शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

गाव तंटामुक्त समित्या झाल्या गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:29 IST

केशोरी : राज्यशासनाने ग्रामीण भागातील झगडे, भांडण गावातच सामोपचाराने सोडविण्यात यावे या चांगल्या उद्देशाकरिता तत्कालीन गृहराज्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या ...

केशोरी : राज्यशासनाने ग्रामीण भागातील झगडे, भांडण गावातच सामोपचाराने सोडविण्यात यावे या चांगल्या उद्देशाकरिता तत्कालीन गृहराज्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या गाव तंटामुक्त समित्या प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर निर्माण करण्यात आल्या होत्या. गाव तंटामुक्त समित्यांचे चांगले रिझल्ट नागरिकांनी अनुभवले आहेत. परंतु अलीकडच्या काळात शासनाच्या उदासीन धोरणामुळे या गाव तंटामुक्त समित्या गायब झाल्याचे चित्र दिसू लागली आहे.

गावातील तंटे, भांडण गावातच सामोपचाराने मिटवून गावाला शांततेकडून समृध्दीकडे नेण्यासाठी राज्य शासनाच्या गृहविभागाने सन २००७ पासून तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेल्या गाव तंटामुक्त समित्या केवळ ग्रामपंचायतीच्या दप्तरापुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. काही गावातील तंटामुक्त समित्या राजकीय वादावादीत गायब झाल्या आहेत. तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीला राजकीय स्वरूप येऊ लागली होती. तंटामुक्त समित्यांचे कार्य थंडावल्यामुळे पोलीस विभागावरील कामाचा व्याप वाढला आहे. या परिसरातील कोणत्याच गावातील तंटामुक्त समित्या सक्रिय दिसून येत नाहीत. त्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशाला खिळ बसली की काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारीत आहे. गावागावात निर्माण होणारी वाद व तंटे गावातच सामोपचाराने गाव तंटामुक्त समितीच्या माध्यमातून संपुष्टात यावे आणि गावाला शांततेच्या मार्गाने समृध्दीकडे न्यावे असा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. या योजनेतून लाखो रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षिसे ग्रामपंचायतीने शासनाकडून प्राप्त करून घेतले. काही काळापर्यंत या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. काही गावातील तंटामुक्त समित्यांनी उत्कृष्ट कार्य करून शासनास मदत केली. परंतु अलीकडच्या काळात गाव तंटामुक्त समित्या पडद्याआड झाल्याचे चित्र दिसून येत आहे.