शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाने गाठली १० लाखांची आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:31 IST

कपिल केकत गोंदिया : लसीकरणात सुरुवातीपासूनच अग्रेसर असलेल्या गोंदिया जिल्ह्याने आता १० लाखांचा आकडा पार केला आहे. शुक्रवारपर्यंत ...

कपिल केकत

गोंदिया : लसीकरणात सुरुवातीपासूनच अग्रेसर असलेल्या गोंदिया जिल्ह्याने आता १० लाखांचा आकडा पार केला आहे. शुक्रवारपर्यंत (दि.२४) जिल्ह्यातील तब्बल १०१९०९१ नागरिकांनी लस घेतली असून यानंतर आता जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी ९८.९० टक्के झाली आहे. येत्या १-२ दिवसांत जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण होणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

अवघ्या देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये गोंदिया जिल्हा सुरुवातीपासूनच अग्रेसर राहिला असून सर्वाधिक लसीकरणात पुढे-पुढेच होता. लवकरात लवकर जिल्ह्यातील लसीकरण आटोपावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून धडपड सुरू होती व नागरिकांना लसीकरणात सोय व्हावी यासाठी सुमारे २०० केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. परिणामी नागरिकांना फार अंतरावर जाण्याची गरज नसून जवळच लस घेता येत आहे. शिवाय लसीकरण शिबिरांचे आयोजन करूनही नागरिकांची सोय करून दिली जात आहे. याचे फलीत असे की, शुक्रवारपर्यंत (दि.२४) जिल्ह्यातील १०१९०९१ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्याची ९८.९० एवढी टक्केवारी आहे. यात ७२७३८० नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ७०.५९ एवढी टक्केवारी आहे. तर २९१७११ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८.३१ एवढी टक्केवारी आहे. आताची ही आकडेवारी बघता येत्या १-२ दिवसांत जिल्हा १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठणार यात शंका वाटत नाही. असे झाल्यास गोंदिया राज्यातील पहिला जिल्हा पण ठरू शकतो.

--------------------------------------

१०३०४०० नागरिकांचे उद्दिष्ट

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १८ वर्षे वयोगटावरील १०३०४०० नागरिकांचे लसीकरण करावयाचे आहे. यामध्ये वयोगटानुसार वेगवेगळे गट ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार, लसीकरण सुरू असून जिल्ह्याने शुक्रवारपर्यंत १०१९०९१ नागरिकांचे लसीकरण केले आहे. म्हणजेच आता ११३०९ नागरिकांचे लसीकरण उरले आहे. या नागरिकांनी सहकार्य करून अगोदर लस घेण्याची गरज आहे. जेणेकरून ते सुरक्षित होतील व जिल्हा सुद्धा पूर्ण लसीकरण सुरक्षित होणार.

-----------------------------

टेन्शन फक्त दुसऱ्या डोसवाल्यांचे

लसीकरणातील जिल्हा प्रशासनाची कामगिरी व त्याला मिळालेले जिल्हावासीयांचे सहकार्य दोन्ही बाजू कौतुकास्पद आहेत. यामुळेच जिल्ह्याने लसीकरणाचा एवढा मोठा टप्पा गाठला आहे; मात्र दुसरा डोस घेणाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे टेन्शन वाढविले आहे. जिल्ह्यात ७०.५९ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असतानाच मात्र फक्त २८.३१ टक्के नागरिकांनीच दुसरा डोस घेतला आहे. कोरोनापासून संपूर्ण सुरक्षेसाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. आता ही बाब दुसरा डोस टोलवणाऱ्या नागरिकांनी समजून घेण्याची गरज आहे.