शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

धानाचे पऱ्हे वाढले; बळीराजावर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 7, 2014 00:00 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सडक/अर्जुनी तालुक्यातील बळीराजाला बसत चालला असून दुष्काळसदृश परिस्थितीचे चित्र तालुक्यात निर्माण होऊ पाहत आहे. पाण्याअभावी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या

कोसमतोंडी : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सडक/अर्जुनी तालुक्यातील बळीराजाला बसत चालला असून दुष्काळसदृश परिस्थितीचे चित्र तालुक्यात निर्माण होऊ पाहत आहे. पाण्याअभावी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पऱ्हे वाळले असून बळीराजांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मागील हंगामात सरासरी धानाचे उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचे दु:ख पचवू न शकणाऱ्या बळीराजावर यंदाही संकटाचे डोंगर निर्माण होण्याची शक्यता आहे. धानाचे मुख्य पीक घेणाऱ्या सडक/अर्जुनी तालुक्यावर सध्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी धानाचे पऱ्हे वाळले आहेत. पावसाचे मृग व आर्द्रा दोन्ही नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना यावर्षीही दुष्काळ सहन करावा लागणार आहे. यावर्षी तरी चांगले पीक येईल या हेतूने महागड्या धानाचे बियाणे घेऊन परिसरातील शेतकऱ्याने भात पिकाचे पऱ्हे भरले आहे. पावसाने आतापर्यंत हजेरी न लावल्यामुळे पऱ्हे पाण्याअभावी मरत आहेत. पऱ्हेच मेल्यामुळे रोवणे कसे करावे, ही चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, अशा शेतकऱ्याने फक्त आपली पऱ्हे जगविली आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय नाही असे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. कोरडवाहू जमिनीत कमी दिवसात निघणाऱ्या धानाची रोवणी केली जाते. त्या धानाचे रोवणे वेळेवर झाले नाही तर धान्य पिकण्याची शाश्वती नसते. १५ दिवसांपूर्वी पावसाची रिमझीम सुरू झाली होती. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तो मोठ्या उत्साहाने शेतीच्या कामाला लागला होता. यावर्षी पावसाळा चांगला राहील पीक भरपूर येईल, अशी आशा शेतकरी बाळगून होता. परंतु पावसाने शेतकऱ्याच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. महागडे बी-बियाणे पेरले व नांगरणी-वखरणी केली. त्यामुळे जवळ होता नव्हता तो ही पैसा खर्च झाला आहे. जर वेळेवर रोवणी झाली नाही तर त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जनावरांना पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी दररोज आकाशाकडे पावसाच्या प्रतीक्षेत डोळे लावून पाहत आहे. (वार्ताहर)