शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गाव तंटामुक्त समित्या झाल्या गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:29 IST

केशोरी : राज्यशासनाने ग्रामीण भागातील झगडे, भांडण गावातच सामोपचाराने सोडविण्यात यावे या चांगल्या उद्देशाकरिता तत्कालीन गृहराज्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या ...

केशोरी : राज्यशासनाने ग्रामीण भागातील झगडे, भांडण गावातच सामोपचाराने सोडविण्यात यावे या चांगल्या उद्देशाकरिता तत्कालीन गृहराज्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या गाव तंटामुक्त समित्या प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर निर्माण करण्यात आल्या होत्या. गाव तंटामुक्त समित्यांचे चांगले रिझल्ट नागरिकांनी अनुभवले आहेत. परंतु अलीकडच्या काळात शासनाच्या उदासीन धोरणामुळे या गाव तंटामुक्त समित्या गायब झाल्याचे चित्र दिसू लागली आहे.

गावातील तंटे, भांडण गावातच सामोपचाराने मिटवून गावाला शांततेकडून समृध्दीकडे नेण्यासाठी राज्य शासनाच्या गृहविभागाने सन २००७ पासून तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेल्या गाव तंटामुक्त समित्या केवळ ग्रामपंचायतीच्या दप्तरापुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. काही गावातील तंटामुक्त समित्या राजकीय वादावादीत गायब झाल्या आहेत. तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीला राजकीय स्वरूप येऊ लागली होती. तंटामुक्त समित्यांचे कार्य थंडावल्यामुळे पोलीस विभागावरील कामाचा व्याप वाढला आहे. या परिसरातील कोणत्याच गावातील तंटामुक्त समित्या सक्रिय दिसून येत नाहीत. त्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशाला खिळ बसली की काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारीत आहे. गावागावात निर्माण होणारी वाद व तंटे गावातच सामोपचाराने गाव तंटामुक्त समितीच्या माध्यमातून संपुष्टात यावे आणि गावाला शांततेच्या मार्गाने समृध्दीकडे न्यावे असा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. या योजनेतून लाखो रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षिसे ग्रामपंचायतीने शासनाकडून प्राप्त करून घेतले. काही काळापर्यंत या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. काही गावातील तंटामुक्त समित्यांनी उत्कृष्ट कार्य करून शासनास मदत केली. परंतु अलीकडच्या काळात गाव तंटामुक्त समित्या पडद्याआड झाल्याचे चित्र दिसून येत आहे.