शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जिल्ह्यात लसीकरणाने गाठला ४१ टक्क्यांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST

गोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बघता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जोर दिला जात आहे. अशात जिल्ह्यात लसीकरणाने ...

गोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बघता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जोर दिला जात आहे. अशात जिल्ह्यात लसीकरणाने ४१ टक्क्यांचा टप्पा गाठला असून, रविवारपर्यंत (दि. १८) ५,३२,४१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून लसींचा नियमित पुरवठा होत असल्याने खंड पडत असलेल्या लसीकरणाला पुन्हा गती आल्याचे दिसत आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर नागरिकांचे लसीकरण किती गरजेचे आहे हे दिसून आले. यामुळे शासनाने जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणावर जोर दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातही लसीकरणावर जोर दिला जात असून, यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्यापासून लसीकरण शिबिर व मोबाईल युनिटच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचून लसीकरण केले जात आहे. याचे फलितही येत असून, आतापर्यंत जिल्ह्यात ५,३२,४१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, त्याची ४०.९७ एवढी टक्केवारी आहे.

विशेष म्हणजे, मध्यंतरी लसींचा तुटवडा होत असल्यामुळे कित्येकदा लसीकरणाला ब्रेक द्यावा लागला होता. अन्यथा जिल्हा ४१ टक्क्यांऐवजी ५० टक्के पार करून पुढे निघून गेला असता. मात्र, लसींचा साठाच नसल्याने लसीकरणात विघ्न आले व आकडेवारी घटली. मात्र, आता लसींचा नियमित पुरवठा होत असल्याने लसीकरण पुन्हा एकदा जोमात सुरू करण्यात आले असून, त्याची गती वाढल्याचे दिसत आहे. यामुळे नक्कीच याचा फायदा मिळणार आहे, यात शंका नाही.

--------------------------------

१.४३ लाख तरुणांचे लसीकरण

जिल्ह्यात १८-४४ गटाच्या लसीकरणाला २२ जूनपासून सुरूवात झाली असून, तेव्हापासून या गटातील तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १,४३,२२९ तरुणांचे लसीकरण करण्यात आले असून, त्यांची २२.९२ एवढी टक्केवारी आहे. यात १,३३,४१५ तरुणांनी (२१.३५ टक्के) पहिला डोस घेतला असून, ९ ८१४ तरुणांनी (१.५४ टक्के) दुसरा डोस घेतला आहे.

------------------------------

फक्त ८ टक्के नागरिकांनी घेतला दुसरा डोस

जिल्ह्यात जेथे आतापर्यंत ५,३२,४१३ नागरिकांनी लसीकरण करवून घेतले आहे तेथे फक्त ८.२३ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यात, पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ४,२५,४९१ असून, त्याची टक्केवारी ३२.७४ एवढी आहे. फक्त १,०६,९२२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून, त्याची ८.२३ एवढी टक्केवारी आहे. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेणे अत्यंत गरजेचे असल्याने नागरिकांनी वेळ येताच न चुकता लस घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.