शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

लसीकरणाने गाठली १० लाखांची आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:31 IST

कपिल केकत गोंदिया : लसीकरणात सुरुवातीपासूनच अग्रेसर असलेल्या गोंदिया जिल्ह्याने आता १० लाखांचा आकडा पार केला आहे. शुक्रवारपर्यंत ...

कपिल केकत

गोंदिया : लसीकरणात सुरुवातीपासूनच अग्रेसर असलेल्या गोंदिया जिल्ह्याने आता १० लाखांचा आकडा पार केला आहे. शुक्रवारपर्यंत (दि.२४) जिल्ह्यातील तब्बल १०१९०९१ नागरिकांनी लस घेतली असून यानंतर आता जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी ९८.९० टक्के झाली आहे. येत्या १-२ दिवसांत जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण होणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

अवघ्या देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये गोंदिया जिल्हा सुरुवातीपासूनच अग्रेसर राहिला असून सर्वाधिक लसीकरणात पुढे-पुढेच होता. लवकरात लवकर जिल्ह्यातील लसीकरण आटोपावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून धडपड सुरू होती व नागरिकांना लसीकरणात सोय व्हावी यासाठी सुमारे २०० केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. परिणामी नागरिकांना फार अंतरावर जाण्याची गरज नसून जवळच लस घेता येत आहे. शिवाय लसीकरण शिबिरांचे आयोजन करूनही नागरिकांची सोय करून दिली जात आहे. याचे फलीत असे की, शुक्रवारपर्यंत (दि.२४) जिल्ह्यातील १०१९०९१ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्याची ९८.९० एवढी टक्केवारी आहे. यात ७२७३८० नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ७०.५९ एवढी टक्केवारी आहे. तर २९१७११ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८.३१ एवढी टक्केवारी आहे. आताची ही आकडेवारी बघता येत्या १-२ दिवसांत जिल्हा १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठणार यात शंका वाटत नाही. असे झाल्यास गोंदिया राज्यातील पहिला जिल्हा पण ठरू शकतो.

--------------------------------------

१०३०४०० नागरिकांचे उद्दिष्ट

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १८ वर्षे वयोगटावरील १०३०४०० नागरिकांचे लसीकरण करावयाचे आहे. यामध्ये वयोगटानुसार वेगवेगळे गट ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार, लसीकरण सुरू असून जिल्ह्याने शुक्रवारपर्यंत १०१९०९१ नागरिकांचे लसीकरण केले आहे. म्हणजेच आता ११३०९ नागरिकांचे लसीकरण उरले आहे. या नागरिकांनी सहकार्य करून अगोदर लस घेण्याची गरज आहे. जेणेकरून ते सुरक्षित होतील व जिल्हा सुद्धा पूर्ण लसीकरण सुरक्षित होणार.

-----------------------------

टेन्शन फक्त दुसऱ्या डोसवाल्यांचे

लसीकरणातील जिल्हा प्रशासनाची कामगिरी व त्याला मिळालेले जिल्हावासीयांचे सहकार्य दोन्ही बाजू कौतुकास्पद आहेत. यामुळेच जिल्ह्याने लसीकरणाचा एवढा मोठा टप्पा गाठला आहे; मात्र दुसरा डोस घेणाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे टेन्शन वाढविले आहे. जिल्ह्यात ७०.५९ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असतानाच मात्र फक्त २८.३१ टक्के नागरिकांनीच दुसरा डोस घेतला आहे. कोरोनापासून संपूर्ण सुरक्षेसाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. आता ही बाब दुसरा डोस टोलवणाऱ्या नागरिकांनी समजून घेण्याची गरज आहे.