शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

सुदृढ आरोग्यासाठी शौचालयाचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 01:54 IST

शरीर हीच मानव जातीची मोठी संपत्ती आहे. आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी समाजातील प्रत्येकानेच नित्यनेमाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा.

उषा मेंढे : स्वच्छ भारत मिशन आढावा सभेत मार्गदर्शन इसापूर : शरीर हीच मानव जातीची मोठी संपत्ती आहे. आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी समाजातील प्रत्येकानेच नित्यनेमाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा. त्यामुळे समाजात आरोग्यावर होणारा खर्च कमी होऊन आपली आर्थिक बचत होईल व पर्यायाने आपला विकास होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. त्या अर्जुनी मोरगाव पंचायत समितीत आयोजित स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आढावा सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, शासनाच्या विविध योजना असून शौचालय बांधकामासाठी शासनाकडून बारा हजार रुपये अनुदान मिळत असून अनेक लोक शौचालय बांधतात, पण वापर करीत नाही. कुटुंबातील सर्व लोक उघड्यावर शौचास जातात. आपली आई-बहीण आदी महिला वर्गसुद्धा उघड्यावर शौचास जातात. कधी कधी तर साप, विंचवामुळे दुर्घटना घडतात. हे सर्व टाळण्यासाठी १८ व १९ जुलैला दिल्ली येथील कार्यशाळेत मी स्वत: जि.प. अध्यक्ष म्हणून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे वचन दिले आहे. हे वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता विभाग) राजेश देशमुख, लेखा विभागाचे सहायक लेखा विभाग अधिकारी जंवजाळ, अर्जुनी-मोरगाव पं.स. सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, खंड विकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, पं.स. सदस्य रामलाल मुंगगकर उपस्थित होते. प्रास्ताविकात खंड विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी अर्जुनी मोरगाव पंचायत समिती शासनाच्या विविध योजना राबवून ग्रामविकास करण्यासाठी सदैव तत्पर राहते. आतापर्यंत तालुक्यातील १३ ग्रामपंचायती १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्या असून या आर्थिक वर्षात ७० पैकी १२ ग्रामपंचायतींनी ४० लाख रुपयांच्या वर मग्रारोहयोचे कामे करुन १ एप्रिल ते १५ जुलै २०१६ पर्यंत साडेतीन महिन्यांच्या काळात १६ कोटी रुपयांचे काम करुन मजुरांना रोजगार उपलब्ध करुन दिले. या वेळी हागणदारी मुक्त ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सरपंचाची असून तुम्ही तुमच्या गावचे मुख्यमंत्री आहात. योजना जनतेपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणारा सरपंच हा दूत आहे, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत फुलकुंडवार यांनी आपला जिल्हा ३१ डिसेंबरपर्यंत हागणदारीमुक्त करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करु. गावातील एकही व्यक्ती बाहेर शौचास जाणार नाही, असा संकल्प करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेला सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामरोजगार सेवक, सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. संचालन कृषी विकास अधिकारी डी.बी. उईके व गटसमन्वयक एच.आर. अंबुले यांनी केले. आभार सहायक खंड विकास अधिकारी राजेश वलथरे यांनी मानले. (वार्ताहर)