शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

वळद ग्रामपंचायतची ‘स्मार्ट ग्राम’कडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:35 IST

ग्रामीण विकासात स्थानिक स्वराज्य संस्था राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाची मुहूर्तमेढ रोवत आहे. लोकसहभागाच्या सकारात्मकतेमुळे स्वत:चे गाव स्वराज्य संकल्पनेतून ‘स्मार्ट गाव’ ठरू शकते. असे ध्येय वळद ग्रामपंचायतने बाळगले आहे.

ठळक मुद्देलोकसहभागाची दखल : नरेगा अंतर्गत विकास कामांना गती

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : ग्रामीण विकासात स्थानिक स्वराज्य संस्था राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाची मुहूर्तमेढ रोवत आहे. लोकसहभागाच्या सकारात्मकतेमुळे स्वत:चे गाव स्वराज्य संकल्पनेतून ‘स्मार्ट गाव’ ठरू शकते. असे ध्येय वळद ग्रामपंचायतने बाळगले आहे. वळद ग्रामपंचायतच्या ध्येयाची दखल घेत नरेगाच्या राष्ट्रीय समितीला या स्मार्ट ग्रामचे वेध लागले आहे. ग्रामपंचायतने नरेगा अंतर्गत विविध विकासात्मक कामांना गती दिली आहे.वळद येथील सरपंच किशोर रहांगडाले व सचिव शैलेश परिहार व ग्रामपंचायत सदस्यांनी गाव विकासात नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग घेत स्मार्ट ग्रामची संकल्पना राबविली. गाव विकासाचे ध्येय बाळगून विविध योजनांच्या माध्यमातून गावाला स्मार्ट ग्राम करण्यासाठी ग्रामपंचायतच्या पदाधिकारी व सदस्यांची धडपड सुरू आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत वळद ग्रामपंचायतने विकासात्मक प्रस्ताव नियोजनाचा आराखडा तयार केला. या नियोजनाला शासन स्तरावर यशस्वी प्रारुप मिळावे. यासाठी सरपंच किशोर रहांगडाले यांनी पुढाकार घेतला. या प्रस्तावाला खंडविकास अधिकारी एस.एम. पांडे, सहायक गटविकास अधिकारी एल.एम. कुटे, के. एम.रहांगडाले यांनी मंजुरी दिली. त्यामुळे वळद येथील विकासात्मक कामांना गती मिळण्यास मोठी मदत झाली. वळद ग्रामपंचायतने सर्वकश प्रस्तावाचे नियोजन केल्याने नरेगा अंतर्गत कामांना गती मिळाली आहे. स्मार्ट ग्रामच्या वाटचालीत ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकसहभागातून गावातील तलावाचे खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे सिंचनाची सोय होवून मजुरांच्या हाताला काम मिळाले. गावात जलसिंचनाच्या माध्यमाने पाणी टंचाईवर मात केली. तलावातील गाळाचा उपसा केल्याने सिंचन क्षमतेत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठी मदत झाली. तसेच गावातील रस्ते, कालवा दुरुस्ती, पाटचारीची कामे करण्यात आली. ग्रामपंचायतमार्फत शेतकºयांना शेतीविषयक उपयोगी माहिती दिली जात आहे.जनावरांचे गोठे, शेळी पालनासाठी गोठे बांधकामासाठी शासनाच्या योजनेतंर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात आला. शेतकºयांना रासायनिक खताच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगून सेंद्रीय व रासायनिक खताचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. वळद ग्रामपंचायतच्या ध्येयवादी विकासात्मक पावलांची दखल घेत शासनाने स्मार्ट ग्रामसाठी ग्रामपंचायतला प्रोत्साहन दिले आहे. याच स्मार्ट ग्रामची दखल राष्ट्रीय पातळीवर समितीने घेतली आहे. या समितीची पाऊलवाट ग्रामपंचायतसाठी भाग्योदय ठरणार आहे. लोकसहभागातून विकासाची वाटचाल करणारे वळद हे गाव स्मार्ट ग्रामचे आदर्श मॉडेल ठरत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत