शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

गाव तंटामुक्त समित्या झाल्या गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:29 IST

केशोरी : राज्यशासनाने ग्रामीण भागातील झगडे, भांडण गावातच सामोपचाराने सोडविण्यात यावे या चांगल्या उद्देशाकरिता तत्कालीन गृहराज्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या ...

केशोरी : राज्यशासनाने ग्रामीण भागातील झगडे, भांडण गावातच सामोपचाराने सोडविण्यात यावे या चांगल्या उद्देशाकरिता तत्कालीन गृहराज्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या गाव तंटामुक्त समित्या प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर निर्माण करण्यात आल्या होत्या. गाव तंटामुक्त समित्यांचे चांगले रिझल्ट नागरिकांनी अनुभवले आहेत. परंतु अलीकडच्या काळात शासनाच्या उदासीन धोरणामुळे या गाव तंटामुक्त समित्या गायब झाल्याचे चित्र दिसू लागली आहे.

गावातील तंटे, भांडण गावातच सामोपचाराने मिटवून गावाला शांततेकडून समृध्दीकडे नेण्यासाठी राज्य शासनाच्या गृहविभागाने सन २००७ पासून तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेल्या गाव तंटामुक्त समित्या केवळ ग्रामपंचायतीच्या दप्तरापुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. काही गावातील तंटामुक्त समित्या राजकीय वादावादीत गायब झाल्या आहेत. तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीला राजकीय स्वरूप येऊ लागली होती. तंटामुक्त समित्यांचे कार्य थंडावल्यामुळे पोलीस विभागावरील कामाचा व्याप वाढला आहे. या परिसरातील कोणत्याच गावातील तंटामुक्त समित्या सक्रिय दिसून येत नाहीत. त्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशाला खिळ बसली की काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारीत आहे. गावागावात निर्माण होणारी वाद व तंटे गावातच सामोपचाराने गाव तंटामुक्त समितीच्या माध्यमातून संपुष्टात यावे आणि गावाला शांततेच्या मार्गाने समृध्दीकडे न्यावे असा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. या योजनेतून लाखो रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षिसे ग्रामपंचायतीने शासनाकडून प्राप्त करून घेतले. काही काळापर्यंत या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. काही गावातील तंटामुक्त समित्यांनी उत्कृष्ट कार्य करून शासनास मदत केली. परंतु अलीकडच्या काळात गाव तंटामुक्त समित्या पडद्याआड झाल्याचे चित्र दिसून येत आहे.