शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

पिण्याच्या पाण्यासाठी गावात हाहाकार

By admin | Updated: June 2, 2017 01:26 IST

मागील दोन दिवसांपासून पाणी पुरवठा योजना बंद पडल्याने गावात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला असून

पाणी पुरवठा योजना बंद : गावकऱ्यांची कसरत लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : मागील दोन दिवसांपासून पाणी पुरवठा योजना बंद पडल्याने गावात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला असून गंभीर समस्या निर्माण झाल्याचे चित्र गावात गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून गावात ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नळ योजना मागील काही वर्षापासून सूरु केली आहे. गावातील बहुतांश लोकांनी खाजगी नळ कनेक्शन घेऊन स्वत:च्या घरी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. गावामध्ये पाणी वितरण करण्यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केल्या गेली आहे. गावात ऐन पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना सुध्दा गेल्या दोन दिवसांपासून गावातील नळांना पाणी पुरवठा करणे बंद झाले आहे. नळयोजना बंद होण्यामागचे कारण मात्र कळू शकला नाही.यासंबंधात ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता गावात नळ सुरु नाहीत का? असा प्रतिप्रश्न करून माहिती घेतो असे त्यांनी सांगीतले. गावामध्ये सार्वजनिक हॅन्डपंप व विहीरी सुध्दा बऱ्या प्रमाणात आहेत. सध्या गावाशेजारील शेतामध्ये तसेच गावात काहींनी बोअरवेल मारून पाण्याची व्यवस्था केल्याने गावातील सार्वजनिक विहिरींमधील पाण्याची पातळी खोलवर गेल्याची भयावह स्थिती सध्या गावात पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये गावाची सार्वजनिक नळ योजना कुचकामी ठरत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून पिण्याच्या पाण्यापासून जनसामान्यांचे हालही होत आहे. पाण्यासाठी महिला वर्गाला जिवाचे हाल करावे लागत आहे. सध्या गावात रोहीणी नक्षत्रामध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याचा हाहाकार माजल्याचे चित्र सध्या गावात दिसत आहे. लाखो रुपयांची नळयोजना कुचकामी ठरत आहे. दोन ठिकाणच्या भल्या मोठ्या विहीरीमधून पाणी पुरवठा होत असतानी दोन-दोन दिवस ऐन टंचाईच्या दिवसात नळांना पाणी नाही हेच कळत नाही. ग्रामवासीयांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.