शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा

By admin | Updated: July 10, 2015 01:49 IST

कृषी जागृती सप्ताहाची सांगता$$्निेगोंदिया : शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड न करता आधुनिक श्री पद्धतीने व नवीन...

जयंत देशमुख : कृषी जागृती सप्ताहाची सांगता$$्निेगोंदिया : शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड न करता आधुनिक श्री पद्धतीने व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून धान लागवड करावी. त्यामुळे हेक्टरी उत्पादनात दुप्पट वाढ होण्यास मदत होईल. माती परीक्षण करून खतांचा समतोल वापर तसेच जैविक कीटकनाशके यांचा वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे मत आत्माचे राज्य संचालक जयंत देशमुख यांनी व्यक्त केले.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ ते ७ जुलै दरम्यान गोरेगाव तालुक्यातील घोटी येथे कृषी जागृती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मार्गदर्शक म्हणून देशमुख बोलत होते. याप्रसंगी कृषी उपसंचालक पुणेचे धुमाळ, त्र्यंबके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील, आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक सराफ, उपविभागीय कृषी अधिकारी तसरे व तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने उपस्थित होते. या वेळी प्रगतीशील शेतकरी रेखलाल टेंभरे, चिंतामन बिसेन, भोजराज पटेल यांनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाला गोरेगाव तालुक्यातील ३०० च्या वर शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, संचालन कृषी पर्यवेक्षक एफ.आर.टी. शहा तर आभार कुरील यांनी मानले. कार्यक्रमासाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. $$्निेकाचेवानी : तिरोडा येथील पंचायत समिती सभागृहात कृषी जागृती सप्ताहाची सांगता झाली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, खंड विकास अधिकारी नारयण जमईवार, तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. पोटदुखे, कृषी विभागाचे कर्मचारी, कृषी मित्र व शेतकरी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात पी.व्ही. पोटदुखे यांनी, शासनाच्या विविध कृषीविषयक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे महत्त्व, खरीप हंगाम १५-१६ करिता एम किसान पोर्टल नोंदणी, शेतकरी मासिक वर्गणीदार वाढविणे, पीक विमा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत नगदी पिकांकरिता क्षेत्रात वाढ करणे, बीज प्रक्रिया, भात लागवड पद्धत, श्रीपद्धत, कमी खर्चाची शेती, उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान व पाण्याचे महत्त्व यावर मोहीम राबविण्यात येत आहे. गाव पातळीवर त्यासाठी सभा होत आहेत, असे सांगितले. या वेळी प्रवीण महिरे, एन.आर. जमईवार यांनीही मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत देण्यात येणारी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी/वार्ताहर)