शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

धानाचे पऱ्हे वाढले; बळीराजावर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 7, 2014 00:00 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सडक/अर्जुनी तालुक्यातील बळीराजाला बसत चालला असून दुष्काळसदृश परिस्थितीचे चित्र तालुक्यात निर्माण होऊ पाहत आहे. पाण्याअभावी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या

कोसमतोंडी : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सडक/अर्जुनी तालुक्यातील बळीराजाला बसत चालला असून दुष्काळसदृश परिस्थितीचे चित्र तालुक्यात निर्माण होऊ पाहत आहे. पाण्याअभावी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पऱ्हे वाळले असून बळीराजांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मागील हंगामात सरासरी धानाचे उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचे दु:ख पचवू न शकणाऱ्या बळीराजावर यंदाही संकटाचे डोंगर निर्माण होण्याची शक्यता आहे. धानाचे मुख्य पीक घेणाऱ्या सडक/अर्जुनी तालुक्यावर सध्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी धानाचे पऱ्हे वाळले आहेत. पावसाचे मृग व आर्द्रा दोन्ही नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना यावर्षीही दुष्काळ सहन करावा लागणार आहे. यावर्षी तरी चांगले पीक येईल या हेतूने महागड्या धानाचे बियाणे घेऊन परिसरातील शेतकऱ्याने भात पिकाचे पऱ्हे भरले आहे. पावसाने आतापर्यंत हजेरी न लावल्यामुळे पऱ्हे पाण्याअभावी मरत आहेत. पऱ्हेच मेल्यामुळे रोवणे कसे करावे, ही चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, अशा शेतकऱ्याने फक्त आपली पऱ्हे जगविली आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय नाही असे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. कोरडवाहू जमिनीत कमी दिवसात निघणाऱ्या धानाची रोवणी केली जाते. त्या धानाचे रोवणे वेळेवर झाले नाही तर धान्य पिकण्याची शाश्वती नसते. १५ दिवसांपूर्वी पावसाची रिमझीम सुरू झाली होती. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तो मोठ्या उत्साहाने शेतीच्या कामाला लागला होता. यावर्षी पावसाळा चांगला राहील पीक भरपूर येईल, अशी आशा शेतकरी बाळगून होता. परंतु पावसाने शेतकऱ्याच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. महागडे बी-बियाणे पेरले व नांगरणी-वखरणी केली. त्यामुळे जवळ होता नव्हता तो ही पैसा खर्च झाला आहे. जर वेळेवर रोवणी झाली नाही तर त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जनावरांना पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी दररोज आकाशाकडे पावसाच्या प्रतीक्षेत डोळे लावून पाहत आहे. (वार्ताहर)