शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

बळीराजा लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:13 IST

मागील तीन दिवसांपासून संततधार बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मोठ्या आशेने शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.अपेक्षेच्या तुलनेत आत्तापर्यंत अर्धाच पाऊस झाला आहे.त्यामुळे आजही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

ठळक मुद्देसंततधार पावसाने केले खूश : दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन दिवसांपासून संततधार बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मोठ्या आशेने शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.अपेक्षेच्या तुलनेत आत्तापर्यंत अर्धाच पाऊस झाला आहे.त्यामुळे आजही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यातील पर्जन्यमान बघता आतापर्यंत सरासरी ६४४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे.असे असताना मात्र वरुण राजाची नाराजी जिल्ह्याला चांगलीच भोवली आहे.आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे बघता अद्याप सरासरी २८४ मिमी पावसाची तूट कायम आहे.जून महिना कोरडा गेला असतानाच जुलै महिन्यातही पावसाने अपेक्षापूर्ती केली नाही.पंधरावडाभर दडी मारल्यानंतर मागील तीन दिवसांपासून पाऊस जिल्ह्यात परतून आला आहे.या पावसामुळे शेतकºयाला थोडाफार दिलासा मिळाला असून तो शेतीच्या कामाला पुन्हा जुंपल्याचे चित्र आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने कित्येकांची रोवणी अडकून पडली होती.तर नर्सरीही वाळत आल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळाले.अशात या पावसामुळे शेतकरी रोवणीच्या कामाला लागला आहे.पावसाच्या या खेळीने आता उशीर झाला असतानाही शेतकरी एका आशेने आपल्या शेतीत जुंपल्याचे दिसून येत आहे.असे असताना आजही दमदार पावसाची गरज आहे.जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेचमागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने आजही जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत नाममात्र पाणीसाठा आहे. हे प्रकल्प तहानलेलेच दिसून येत आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांवर नजर टाकल्यास मागील २९ जुलैपर्यंत इटियाडोह प्रकल्पात १५२.६८ दलघमी (४८.०३ टक्के) पाणीसाठा असतानाच यंदा फक्त ८४.५१ दलघमी (२६.५८ टक्के) पाणीसाठा आहे.सिरपूर प्रकल्पात मागील वर्षी ४२.७५ दलघमी (२६.७५ टक्के) पाणीसाठा असताना यंदा ३६.५८ दलघमी (२२.९० टक्के) पाणीसाठा आहे. पूजारीटोला प्रकल्पात मागील वर्षी ३२.५६ दलघमी (७४.८० टक्के) पाणीसाठा असताना यंदा ३२.५६ दलघमी (२०.१४ टक्के) पाणीसाठा असून कालीसराड प्रकल्पात मागील वर्षी १८.१९ दलघमी (७०.८६ टक्के ) पाणीसाठा असतानाच यंदा फक्त ३.८१ दलघमी (१४.६४ टक्के) पाणीसाठा आहे.पावसाळ््यात प्रकल्पांची ही स्थिती असल्यास दमदार पाऊस न बरसल्यास येणारा उन्हाळा मात्र कसा राहणार याची कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे.