शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वनग्राम गावांचे स्वप्न भंगले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:26 IST

महसूल विभागाच्या धर्तीवर राज्यातील वन क्षेत्रालगतच्या गावांना टप्पा टप्यात ग्रामपंचायतीच्या सहमतीने महसूल हक्कांना बाधा न पोहोचविता वनग्राम निर्माण करण्याचा संकल्प वनविभागाने केला होता.

ठळक मुद्देविकास कामांचा अभाव : अंमलबजावणी नाही, आराखडा कागदावरच

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : महसूल विभागाच्या धर्तीवर राज्यातील वन क्षेत्रालगतच्या गावांना टप्पा टप्यात ग्रामपंचायतीच्या सहमतीने महसूल हक्कांना बाधा न पोहोचविता वनग्राम निर्माण करण्याचा संकल्प वनविभागाने केला होता. या माध्यमातून काही प्रमाणात गावांचा विकास होण्यास चालना मिळाली. यासाठी वनग्राम समितीची स्थापन करण्यात आली. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने वनग्राम गावांचा विकास रखडला असून गावकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे.स्वातंत्र्यानंतर वनग्राम गावांना महसूली गावांचा दर्जा दिल्याने विभागाचे गावावरील हक्क कमी झाले. अलीकडच्या काळात वनावरील साधन संपत्तीवर गावकरी हक्क दाखवित आहेत. वनविभाग गावकºयांच्या सहकार्याने वन व्यवस्थापन व वनांवर आधारित रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार होते. त्यासाठी १५ हजार गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्या वन विभागाला मदत करीेत आहे. वन्यजीव, जंगलांना आग लागणे, अवैध चराईचे प्रमाण कमी झाले. १९७२ मध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील वनग्राम थाडेझरी नागझिरा अभयारण्यात येत असल्याने या गावाचे पुनवर्सन करण्यात आले. पण, अद्यापही थाडेझरी गावाचा विकास झाला नाही. वनविभागाने वनग्राम निर्माण करताना १९९६-९७ पूर्वीची स्थिती होती ती कायम ठेवायला पाहिजे होती.शासनाने राखीव वन घोषित करताना जनभावनांचा विचार करायला पाहिजे होता. मात्र अधिकाºयांनी कोणत्याही ग्रामपंचायतकडून ग्रामपंचायतचा ठराव न मागविता राखीव वन घोषित केले. परिणामी अनेक गावांचा विकास रखडला. कोसमतोंडीवरुन अर्धा कि.मी. अंतरावर नागझिरा अभयारण्याची सीमा आहे. नागझिरा अभयारण्य व्याघ्र प्रकल्प घोषित झाले. कोसमतोंडीवरुन थाडेझरी तीन कि.मी.अंतरावर असून या गावाचा कोसमतोंडी गट ग्रामपंचायतमध्ये समावेश आहे. थाडेझरीपासून व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याची गरज होती. मात्र कोसमतोंडी सीमेवरुन घोषित केल्याने चिचटोला, मुंडीपार (ई), बेहळीटोला, हेटी, गिरोला, धानोरी, मालीजुंगा, लेंडेझरी, मुरपार या गावातील शेतकऱ्यांवर गुरे चारण्यासाठी वनविभाग मनाई करीत आहे. अनेकवेळा २५-३० कि.मी. अंतरावरील कोंडवाड्यात जनावरे नेण्यात येतात. गावालगतचे जंगल हे वनग्राम समितीच्या ताब्यात दिल्यानंतर त्या ठिकाणची वनसमिती संपुष्टात आली.वनविभागाने वनग्रामसाठी दहा वर्षाचा कृती आराखडा तयार केला. मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. मोहा, बांबू या माध्यमातून गावकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाईल असे स्वप्न गावकऱ्यांना दाखविण्यात आले. मात्र अद्यापही रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला नाही.वनक्षेत्रात वाढ करण्याचा उद्देशगावालगतचे जंगल हे वनग्राम समितीच्या ताब्यात दिल्यानंतर त्या ठिकाणची वन समिती संपुष्टात आली. त्या गावाला वनग्रामचा दर्जा मिळाल्याने तर गावकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना वनविभाग राबवितो. यासाठी वने व जिल्हा प्रशासनाकडून निधी दिला जातो. वनांवर आधारित रोजगार उपलब्ध करुन दिले जाते. त्या बदल्यात वनांची वाढ होण्यासाठी मदत करणे हा या मागील हेतू आहे.दहा वर्षाचा कृती आराखडा कागदावरज्या गावांना वनग्राम योजनेत सहभागी व्हायचे आहे. त्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये तसा ठराव मंजूर करुन ग्रामपंचायत कायदा (३) सन १९५९ नुसार वनग्राम घोषित करण्यापूर्वी अधिसूचना जारी करुन वनव्यवस्थापन नैसर्गिक साधन संपत्तीचा सारासार विचार व त्यावरील ग्रामस्थांचे हक्क, जबाबदारी निश्चित केली जाते. गावाचा सर्वांगिन विकास करण्यासाठी दहा वर्षाचा कृती आराखडा आधीच तयार करुन निधी देण्याचे नियोजनही केले जाते. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने वनग्रामचा विकास खुंटला आहे.