शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

बर्फगोळ्यात दूषित पाणी व रासायनिक रंगांचा वापर

By admin | Updated: April 5, 2015 01:24 IST

उन्हाळा आला की थंड पेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने बाजारपेठेत सजू लागतात. ग्रामीण भागातील गावो-गावात तसेच शहरी भागात बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्याची रेलचेल पहावयास मिळते.

गोंदिया : उन्हाळा आला की थंड पेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने बाजारपेठेत सजू लागतात. ग्रामीण भागातील गावो-गावात तसेच शहरी भागात बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्याची रेलचेल पहावयास मिळते. उन्हाची दाहकता उष्णता शमविण्यासाठी बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्यांजवळ लहान मोठी मुलांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. परंतू बर्फ गोळा खाणे वैद्यकीयदृष्ट्या शरीरास हानीकारक आहे. बऱ्याच बर्फ कारखाण्यात बर्फाच्या निर्मितीकरीता दूषीत पाणी उपयोगात घेऊन बर्फाची निर्मिती केली जाते. बर्फ गोळा विकण्याऱ्या गाड्यावर सुध्दा दूषित पाण्यापासून निर्मित बर्फ वापरत असल्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर्फ गोळ्याची निर्मिती करताना साखर ऐवजी साखरीनचा उपयोग करून त्यात रासायनीक रंगाचा वापर केला जातो. यामुळे मुल बाळांचा खाद्यात रासायनीक रंग उपयोगता आणल्या जात असल्याने घशाच्या आजारावरचे विकास मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची उदाहरणे दरवर्षी मोठ्या प्रमाणात दिसून येत असतात. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील शाळा महाविद्यालये लग्न समारंभचा ठिकाणी आॅईस गोळा विकण्याची गर्दी अलीकडेच वाढतच आहे. बर्फ विकण्याऱ्या गाड्याजवळ शाळकरी मुल-मुली उष्णतेची दाहकता समवण्यासाठी आईस गोळा खान्याकडे आकर्षिले जात आहेत.बर्फ गोळ्यात वापरलया जाणाऱ्या रासायनीक रंग ही निकृष्ठ दर्जाचे असल्यामुळे व त्याचा खाद्यपदार्थात वापर केल्यामुळे घशाचे विकार वाढल्याचे समोर येत आहेत. उन्हाळ्यात बर्फाचा सेवन करूनये असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञाकडून देण्यात येतो. पण उन्हाळ्यात उष्णतेमुळे तहान खूप लागत असल्यामुळे थंड पाणी मिळावे यासाठी बर्फाचा वापर केला जातो दुपारी १२ ते ४ या वेळात उन्हाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बर्फ गोळ्याचा गाडी जवळ प्रचंड गर्दी पहावयास मिळते. उन्हाळा सुसहय करण्यासाठी अबालवृध्दांनी आईसक्रीम पार्लर आॅइस गोळ्याचा गाड्या रसवंती गृह अशा ठिकाणाचा आधार घेतला आहे. शाळा महाविद्यालयाचा परीसरात बर्फ गोळ्याचा गाड्यावर बरीच मोठी गर्दी दिसू लागली आहे. ग्रामीण व शहरी भागात जागोजागी कलीगंडाचा गाड्या दिसू लागल्या असून मोबाईल रसवंत्या येणाऱ्या जाण्याऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या कलीगंड आणि काकडीचा बाजार तेजीत आला आहे. चौकाचौकात रसवंती, शरबत, लिंबू रस, लिंबू पाणी, आईसगोला, कुल्फीच्या गाड्याची संख्या बरीच वाढली आहे. परीणामी यावेळी लिंबूच्या मागणीत वाढ होत चालली असून लिंबाचा किंमतीही वाढल्या आहेत.