शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

लसीकरणाने गाठली १० लाखांची आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:31 IST

कपिल केकत गोंदिया : लसीकरणात सुरुवातीपासूनच अग्रेसर असलेल्या गोंदिया जिल्ह्याने आता १० लाखांचा आकडा पार केला आहे. शुक्रवारपर्यंत ...

कपिल केकत

गोंदिया : लसीकरणात सुरुवातीपासूनच अग्रेसर असलेल्या गोंदिया जिल्ह्याने आता १० लाखांचा आकडा पार केला आहे. शुक्रवारपर्यंत (दि.२४) जिल्ह्यातील तब्बल १०१९०९१ नागरिकांनी लस घेतली असून यानंतर आता जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी ९८.९० टक्के झाली आहे. येत्या १-२ दिवसांत जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण होणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

अवघ्या देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये गोंदिया जिल्हा सुरुवातीपासूनच अग्रेसर राहिला असून सर्वाधिक लसीकरणात पुढे-पुढेच होता. लवकरात लवकर जिल्ह्यातील लसीकरण आटोपावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून धडपड सुरू होती व नागरिकांना लसीकरणात सोय व्हावी यासाठी सुमारे २०० केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. परिणामी नागरिकांना फार अंतरावर जाण्याची गरज नसून जवळच लस घेता येत आहे. शिवाय लसीकरण शिबिरांचे आयोजन करूनही नागरिकांची सोय करून दिली जात आहे. याचे फलीत असे की, शुक्रवारपर्यंत (दि.२४) जिल्ह्यातील १०१९०९१ नागरिकांचे लसीकरण झाले असून त्याची ९८.९० एवढी टक्केवारी आहे. यात ७२७३८० नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ७०.५९ एवढी टक्केवारी आहे. तर २९१७११ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८.३१ एवढी टक्केवारी आहे. आताची ही आकडेवारी बघता येत्या १-२ दिवसांत जिल्हा १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठणार यात शंका वाटत नाही. असे झाल्यास गोंदिया राज्यातील पहिला जिल्हा पण ठरू शकतो.

--------------------------------------

१०३०४०० नागरिकांचे उद्दिष्ट

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १८ वर्षे वयोगटावरील १०३०४०० नागरिकांचे लसीकरण करावयाचे आहे. यामध्ये वयोगटानुसार वेगवेगळे गट ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार, लसीकरण सुरू असून जिल्ह्याने शुक्रवारपर्यंत १०१९०९१ नागरिकांचे लसीकरण केले आहे. म्हणजेच आता ११३०९ नागरिकांचे लसीकरण उरले आहे. या नागरिकांनी सहकार्य करून अगोदर लस घेण्याची गरज आहे. जेणेकरून ते सुरक्षित होतील व जिल्हा सुद्धा पूर्ण लसीकरण सुरक्षित होणार.

-----------------------------

टेन्शन फक्त दुसऱ्या डोसवाल्यांचे

लसीकरणातील जिल्हा प्रशासनाची कामगिरी व त्याला मिळालेले जिल्हावासीयांचे सहकार्य दोन्ही बाजू कौतुकास्पद आहेत. यामुळेच जिल्ह्याने लसीकरणाचा एवढा मोठा टप्पा गाठला आहे; मात्र दुसरा डोस घेणाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे टेन्शन वाढविले आहे. जिल्ह्यात ७०.५९ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असतानाच मात्र फक्त २८.३१ टक्के नागरिकांनीच दुसरा डोस घेतला आहे. कोरोनापासून संपूर्ण सुरक्षेसाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. आता ही बाब दुसरा डोस टोलवणाऱ्या नागरिकांनी समजून घेण्याची गरज आहे.