शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

पीयूसीविना धावताहेत वाहने

By admin | Updated: December 24, 2015 02:25 IST

वाढत्या नागरिकरणाने रहदारीची समस्या बळावली आहे. त्यात दिवसेंगणिक वाहनांच्या संख्येने भर घातली

४.१८ लाखांचा दंड वसूल : ठोस उपाययोजनाच नाहीतइंद्रपाल कटकवार भंडारावाढत्या नागरिकरणाने रहदारीची समस्या बळावली आहे. त्यात दिवसेंगणिक वाहनांच्या संख्येने भर घातली असताना प्रदुषणाच्या स्तरातही वाढ होत आहे. जिल्ह्यात दोन लाखांच्या घरात वाहनांची संख्या असली तरी वाहन वायु प्रदुषणमुक्त करण्याच्या (पीयुसी) नियमांना नागरिकांनीच ‘खो’ दिला आहे. विशेष म्हणजे एकूण वाहनांपैकी किती वाहनधारकांनी नियमितपणे ‘पीयुसी’ केली आहे, याची रितसर नोंद आरटीओमध्ये नाही. आपण चालवित असलेल्या वाहनाद्वारे प्रदूषण होत आहे किंवा नाही हे ठरविण्याचे मानक शासनाने जारी केले असले तरी आजही भंडारा जिल्ह्यातील हजारो वाहनधारक ‘पीयुसी’ प्रमाणपत्राविनाच वाहन चालवित आहेत. यासाठी वाहनचालकांच्या मानसिकतेत बदल घडून येणे महत्त्वाचे आहे. आधीच प्रदुषणामुळे मानवी आरोग्याला फटका बसत असताना दुसरीकडे वाहनचालकांकडून नियमांना तिलांजली देण्याचा प्रकार सुरू आहे. ४.१८ लाखांचा दंड वसूलपीयुसी काढल्यानंतर सोबत न बाळगणे अथवा पीयुसी न काढणे या दोन बाबींच्या अनुषंगाने भंडारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वर्षभरात २,७२० वाहनधारकांची तपासणी केली. यापैकी २५४ वाहनधारकांनी पीयुसी काढली परंतु सोबत बाळगली नसल्याने त्यांच्याकडून १०,६२० हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. याशिवाय पीयुसी नसलेल्या ४१७ वाहनधारकांकडून ३ लाख ९८ हजार ५०० रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.वाहनसंख्या पाऊणेदोन लाखावर भंडारा जिल्ह्यात एक लक्ष ८२ हजार २८९ वाहनांची नोंद आहे. जिल्ह्यात एकूण १,२१९ आॅटोरिक्षा आहेत. मोटारसायकल १ लाख ५,१००, स्कूटर २६,४८६, मोपेड २०,६७१, मोटारकार ७,६८९, जिप ७,६८९, स्कूल बसेस १५० ट्रक व लॉरी १,११३, टँकर्स ६७, मालवाहतूक चारचाकी गाडी १,७१७, तीन चाकी मालवाहतूक गाडी ५७१, ट्रॅक्टर ८,८३९ आहेत.अद्याप ठोस कारवाई नाही!केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांना पुढे पाठविण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होत असते. प्रदूषण नियंत्रणासाठी कोणताही उपक्रम नाही. विशेष म्हणजे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून तपासणी व दंड आकरणी केल्याशिवाय कुठलीच ठोस कारवाई होत नाही. काय म्हणतो ‘पीयुसी’ कायदाकेंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ११५ व ११६ नुसार मोटार वाहनांकरिता पेट्रोल ंिधनावर चालणाऱ्या वा डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनाकरिता वायु प्रदुषण प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे. याकरिता वाहनातून उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषक घटकाचे प्रमाण कायद्याने निश्चित केले आहे. त्यामुळे वाहन चालकांनी आपल्या वाहन धूर सोडणारे आहे का? याची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. वाहन रस्यावर चालविण्यापूर्वी प्रदूषण नियंत्रित मर्यादेत असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याकरिता प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र जारी करण्याऱ्या खाजगी केंद्रांना मोटार वाहन विभागाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार त्या-त्या ठिकाणी वाहनांच्या प्रदुषणाची तपासणी करून ‘पीयूसी’ प्रमाणपत्र देण्याची तरतुद आहे.नवीन वाहनांकरिता वाहनाचे नोंदणीनंतर एक वर्ष वायु प्रदुषण प्रमाणपत्र आवश्यक नाही. मात्र त्यानुसार निकषानुसार वाहनांची पीयुसी काढणे महत्वाचे आहे. एखाद्या वाहनधारकाकडे पीयुसी नसेल तर १००० रूपये व असेल पण सोबत बाळगला नसेल तर १०० रूपये दंड आकारला जातो. मोटार वाहनांद्वारे होणाऱ्या वायु प्रदुषणाबाबतच्या तरतुदी मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १९० तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ११५ व ११६ मध्ये समाविष्ट आहेत.