शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा

By admin | Updated: July 10, 2015 01:49 IST

कृषी जागृती सप्ताहाची सांगता$$्निेगोंदिया : शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड न करता आधुनिक श्री पद्धतीने व नवीन...

जयंत देशमुख : कृषी जागृती सप्ताहाची सांगता$$्निेगोंदिया : शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड न करता आधुनिक श्री पद्धतीने व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून धान लागवड करावी. त्यामुळे हेक्टरी उत्पादनात दुप्पट वाढ होण्यास मदत होईल. माती परीक्षण करून खतांचा समतोल वापर तसेच जैविक कीटकनाशके यांचा वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे मत आत्माचे राज्य संचालक जयंत देशमुख यांनी व्यक्त केले.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ ते ७ जुलै दरम्यान गोरेगाव तालुक्यातील घोटी येथे कृषी जागृती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मार्गदर्शक म्हणून देशमुख बोलत होते. याप्रसंगी कृषी उपसंचालक पुणेचे धुमाळ, त्र्यंबके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील, आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक सराफ, उपविभागीय कृषी अधिकारी तसरे व तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने उपस्थित होते. या वेळी प्रगतीशील शेतकरी रेखलाल टेंभरे, चिंतामन बिसेन, भोजराज पटेल यांनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाला गोरेगाव तालुक्यातील ३०० च्या वर शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, संचालन कृषी पर्यवेक्षक एफ.आर.टी. शहा तर आभार कुरील यांनी मानले. कार्यक्रमासाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. $$्निेकाचेवानी : तिरोडा येथील पंचायत समिती सभागृहात कृषी जागृती सप्ताहाची सांगता झाली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, खंड विकास अधिकारी नारयण जमईवार, तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. पोटदुखे, कृषी विभागाचे कर्मचारी, कृषी मित्र व शेतकरी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात पी.व्ही. पोटदुखे यांनी, शासनाच्या विविध कृषीविषयक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे महत्त्व, खरीप हंगाम १५-१६ करिता एम किसान पोर्टल नोंदणी, शेतकरी मासिक वर्गणीदार वाढविणे, पीक विमा योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत नगदी पिकांकरिता क्षेत्रात वाढ करणे, बीज प्रक्रिया, भात लागवड पद्धत, श्रीपद्धत, कमी खर्चाची शेती, उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान व पाण्याचे महत्त्व यावर मोहीम राबविण्यात येत आहे. गाव पातळीवर त्यासाठी सभा होत आहेत, असे सांगितले. या वेळी प्रवीण महिरे, एन.आर. जमईवार यांनीही मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत देण्यात येणारी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी/वार्ताहर)