शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

बळीराजा लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:13 IST

मागील तीन दिवसांपासून संततधार बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मोठ्या आशेने शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.अपेक्षेच्या तुलनेत आत्तापर्यंत अर्धाच पाऊस झाला आहे.त्यामुळे आजही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

ठळक मुद्देसंततधार पावसाने केले खूश : दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन दिवसांपासून संततधार बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मोठ्या आशेने शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.अपेक्षेच्या तुलनेत आत्तापर्यंत अर्धाच पाऊस झाला आहे.त्यामुळे आजही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यातील पर्जन्यमान बघता आतापर्यंत सरासरी ६४४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे.असे असताना मात्र वरुण राजाची नाराजी जिल्ह्याला चांगलीच भोवली आहे.आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे बघता अद्याप सरासरी २८४ मिमी पावसाची तूट कायम आहे.जून महिना कोरडा गेला असतानाच जुलै महिन्यातही पावसाने अपेक्षापूर्ती केली नाही.पंधरावडाभर दडी मारल्यानंतर मागील तीन दिवसांपासून पाऊस जिल्ह्यात परतून आला आहे.या पावसामुळे शेतकºयाला थोडाफार दिलासा मिळाला असून तो शेतीच्या कामाला पुन्हा जुंपल्याचे चित्र आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने कित्येकांची रोवणी अडकून पडली होती.तर नर्सरीही वाळत आल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळाले.अशात या पावसामुळे शेतकरी रोवणीच्या कामाला लागला आहे.पावसाच्या या खेळीने आता उशीर झाला असतानाही शेतकरी एका आशेने आपल्या शेतीत जुंपल्याचे दिसून येत आहे.असे असताना आजही दमदार पावसाची गरज आहे.जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेचमागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने आजही जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत नाममात्र पाणीसाठा आहे. हे प्रकल्प तहानलेलेच दिसून येत आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांवर नजर टाकल्यास मागील २९ जुलैपर्यंत इटियाडोह प्रकल्पात १५२.६८ दलघमी (४८.०३ टक्के) पाणीसाठा असतानाच यंदा फक्त ८४.५१ दलघमी (२६.५८ टक्के) पाणीसाठा आहे.सिरपूर प्रकल्पात मागील वर्षी ४२.७५ दलघमी (२६.७५ टक्के) पाणीसाठा असताना यंदा ३६.५८ दलघमी (२२.९० टक्के) पाणीसाठा आहे. पूजारीटोला प्रकल्पात मागील वर्षी ३२.५६ दलघमी (७४.८० टक्के) पाणीसाठा असताना यंदा ३२.५६ दलघमी (२०.१४ टक्के) पाणीसाठा असून कालीसराड प्रकल्पात मागील वर्षी १८.१९ दलघमी (७०.८६ टक्के ) पाणीसाठा असतानाच यंदा फक्त ३.८१ दलघमी (१४.६४ टक्के) पाणीसाठा आहे.पावसाळ््यात प्रकल्पांची ही स्थिती असल्यास दमदार पाऊस न बरसल्यास येणारा उन्हाळा मात्र कसा राहणार याची कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे.