शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात ४.९२ कोटींची विविध कामे

By admin | Updated: May 13, 2015 01:34 IST

शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवित आहे. मात्र या योजनांचा त्यांना कितपत फायदा होतो,....

देवानंद शहारे गोंदियाशासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवित आहे. मात्र या योजनांचा त्यांना कितपत फायदा होतो, हे त्यांनाच ठावूक. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोट्यवधी रूपयांची कामे केली जातात. तरी शेतकरी आर्थिक नुकसानीत भरडला जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गतीमान विकास पाणलोट कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरात चार कोटी ९२ लाख १९ हजार रूपयांची कामे मार्च २०१५ या एकाच महिन्यात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.गतीमान पाणलोट विकास कार्यक्रमातून वर्षभर शेततळे, नाला खोलीकरण, मजगी बांधकाम, बोडी खोलीकरण, मातीनाला बांधकाम, सिमेंट नाला बांधकाम, भात खाचर दुरूस्ती आदी अनेक कामे जिल्हाभरात करण्यात आलीत. मात्र आर्थिक वर्ष २०१५ च्या शेवटच्या मार्च या एकाच महिन्यात जवळपास चार कोटी ९२ लाख १९ हजार रूपयांची कामे करण्यात आल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. या कामांमुळे पाण्याची साठवणूक होण्यास मदत होणार असून त्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी करता येणार आहे.जिल्हा कृषी विभागामार्फत गतीमान पाणलोट विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्च महिन्यात एकूण २४ शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. यात गोंदिया तालुक्यात एक, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात चार, सालेकसा तालुक्यात ११, तिरोडा तालुक्यात सहा तर आमगाव तालुक्यात दोन शेततळ्यांचा समावेश आहे. याच महिन्यांत नाला खोलीकरणाची एकूण १५ कामे करण्यात आलीत. यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १० तर देवरी तालुक्यात पाच नाला खोलीकरण कामांचा समावेश आहे. मजगी बांधकाम केवळ सालेकसा तालुक्यात करण्यात आले असून ते काम एकूण १४.४९ हेक्टरमध्ये करण्यात आले आहे.याशिवाय बोडी खोलीकरणाची कामे करण्यात आली आहेत. यात गोंदिया तालुक्यात पाच, देवरी तालुक्यात तीन तर तिरोडा तालुक्यात एका बोडीच्या खोलीकरणाचा समावेश आहे. जिल्ह्यात आठ मातीनाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. यात देवरी तालुक्यात सहा तर सालेकसा तालुक्यात दोन मातीनाला बांधकामांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सिमेंट नाल्यांचे बांधकाम करण्यात आले असून त्यांची संख्या ४२ आहे. यात गोंदिया तालुक्यात चार, तिरोडा तालुक्यात एक, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २०, देवरी तालुक्यात ११, आमगाव तालुक्यात तीन, सालेकसा तालुक्यात तीन सिमेंट नाल्यांचा समावेश आहे. केवळ गोंदिया तालुक्यातील ४४.३४ हेक्टर जमिनीवर भात खाचर दुरूस्तीचे काम करण्यात आले आहे. अशाप्रकारे मार्च २०१५ या एकाच महिन्यात तब्बल चार कोटी ९२ लाख १९ हजार रूपयांची कामे गतीमान पाणलोट विकास कार्यक्रमातून करण्यात आली आहेत.किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?शासन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रमांतर्गत कोट्यवधी रूपये खर्च करतो. तरीसुद्धा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवतच आहे. त्यामुळे या उपक्रमाचा लाभ नेमक्या किती शेतकऱ्यांना होतो, हा संशोधनाचा विषय आहे. कधी नैसर्गिक संकट तर कधी सुलतानी समस्या यात शेतकरी भरडला जात आहे. यंदा शासनाने धानावर बोनस न दिल्याने शेतकऱ्यांवर मोठाच अन्याय झाला आहे. एवढा पैसा खर्च होत असताना व शासन विविध योजना राबवित असताना अवघ्या देशाचे पोट भरणारा शेतकरी उपेक्षितच का? असा प्रश्न निर्माण होत आहे.