शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

२३ मार्चला ग्रा.पं.कर्मचारी करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहे. ही बाब अधिकाऱ्यांच्या वारंवार लक्षात आणून ...

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहे. ही बाब अधिकाऱ्यांच्या वारंवार लक्षात आणून दिल्यानंतरही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे परिणामी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. महासंघाने मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना चार निवेदने दिली. संघटनेच्या शिष्टमंडळाने मुकाअ यांच्याशी दोनदा चर्चा करुन मागण्याबाबत माहिती दिली. पण त्यांनी केवळ आश्वासन देऊन वेळ मारुन नेली. त्यामुळे संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यात सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे राज्य संघटक सचिव मिलिंद गणवीर,अध्यक्ष चत्रूधन लांजेवार,कार्याध्यक्ष सुखदेव शहारे, कोषाध्यक्ष महेंद्र भोयर, संघटन सचिव विष्णू हत्तीमारे, सचिव रविंद्र किटे, उपाध्यक्ष आशिष उरकुडे, सहसचिव खोजराम दरवडे, उपाध्यक्ष ईश्वरदास भंडारी, सहसचिव बुधराम बोपचे,विनोद शहारे, सुनील लिल्हारे,महेंद्र कटरे, मिथुन राहुलकर यांनी कळविले आहे.

......

या आहेत प्रमुख मागण्या

राज्य शासनाने १० ऑगस्ट २०२० ला या कर्मचाऱ्यांकरिता वाढीव नवीन किमान वेतन देण्याचे जाहीर केले आहे. या शासन निर्णय अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी. राज्याच्या ग्रामविकास विभागाने वर्ष २००५ मध्ये शासन निर्णय निर्गमित करुन किमान वेतन, भत्ता, भविष्य निर्वाह निधी इत्यादी सेवा शर्तीच्या अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुकाअ, बिडीओ व संबंधित अधिकाऱ्यांवर दिली आहे. पण त्यांनी अद्यापही याची अंमलबजावणी केली नाही. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये किमान वेतन, भत्ता, भ. नि. नि. बाबतीत तक्रारीचे निराकरण, नवीन किमान वेतनाची अंमलबजावणी व इतर विषयांवर त्वरित तक्रार निराकरण समितीची बैठक घेऊन करण्याची मागणी केली आहे.

.........