शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

लसीकरणाने गाठली १० लाखांची आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:31 IST

कपिल केकत गोंदिया : लसीकरणात सुरुवातीपासूनच अग्रेसर असलेल्या गोंदिया जिल्ह्याने आता १० लाखांचा आकडा पार केला आहे. शुक्रवारपर्यंत ...

कपिल केकत

गोंदिया : लसीकरणात सुरुवातीपासूनच अग्रेसर असलेल्या गोंदिया जिल्ह्याने आता १० लाखांचा आकडा पार केला आहे. शुक्रवारपर्यंत (दि.२४) जिल्ह्यातील तब्बल १०१९०९१ नागरिकांनी लस घेतली असून यानंतर आता जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी ९८.९० टक्के झाली आहे. येत्या १-२ दिवसांत जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण होणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

अवघ्या देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये गोंदिया जिल्हा सुरुवातीपासूनच अग्रेसर राहिला असून सर्वाधिक लसीकरणात पुढे-पुढेच होता. लवकरात लवकर जिल्ह्यातील लसीकरण आटोपावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून धडपड सुरू होती व नागरिकांना लसीकरणात सोय व्हावी यासाठी सुमारे २०० केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. परिणामी नागरिकांना फार अंतरावर जाण्याची गरज नसून जवळच लस घेता येत आहे. शिवाय लसीकरण शिबिरांचे आयोजन करूनही नागरिकांची सोय करून दिली जात आहे. याचे फलीत असे की, शुक्रवारपर्यंत (दि.२४) जिल्ह्यातील १०१९०९१ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्याची ९८.९० एवढी टक्केवारी आहे. यात ७२७३८० नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ७०.५९ एवढी टक्केवारी आहे. तर २९१७११ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८.३१ एवढी टक्केवारी आहे. आताची ही आकडेवारी बघता येत्या १-२ दिवसांत जिल्हा १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठणार यात शंका वाटत नाही. असे झाल्यास गोंदिया राज्यातील पहिला जिल्हा पण ठरू शकतो.

--------------------------------------

१०३०४०० नागरिकांचे उद्दिष्ट

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १८ वर्षे वयोगटावरील १०३०४०० नागरिकांचे लसीकरण करावयाचे आहे. यामध्ये वयोगटानुसार वेगवेगळे गट ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार, लसीकरण सुरू असून जिल्ह्याने शुक्रवारपर्यंत १०१९०९१ नागरिकांचे लसीकरण केले आहे. म्हणजेच आता ११३०९ नागरिकांचे लसीकरण उरले आहे. या नागरिकांनी सहकार्य करून अगोदर लस घेण्याची गरज आहे. जेणेकरून ते सुरक्षित होतील व जिल्हा सुद्धा पूर्ण लसीकरण सुरक्षित होणार.

-----------------------------

टेन्शन फक्त दुसऱ्या डोसवाल्यांचे

लसीकरणातील जिल्हा प्रशासनाची कामगिरी व त्याला मिळालेले जिल्हावासीयांचे सहकार्य दोन्ही बाजू कौतुकास्पद आहेत. यामुळेच जिल्ह्याने लसीकरणाचा एवढा मोठा टप्पा गाठला आहे; मात्र दुसरा डोस घेणाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे टेन्शन वाढविले आहे. जिल्ह्यात ७०.५९ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असतानाच मात्र फक्त २८.३१ टक्के नागरिकांनीच दुसरा डोस घेतला आहे. कोरोनापासून संपूर्ण सुरक्षेसाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. आता ही बाब दुसरा डोस टोलवणाऱ्या नागरिकांनी समजून घेण्याची गरज आहे.