शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

जिल्ह्यात लसीकरणाची गाडी पुन्हा सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:32 IST

गोंदिया : कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळे तसेच सिरींजचा तुटवडा यामुळे घसरलेली लसीकरणाची आकडेवारी मंगळवारी पुन्हा वधारली आहे. मंगळवारी ...

गोंदिया : कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळे तसेच सिरींजचा तुटवडा यामुळे घसरलेली लसीकरणाची आकडेवारी मंगळवारी पुन्हा वधारली आहे. मंगळवारी जिल्ह्यात तब्बल १५९५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यासाठी लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. एकंदर लसीकरणाला घेऊन आरोग्य विभागाने पुन्हा एकदा कंबर कसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात लसीकरणाची गाडी पुन्हा सुसाट धावत असल्याचे दिसत आहे.

लसीकरणात जिल्हा राज्यात अग्रेसर होता व आतापर्यंत जिल्ह्याने ५० टक्के लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. मात्र, मध्यंतरी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने लसीकरण केंद्रांची संख्या झपाट्याने कमी करण्यात आली. त्यानंतर मोजक्याच केंद्रांवर लसीकरण सुरू होते. शिवाय सध्या लसींचा नियमित पुरवठा होत असतानाच सिरिंजचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळेही लसीकरणाची आकडेवारी घसरत चालली होती. विशेष म्हणजे, सोमवारी जिल्ह्यात फक्त ६५० नागरिकांच्या लसीकरणाची नोंद घेण्यात आली आहे.

मात्र मंगळवारी (दि.१७) सिरिंज व लस दोन्हींचे जिल्ह्यात वितरण करण्यात आले तसेच लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आल्याने तब्बल १५९५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे आता आरोग्य विभागाने लसीकरणाला घेऊन कंबर कसल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, लसीकरणाची गाडी पुन्हा रूळावर आली आहे असेच असल्यास जिल्हा लवकरच १०० टक्के लसीकरण झालेला राज्यातील पहिला जिल्हा ठरणार यात शंका नाही.

-----------------------------

आता १४० केंद्रांवर लसीकरण

जिल्ह्यात शनिवारपर्यंत फक्त २५ केंद्रांवरच लसीकरण करण्यात येत होते. परिणामी नागरिकांची लसीकरणाला घेऊन धावपळ होत होती. परिणामी नागरिकांनी लसीकरण टाळले व आकडेवारी घटली होती. मात्र, आरोग्य विभागाने बुधवारपासून केंद्र वाढविले असून आता १४० केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. परिणामी नागरिकांना लसीकरण पुन्हा सोयीचे होणार असून आकडेवारीही वाढणार यात शंका नाही.

----------------------------

आज मिळणार ४०००० सिरींज

जिल्ह्यात लसींचा पुरवठा नियमित होत असल्याने मोठ्या प्रमाणात लसींचा साठा होता. मात्र, सिरिंज नसल्याने लसीकरणात अडचण येत होती. त्यात मंगळवारी २५२०० सिरिंज जिल्ह्याला मिळाल्या होत्या. मात्र, एवढ्याने होणार नसल्याने आणखी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी आणखी ४०००० सिरिंज मिळणार आहेत. यामुळे सिरिंजचा तुटवडा जाणवणार नाही.