शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धान खरेदीसाठी शासकीय इमारती आश्रम शाळांचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:22 IST

रब्बी हंगामातील धान खरेदी ही १ मे ते ३० जून दरम्यान केली जाते. मात्र यंदा अद्यापही धान खरेदीला सुरुवातीला ...

रब्बी हंगामातील धान खरेदी ही १ मे ते ३० जून दरम्यान केली जाते. मात्र यंदा अद्यापही धान खरेदीला सुरुवातीला झाली नाही. मागील खरीप हंगामातील धानाची भरडाईसाठी उचल झाली नसल्याने गोदाम हाऊस फुल्ल भरले आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे असा प्रश्न आहे. त्यामुळेच यंदा आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदीला सुरुवात केली नाही. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची सुध्दा फार चांगली स्थिती नाही. मात्र या सर्वांचा फटका शेतकऱ्यांना बसत असून त्यांना गरजेपोटी कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. पूर्व विदर्भातील लाखो शेतकऱ्यांची यामुळे कोंडी झाली आहे. हीच कोंडी सोडविण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी खा. प्रफुल्ल पटेल यांनी चर्चा केली. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाने धान खरेदीसाठी शासकीय इमारती, क्रीडा संकुल, पांटबंधारे व सार्वजनिक बांधकाम व अन्य शासकीय विभागाच्या रिकाम्या असलेल्या इमारती आणि गोदामांचा वापर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना केल्या आहे. रब्बी हंगामात दोन्ही विभागांची जवळपास ३० लाख क्विंटल धान खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. तसेच जिथे जागा उपलब्ध आहे तिथे त्वरित धान खरेदी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आश्रमशाळा आणि शासकीय इमारतींचा वापर आता धान खरेदीसाठी केला जाणार आहे.

.................

जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविली जबाबदारी

लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदीला युध्द पातळीवर सुरुवात करण्याची गरज आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय इमारती, आश्रम शाळा, क्रीडा संकुलाची इमारती धान खरेदी त्वरित उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहे.

..........

इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थेचा खर्च करणार शासन

शासकीय इमारतीमध्ये धानाची साठवणूक करण्यासाठी येणारा व खर्च आणि भाडे हे शासनाकडून दिले जाणार आहे. तसेच इमारतीच्या सुरक्षेकरिता लागणारा खर्च सुध्दा शासनाकडून देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी धान खरेदी केंद्र आहेत त्या ठिकाणाजवळपास इमारतींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या आहे. तसेच वाहतूक खर्च कमी लागेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहे.

.......

व्यापाऱ्यांच्या दारात जाण्याची वेळ येऊ देऊ नका

रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी गोदामांचे त्वरित नियोजन करुन धान खरेदीला सुरुवात करा. केंद्राअभावी शेतकऱ्यांना कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करण्याची वेळ येऊ देऊ नका अशा सूचना सुध्दा अन्न नागरी पुरवठा विभाग व खा. प्रफुल्ल पटेल यांनी जिल्हाधिकारी व दोन्ही विभागाला केल्या आहेत.