शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

वळद ग्रामपंचायतची ‘स्मार्ट ग्राम’कडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:35 IST

ग्रामीण विकासात स्थानिक स्वराज्य संस्था राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाची मुहूर्तमेढ रोवत आहे. लोकसहभागाच्या सकारात्मकतेमुळे स्वत:चे गाव स्वराज्य संकल्पनेतून ‘स्मार्ट गाव’ ठरू शकते. असे ध्येय वळद ग्रामपंचायतने बाळगले आहे.

ठळक मुद्देलोकसहभागाची दखल : नरेगा अंतर्गत विकास कामांना गती

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : ग्रामीण विकासात स्थानिक स्वराज्य संस्था राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाची मुहूर्तमेढ रोवत आहे. लोकसहभागाच्या सकारात्मकतेमुळे स्वत:चे गाव स्वराज्य संकल्पनेतून ‘स्मार्ट गाव’ ठरू शकते. असे ध्येय वळद ग्रामपंचायतने बाळगले आहे. वळद ग्रामपंचायतच्या ध्येयाची दखल घेत नरेगाच्या राष्ट्रीय समितीला या स्मार्ट ग्रामचे वेध लागले आहे. ग्रामपंचायतने नरेगा अंतर्गत विविध विकासात्मक कामांना गती दिली आहे.वळद येथील सरपंच किशोर रहांगडाले व सचिव शैलेश परिहार व ग्रामपंचायत सदस्यांनी गाव विकासात नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग घेत स्मार्ट ग्रामची संकल्पना राबविली. गाव विकासाचे ध्येय बाळगून विविध योजनांच्या माध्यमातून गावाला स्मार्ट ग्राम करण्यासाठी ग्रामपंचायतच्या पदाधिकारी व सदस्यांची धडपड सुरू आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत वळद ग्रामपंचायतने विकासात्मक प्रस्ताव नियोजनाचा आराखडा तयार केला. या नियोजनाला शासन स्तरावर यशस्वी प्रारुप मिळावे. यासाठी सरपंच किशोर रहांगडाले यांनी पुढाकार घेतला. या प्रस्तावाला खंडविकास अधिकारी एस.एम. पांडे, सहायक गटविकास अधिकारी एल.एम. कुटे, के. एम.रहांगडाले यांनी मंजुरी दिली. त्यामुळे वळद येथील विकासात्मक कामांना गती मिळण्यास मोठी मदत झाली. वळद ग्रामपंचायतने सर्वकश प्रस्तावाचे नियोजन केल्याने नरेगा अंतर्गत कामांना गती मिळाली आहे. स्मार्ट ग्रामच्या वाटचालीत ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकसहभागातून गावातील तलावाचे खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे सिंचनाची सोय होवून मजुरांच्या हाताला काम मिळाले. गावात जलसिंचनाच्या माध्यमाने पाणी टंचाईवर मात केली. तलावातील गाळाचा उपसा केल्याने सिंचन क्षमतेत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठी मदत झाली. तसेच गावातील रस्ते, कालवा दुरुस्ती, पाटचारीची कामे करण्यात आली. ग्रामपंचायतमार्फत शेतकºयांना शेतीविषयक उपयोगी माहिती दिली जात आहे.जनावरांचे गोठे, शेळी पालनासाठी गोठे बांधकामासाठी शासनाच्या योजनेतंर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात आला. शेतकºयांना रासायनिक खताच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगून सेंद्रीय व रासायनिक खताचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. वळद ग्रामपंचायतच्या ध्येयवादी विकासात्मक पावलांची दखल घेत शासनाने स्मार्ट ग्रामसाठी ग्रामपंचायतला प्रोत्साहन दिले आहे. याच स्मार्ट ग्रामची दखल राष्ट्रीय पातळीवर समितीने घेतली आहे. या समितीची पाऊलवाट ग्रामपंचायतसाठी भाग्योदय ठरणार आहे. लोकसहभागातून विकासाची वाटचाल करणारे वळद हे गाव स्मार्ट ग्रामचे आदर्श मॉडेल ठरत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत