शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

आहारात सेंद्रिय अन्नधान्याचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतातील पिकांवर रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शेतातील अशाप्रकारे पिकविलेले अन्न खाण्यात येत असल्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढले आहे. एकेकाळी शेतात कोणतेही रासायनिक खत व किटकनाशके मारण्यात येत नव्हती. त्यामुळे माणसे निरोगी होती. आज आपणाला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर आहारात बदल करुन ...

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : पोलीस अधिकारी-कर्मचाºयांनी चाखली सेंद्रिय भाताची चव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतातील पिकांवर रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शेतातील अशाप्रकारे पिकविलेले अन्न खाण्यात येत असल्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढले आहे. एकेकाळी शेतात कोणतेही रासायनिक खत व किटकनाशके मारण्यात येत नव्हती. त्यामुळे माणसे निरोगी होती. आज आपणाला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर आहारात बदल करुन सेंद्रीय अन्नधान्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.कारंजा येथील पोलीस मुख्यालयात मंगळवारी (दि.१०) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्यावतीने (आत्मा)े पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी घेण्यात आलेल्या सेंद्रिय तांदळापासून शिजवलेला भात खावू घालण्याच्या कार्यक्र मात ते बोलत होते. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना काळे यांनी, आज आपण डॉक्टरकडे गेलो तर तपासणीसाठी १०० ते २०० रूपये फी लागते. दुर्दैवाने कोणी आजारी पडले तर २ ते ४ हजार रूपये कमीतकमी खर्च येतो. स्वस्तातील अन्न खाल्ल्यामुळे दवाखान्यात जावे लागते. स्वत:च्या प्रकृतीकडे आपण खाण्याच्या सवयीमुळे दुर्लक्ष करतो. आज जगभर सेंद्रीय अन्नधान्याची मागणी वाढत आहे. महिलांनी सुध्दा कुटूंब प्रमुखाकडे सेंद्रीय शेतीतील उत्पादीत मालासाठी आग्रह धरावा असे सांगितले.डॉ.भूजबळ यांनी, सेंद्रिय तांदळाचा दैनंदिन आहारात वापर व्हावा यासाठी प्रचार-प्रसाराचा भाग म्हणून हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी आहारात विषमुक्त अन्न काळाची गरज आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचे दुष्परिणाम जाणवत आहे.त्यामुळे अशा कीटकनाशक व खतांवर बंदी आली पाहिजे. दररोज अन्नाच्या माध्यमातून विष खाण्यात येत आहे. पोलीस कुटूंबातील सर्वजण निरोगी राहण्यास सेंद्रीय शेतीतून उत्पादीत अन्न खाणेसुध्दा काळाची गरज झाली आहे, असे मत व्यक्त केले.संचालन आत्माचे सचिन कुंभार यांनी केले. आभार हिंदूराव चव्हाण यांनी मानले. कार्यक्र माला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस उपअधीक्षक(गृह) दिपाली खन्ना यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.