शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शेतीसाठी आधुनिक यंत्राचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:43 IST

भारत हा कृषीप्रधान देश असून ६० टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. विविध भागात विविध प्रकारचे पीक घेतले जातात. विविध पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना पोशिंदा म्हटले जाते. त्याला सोबती म्हणून सतत बैलजोडी असायची.

ठळक मुद्देमजुरांची कमतरता : बैलजोड्यांची संख्या घटली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारत हा कृषीप्रधान देश असून ६० टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. विविध भागात विविध प्रकारचे पीक घेतले जातात. विविध पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना पोशिंदा म्हटले जाते. त्याला सोबती म्हणून सतत बैलजोडी असायची. परंतु आधुनिकीकरणामुळे बैलजोड्यांची संख्या आता कमी होऊन धानाच्या कापणी व मळणीकरिता यंत्रांच्या मागणीत आता वाढ झाली आहे.पूर्वी शेतकऱ्यांना पेरणीपासून मळणीपर्यंत बैलजोडीची गरज मोठ्या प्रमाणात भासत होती. प्रत्येक शेतकºयाकडे गोधन मोठ्या प्रमाणात असायचे. घरोघरी दूध, दही व तूप भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असे. कुटुंबात शेतीसाठी बैल असायचे. पण आता सर्वत्र देशी गायी पाळण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.गावरान गाईच्या तुलनेत अधिक दूध देणाऱ्या जर्सी होलस्टीन क्राईनखिस मुर्रा म्हैस अधिक नफा मिळविण्याच्या हेतूने शेतकरीबांधव पाळत आहेत. धान पिकांची कापणी मळणी झाल्यानंतर शेतात गुरेढोरे चारण्याकरिता भरपूर मोकळी जागा असायची. परंतु आता सर्वत्र मोकळ्या जागांवर अतिक्रमण झाले आहे. मोकळ्या जागा लोकांनी गिळंकृत केली आहे.अनेक ठिकाणी सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने वर्षातून दोन-तीनदा पीक घेतले जातात. त्यामुळे गुरांना चारण्याचा प्रश्न निर्माण झाला. खेड्यातील गोधन झपाट्याने कमी झाले व म्हशींची संख्या रोडावली. त्यामुळे शेतीसाठी उपयोगी बैलांची संख्या कमी झाली व यंत्रांची मागणी वाढली आहे.ट्रॅक्टरने नांगरणी आणि वखरणी करून शेतात पेरणी केली जाते. सध्या शेतकरी मळणीसाठी बैलबंडी सोडून थ्रेसर ट्रॅक्टर मशिनचा उपयोग करीत आहेत.बैलांद्वारे धानाची मळणी केल्यास अधिक वेळ खर्च होतो. त्यातच मजुरांचा खर्चही अधिक. त्यामुळे आज शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळले आहेत. गोंदिया जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. धानाच्या मळणीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागते.त्यामुळे बरेच शेतकरी मळणी यंत्राने धान, गहू, हरभरा व इतर पीक शेतातून काढत आहेत. कमी वेळात लवकर धान्य तयार होत असल्याने डिझेल किंवा विजेवर चालणाºया मळणी यंत्रांकडे शेतकºयांचा अधिक कल दिसून येत आहे. धान्य शेतकरी आता थेट बाजारात विकत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीtechnologyतंत्रज्ञान