूल तयार करण्याचे पोकळ आश्वासन देऊन वेळ मारून नेली. त्यामुळे अद्यापही पुलाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने गावकऱ्यांची समस्या कायम असून 'ये पूल कब बनेगा असा सवाल करित आहे.

डांगोर्ली येथील वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आल्यास महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात ये-जा करण्याचा मार्ग सुकर होईल. डांगोर्ली हे गाव मध्यप्रदेशच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे वैनगंगा नदीवर पूल तयार करण्यात आल्यास दोन्ही राज्यातील लोकांना व्यापार आणि इतर दृष्टीने सुध्दा ते सोयीचे होईल.

डांगोर्ली येथील अनेक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पावसाळ्या सुध्दा धोका पत्थकारुन या नदीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे कधी धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलाअभावी गावकऱ्यांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे. याचीच दखल घेत गोंदिया जिल्हा दलित सेनेचे अध्यक्ष ओमकार बन्सोड यांनी याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रश्न केला. 10 डिसेंबर 2003 मध्ये नागपूर येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान मोर्चा काढून व उपोषण केले होते. तेव्हा तत्कालीन सरकारने मध्यप्रदेश सरकारसोबत बोलून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले होते.

मात्र 17 वर्षांचा कालावधी लोटूनही हा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही. त्यामुळे गावकरी आणि संघटनेचा पुलासाठी संघर्ष कायम आहे. डांगोर्लीजवळ वैनगंगा नदीवर पूल तयार झाल्यास या दोन्ही राज्यांमध्ये उद्योग धंद्यात वाढ होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. शिवाय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना होत असलेला त्रास दूर होईल. त्यामुळे शासनाने याचा गांर्भियाने विचार करुन आतातरी पुलाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी वैनगंगा पूल निर्माण समितीचे अध्यक्ष ओमकार बन्सोड व गावकऱ्यांनी केली आहे.