शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

वरुणदेवा, कृपा असू दे

By admin | Updated: June 14, 2015 01:52 IST

दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीने तर गेल्यावर्षी अल्पवृष्टीने होरपळलेले शेतकरी यावर्षी तरी समतोल पाऊस येईल ...

गोंदिया : दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीने तर गेल्यावर्षी अल्पवृष्टीने होरपळलेले शेतकरी यावर्षी तरी समतोल पाऊस येईल आणि शेतात डौलाने पिक उभं राहील यासाठी वरुणदेवाला प्रार्थना करीत आहेत. पावसाने अजून जिल्ह्यात हजेरी लावलेली नसली तरी शेतीचा जुगार खेळण्यासाठी शेतकरी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानात शेतीला आधुनिकतेची जोड दिली जात असली तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीत फारसा बदल झाल्याचे दिसून येत नाही. महागडे बियाणे, कीटकनाशके, खतांच्या वाढलेल्या किमती, मजुरीचा ताळमेळ जुळवताना कधीतरी आपल्याही घरात संपन्नता नांदेल याच आशेवर शेतकरी पुन्हा एकदा काळ्या मातीत हिरवं स्वप्नं रंगवण्यासाठी सज्ज झाले आहेत.गोंदिया : यावर्षी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने १.९५ लाख हेक्टरमध्ये विविध पिकांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. मुख्यता भाताच्या वाणाचे ४४ हजार क्विंटल भात बियाणे तालुकानिहाय विक्री केंद्रावर उपलब्ध करवून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाबीजसोबतच इतर खासगी कंपन्याही बियाण्यांच्या बाजारात आपले अस्तित्व वाढवून शेतकऱ्यांना आकर्षित करण्याच्या कामात गुंतल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शासनाकडून ५८ हजार १०० मेट्रीक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले असून तालुकानिहाय कृषी केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके योग्य दर्जाचे उपलब्ध व्हावे म्हणून जास्तीत जास्त नमूने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश सबंधितांना देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समितीकडे संपर्क साधून तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदी करते वेळी अधिकृत कंपन्यांचे व अधिकृत कृषी केंद्रातूनच बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके खरेदी करावे. खरेदी केलेल्या कृषी निविष्ठाची पक्की पावती प्राप्त करून घ्यावी. बॅग/कंटेनरवर छापील किंमती पेक्षा जास्त रक्कम अदा करू नये. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील यांनी केले आहे.कमी लागवड खर्चासाठी प्रयत्न करावाशेतकरी केवळ उत्पन्न वाढविण्यासाठी रासायनिक खताचा अधिक वापर करीत नाही. आजसुद्धा शेवाल, गांढूळ खत बनविण्यासाठी राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. परंतु शेतकरी याचा लाभ घेत नाही. या प्राकृतिक खतांमुळे जमिनीची उत्पादकता वाढते. तसेच खतासाठी होणार खर्च कमी केला जावू शकतो. मानसूनची अनिश्चितता, पिकांवर रोग, वाढती रासायनिक खताची किमत या तीन बाबी लक्षात ठेवून उत्पादन खर्च कमी करूनच शेतकऱ्यांना आता आपला लाभ वाढवावा लागेल. शेतीलासुद्धा एक उद्योग समजून लाभ-हानी लक्षात ठेवून शेतकऱ्यांना शेती करावी लागणार आहे.भरारी पथक व सनियंत्रण कक्ष झाला सक्रीयजिल्ह्यात सद्यस्थितीत एक हजार ५९३ कृषी केंद्र कार्यरत असून त्यामध्ये रासायनिक खताचे ८८९, बियाणे ४१५ व किटकनाशके ३९५ निविष्ठा विक्री केंद्र कार्यरत आहे. शेतकऱ्यांना योग्य प्रतीचे बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके उपलब्ध होणाच्या दृष्टीने जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील यांच्या अध्यक्षतेत एकूण नऊ भरारी पथके व संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. जिल्हा व तालुकास्तरावर व्यापक प्रमाणात कृषी केंद्रांची तपासणी करणे व त्रुट्या आढळून आल्यास कार्यवाही करणे सुरूही केले आहे.सात कृषी केंद्रांवर विक्रीबंदीशेतीसाठी लागणारे बियाणे, खते व कीटकनाशकांची विक्री करताना नियमांचे पालन न केल्याने आगमाव व सालेकसा तालुक्यातील सात कृषी केंद्रांवर सोमवारी भरारी पथकाने कारवाई करीत विक्रीबंद केली. भरारी पथकाने कृषी केंद्रांची तपासणी केली. त्यात आमगाव तालुक्यातील चेतन कृषी केंद्र आमगाव, परमात्मा एक कृषी केंद्र आमगाव आणि माँ बम्बलेश्वरी कृषी केंद्र आमगाव, सालेकसा तालुक्यातील अंबुले कृषी केंद्र सालेकसा, माँ बम्बलेश्वरी कृषी केंद्र सालेकसा, खरेदी विक्री सोसायटी सालेकसा आणि किसान कृषी साकरीटोला या केंद्रावर अनियमितता आढळली. स्टॉकची नोंदणी नसणे, रेट बोर्ड नसणे, मालाचा रेकॉर्ड नसणे अशा विविध कारणांसाठी दोषी ठरविले.