शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

गाव एक, तालुके मात्र वेगवेगळे

By admin | Updated: April 10, 2016 01:58 IST

शिर्षक वाचून दचकलात का? पण शिर्षक सत्य आहे. दिघोरी/मोठी हे गाव सन १९९५ पासून लाखांदूर तालुक्यात विलीन झालेले आहे,

मुकेश देशमुख दिघोरी/मोठीशिर्षक वाचून दचकलात का? पण शिर्षक सत्य आहे. दिघोरी/मोठी हे गाव सन १९९५ पासून लाखांदूर तालुक्यात विलीन झालेले आहे, असे असले तरी दिघोरी (मोठी)येथील वीज ग्राहकांना आजही जे बिल येतात, त्यात कधी अर्जुनी/मोरगाव, सानगडी अथवा साकोली तालुका असल्याचे देयकावर नोंद असते. यावरुन वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार लक्षात येते. २१ वर्षापुर्वी म्हणजे सन १९९५ पुर्वी दिघोरी/मोठी हे गांव अर्जुनी/मोरगाव या तालुक्यात येत होते. त्यानंतर सन १९९५ ला दिघोरी गाव लाखांदूर तालुक्यात विलीन झाले. त्यामुळे विद्युत बिलावर अर्जुनी/मो. ऐवजी लाखांदूर तालुका अशी नोंद व्हायला हवी होती मात्र, विज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे व अधिकाऱ्यांच्या कुंभकर्णी झोपेमुळे आजही विद्युत बिलावर दिघोरी/मोठी गावाची नोंद अर्जुनी (मो.)तालुक्यात असल्याचे दिसून येते.आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, पासपोर्ट बनविणे, नवीन वाहन खरेदी करतांनी व इतर अनेक शासकीय, निमशासकीय कामासाठी विद्युत बिलाचा निवासी पत्ता म्हणून पुरावा ग्राहय धरला जातो. परंतु मागील २१ वर्षापुर्वी तालुका बदलला असतांनासुध्दा आजही जुन्याच तालुक्याची नोंद विद्युत बिलावर होत असल्याने विद्युत ग्राहकांना, सामान्य नागरिकांना यांचा बराच त्रास सहन करावा लागत आहे. दिघोरी/मोठी सोबतच लाखनी तालुक्यातील विहिरगाव व साकोली तालुक्यातील सोलबर्डी येथे येणाऱ्या विद्युत बिलांवरसुध्दा अर्जुनी (मोरगाव) व सानगडी तालुका असल्याची नोंद आढळून येते.मुळात सानगडी हा तालुकाचा दर्जा नसलेला गाव आहे. मात्र विद्युत विभागाने स्वत:ची शक्कल लढवून सानगड ला तालुक्याचा दर्जा दिला. यामुळे अशा चुकांच्या सामान्य नागरिकांना किती फटका बसतो याचा विचारच विद्युत विभाग करीत नसल्याचे आढळून येते. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे सामान्य ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो अशांवर कारवाई करुन गत २१ वर्षे कुंभकर्णी झोपेत असलेल्या विद्युत विभागाने जागे होवून विद्युत बिलावरील तालुक्यांचा घोळ मिटवावा, ज्या तालुक्याचे गाव असेल त्याचे तालुक्याचे नाव विद्युत बिलावर नोंदवावे, अशी मागणी दिघोरी, विहीरगांव व सालेबर्डीच्या विद्युत ग्राहकांनी केली आहे. तालुका बदल झाले असल्याने शासकीय कामात अनेकांना अडथळा निर्माण होत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी उपमुख्य कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे आता लक्ष आहे.