शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

बळीराजा लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:13 IST

मागील तीन दिवसांपासून संततधार बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मोठ्या आशेने शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.अपेक्षेच्या तुलनेत आत्तापर्यंत अर्धाच पाऊस झाला आहे.त्यामुळे आजही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

ठळक मुद्देसंततधार पावसाने केले खूश : दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन दिवसांपासून संततधार बरसत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मोठ्या आशेने शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.अपेक्षेच्या तुलनेत आत्तापर्यंत अर्धाच पाऊस झाला आहे.त्यामुळे आजही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यातील पर्जन्यमान बघता आतापर्यंत सरासरी ६४४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे.असे असताना मात्र वरुण राजाची नाराजी जिल्ह्याला चांगलीच भोवली आहे.आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे बघता अद्याप सरासरी २८४ मिमी पावसाची तूट कायम आहे.जून महिना कोरडा गेला असतानाच जुलै महिन्यातही पावसाने अपेक्षापूर्ती केली नाही.पंधरावडाभर दडी मारल्यानंतर मागील तीन दिवसांपासून पाऊस जिल्ह्यात परतून आला आहे.या पावसामुळे शेतकºयाला थोडाफार दिलासा मिळाला असून तो शेतीच्या कामाला पुन्हा जुंपल्याचे चित्र आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने कित्येकांची रोवणी अडकून पडली होती.तर नर्सरीही वाळत आल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळाले.अशात या पावसामुळे शेतकरी रोवणीच्या कामाला लागला आहे.पावसाच्या या खेळीने आता उशीर झाला असतानाही शेतकरी एका आशेने आपल्या शेतीत जुंपल्याचे दिसून येत आहे.असे असताना आजही दमदार पावसाची गरज आहे.जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेचमागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाल्याने आजही जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत नाममात्र पाणीसाठा आहे. हे प्रकल्प तहानलेलेच दिसून येत आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांवर नजर टाकल्यास मागील २९ जुलैपर्यंत इटियाडोह प्रकल्पात १५२.६८ दलघमी (४८.०३ टक्के) पाणीसाठा असतानाच यंदा फक्त ८४.५१ दलघमी (२६.५८ टक्के) पाणीसाठा आहे.सिरपूर प्रकल्पात मागील वर्षी ४२.७५ दलघमी (२६.७५ टक्के) पाणीसाठा असताना यंदा ३६.५८ दलघमी (२२.९० टक्के) पाणीसाठा आहे. पूजारीटोला प्रकल्पात मागील वर्षी ३२.५६ दलघमी (७४.८० टक्के) पाणीसाठा असताना यंदा ३२.५६ दलघमी (२०.१४ टक्के) पाणीसाठा असून कालीसराड प्रकल्पात मागील वर्षी १८.१९ दलघमी (७०.८६ टक्के ) पाणीसाठा असतानाच यंदा फक्त ३.८१ दलघमी (१४.६४ टक्के) पाणीसाठा आहे.पावसाळ््यात प्रकल्पांची ही स्थिती असल्यास दमदार पाऊस न बरसल्यास येणारा उन्हाळा मात्र कसा राहणार याची कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे.