शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा

By admin | Updated: July 10, 2015 01:49 IST

कृषी जागृती सप्ताहाची सांगता$$्निेगोंदिया : शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड न करता आधुनिक श्री पद्धतीने व नवीन...

जयंत देशमुख : कृषी जागृती सप्ताहाची सांगता$$्निेगोंदिया : शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड न करता आधुनिक श्री पद्धतीने व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून धान लागवड करावी. त्यामुळे हेक्टरी उत्पादनात दुप्पट वाढ होण्यास मदत होईल. माती परीक्षण करून खतांचा समतोल वापर तसेच जैविक कीटकनाशके यांचा वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे मत आत्माचे राज्य संचालक जयंत देशमुख यांनी व्यक्त केले.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ ते ७ जुलै दरम्यान गोरेगाव तालुक्यातील घोटी येथे कृषी जागृती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मार्गदर्शक म्हणून देशमुख बोलत होते. याप्रसंगी कृषी उपसंचालक पुणेचे धुमाळ, त्र्यंबके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील, आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक सराफ, उपविभागीय कृषी अधिकारी तसरे व तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने उपस्थित होते. या वेळी प्रगतीशील शेतकरी रेखलाल टेंभरे, चिंतामन बिसेन, भोजराज पटेल यांनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाला गोरेगाव तालुक्यातील ३०० च्या वर शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, संचालन कृषी पर्यवेक्षक एफ.आर.टी. शहा तर आभार कुरील यांनी मानले. कार्यक्रमासाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. $$्निेकाचेवानी : तिरोडा येथील पंचायत समिती सभागृहात कृषी जागृती सप्ताहाची सांगता झाली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, खंड विकास अधिकारी नारयण जमईवार, तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. पोटदुखे, कृषी विभागाचे कर्मचारी, कृषी मित्र व शेतकरी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात पी.व्ही. पोटदुखे यांनी, शासनाच्या विविध कृषीविषयक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे महत्त्व, खरीप हंगाम १५-१६ करिता एम किसान पोर्टल नोंदणी, शेतकरी मासिक वर्गणीदार वाढविणे, पीक विमा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत नगदी पिकांकरिता क्षेत्रात वाढ करणे, बीज प्रक्रिया, भात लागवड पद्धत, श्रीपद्धत, कमी खर्चाची शेती, उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान व पाण्याचे महत्त्व यावर मोहीम राबविण्यात येत आहे. गाव पातळीवर त्यासाठी सभा होत आहेत, असे सांगितले. या वेळी प्रवीण महिरे, एन.आर. जमईवार यांनीही मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत देण्यात येणारी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी/वार्ताहर)