शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

करियर घडविण्यासाठी लोकराज्य उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 21:19 IST

शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकात शासकीय ध्येय-धोरणांची माहिती असते. लोकराज्य हे स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी व करियर घडविण्यासाठी सुद्धा उपयुक्त असल्याचे प्रतिपादन येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रजनी चतुर्वेदी यांनी केले.

ठळक मुद्देरजनी चतुर्वेदी : लोकराज्य वाचक अभियान कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकात शासकीय ध्येय-धोरणांची माहिती असते. लोकराज्य हे स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी व करियर घडविण्यासाठी सुद्धा उपयुक्त असल्याचे प्रतिपादन येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रजनी चतुर्वेदी यांनी केले. येथील नमाद महाविद्यालयात मंगळवारी (दि.११) आयोजित लोकराज्य वाचक अभियान कार्यक्र मात त्या अध्यक्षस्थानावरु न बोलत होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, प्रा.बबन मेश्राम, डॉ.किशोर वासनिक, प्रा.शशिकांत चवरे, डॉ.अर्चना जैन, प्रा.उमेश उदापुरे, प्रा.आशा बघेले, प्रा.पटले व प्रा.भुरे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.चतुर्वेदी यांनी, लोकराज्य मासिकात शासनाच्या योजनांची व उपक्र मांची विस्तृत माहिती दिलेली असते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचन करताना लोकराज्य मासिकाला प्राधान्य दयावे असे सांगितले. प्रा.मेश्राम यांनी, शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्यने विविध विषयांवर विशेषांक काढले असून हे विशेषांक लोकिप्रय ठरले आहेत. लोकराज्य वाचक अभियानात लोकराज्य घरोघरी पोहोचिवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाची मोहीम आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी असे ही ते म्हणाले.प्रास्ताविकातून गिते यांनी, लोकराज्य मासिक हे महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे तर देशात दुसºया क्र मांकाचे मासिक असून शासनाच्या विविध योजनांची अधिकृत माहिती देणारे मासिक आहे. लोकराज्य वाचक अभियानाच्या माध्यमातून लोकराज्यचे नियमीत वाचन करावे व शासनाच्या योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचवावी असे त्यांनी सांगितले. संचालन धम्मदिप मडामे यांनी केले. आभार प्रा.आशा बघेले यांनी मानले. कार्यक्र माला नमाद महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.‘लोकराज्य वारी’ विशेषांकाचे प्रकाशनस्वामी विवेकानंद यांनी शिकागो परिषदेत दिलेल्या भाषणास आज १२५ वर्ष पूर्ण झाले त्यानिमीत्त त्यांच्या ऐतिहासिक भाषणाचे वाचन या निमित्ताने महाविद्यालयात करण्यात आले. स्वामी विवेकानंद यांचे शिकागो परिषदेतील भाषण आजही प्रेरणादायी असल्याचे प्राचार्य डॉ. चतुर्वेदी यांनी सांगितले. बंधू आणि भगिनींनो असे संबोधन विवेकानंदांनी याच भाषणात केल्याचे त्यांनी सांगितले. स्वामी यांचे हे भाषण ऐतिहासिक असून या भाषणाचे पठण प्रत्येकाने करावे असे त्या म्हणाल्या. दरम्यान ‘लोकराज्य वारी’ विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.