शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लसीकरणाने गाठला ४१ टक्क्यांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST

गोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बघता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जोर दिला जात आहे. अशात जिल्ह्यात लसीकरणाने ...

गोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बघता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जोर दिला जात आहे. अशात जिल्ह्यात लसीकरणाने ४१ टक्क्यांचा टप्पा गाठला असून, रविवारपर्यंत (दि. १८) ५,३२,४१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून लसींचा नियमित पुरवठा होत असल्याने खंड पडत असलेल्या लसीकरणाला पुन्हा गती आल्याचे दिसत आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर नागरिकांचे लसीकरण किती गरजेचे आहे हे दिसून आले. यामुळे शासनाने जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणावर जोर दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातही लसीकरणावर जोर दिला जात असून, यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्यापासून लसीकरण शिबिर व मोबाईल युनिटच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचून लसीकरण केले जात आहे. याचे फलितही येत असून, आतापर्यंत जिल्ह्यात ५,३२,४१३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, त्याची ४०.९७ एवढी टक्केवारी आहे.

विशेष म्हणजे, मध्यंतरी लसींचा तुटवडा होत असल्यामुळे कित्येकदा लसीकरणाला ब्रेक द्यावा लागला होता. अन्यथा जिल्हा ४१ टक्क्यांऐवजी ५० टक्के पार करून पुढे निघून गेला असता. मात्र, लसींचा साठाच नसल्याने लसीकरणात विघ्न आले व आकडेवारी घटली. मात्र, आता लसींचा नियमित पुरवठा होत असल्याने लसीकरण पुन्हा एकदा जोमात सुरू करण्यात आले असून, त्याची गती वाढल्याचे दिसत आहे. यामुळे नक्कीच याचा फायदा मिळणार आहे, यात शंका नाही.

--------------------------------

१.४३ लाख तरुणांचे लसीकरण

जिल्ह्यात १८-४४ गटाच्या लसीकरणाला २२ जूनपासून सुरूवात झाली असून, तेव्हापासून या गटातील तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १,४३,२२९ तरुणांचे लसीकरण करण्यात आले असून, त्यांची २२.९२ एवढी टक्केवारी आहे. यात १,३३,४१५ तरुणांनी (२१.३५ टक्के) पहिला डोस घेतला असून, ९ ८१४ तरुणांनी (१.५४ टक्के) दुसरा डोस घेतला आहे.

------------------------------

फक्त ८ टक्के नागरिकांनी घेतला दुसरा डोस

जिल्ह्यात जेथे आतापर्यंत ५,३२,४१३ नागरिकांनी लसीकरण करवून घेतले आहे तेथे फक्त ८.२३ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यात, पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ४,२५,४९१ असून, त्याची टक्केवारी ३२.७४ एवढी आहे. फक्त १,०६,९२२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून, त्याची ८.२३ एवढी टक्केवारी आहे. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेणे अत्यंत गरजेचे असल्याने नागरिकांनी वेळ येताच न चुकता लस घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.